शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
2
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
3
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
4
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
5
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
6
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
7
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
8
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
9
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
10
भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचा कॉग्रेस मध्ये प्रवेश
11
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
12
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
13
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
14
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
15
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
20
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज

वाशिम जिल्ह्यात पाणीप्रश्न पेटतोय; ग्रामस्थ आक्रमक, उपाययोजनांसंदर्भात नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 15:59 IST

वाशिम : एप्रिल महिन्याला सुरूवात होत नाही; तोच पाणीप्रश्न गंभीर बनला असून पाण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ विविध माध्यमातून आंदोलनाचा पवित्रा घेत असल्याचे अलिकडील काही घटनांवरून दिसून येते.

ठळक मुद्दे विहिर अधिग्रहणाचा अपवाद वगळता उर्वरीत उपाययोजनांची अंमलबजावणी संथगतीने असल्याने नागरिकांमधून रोष व्यक्त होत आहे.चोंढी गावाला देण्याच्या मागणीसाठी चोंढी गावाच्या नागरिकांनी कारंजा - मानोरा रस्त्यावर ३ एप्रिल रोजी महिलांसह रास्ता रोको केला. पाणीपुरवठा करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी ३ एप्रिल कारंजा-मानोरा मार्गावर रास्तारोको केला.

वाशिम : एप्रिल महिन्याला सुरूवात होत नाही; तोच पाणीप्रश्न गंभीर बनला असून पाण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ विविध माध्यमातून आंदोलनाचा पवित्रा घेत असल्याचे अलिकडील काही घटनांवरून दिसून येते.

२०१७ मध्ये पावसाने सरासरी गाठली नाही. त्यामुळे जलप्रकल्पातही पुरेशा प्रमाणात पाणी नाही. यावर्षी वाशिम जिल्ह्यातील ५१० पेक्षा अधिक गावांत पाणीटंचाई निर्माण झाली असून, पाणीटंचाई निवारणार्थ प्रशासनाने उपाययोजना प्रस्तावित केलेल्या आहेत. मात्र, विहिर अधिग्रहणाचा अपवाद वगळता उर्वरीत उपाययोजनांची अंमलबजावणी संथगतीने असल्याने नागरिकांमधून रोष व्यक्त होत आहे. पाणी उपलब्ध नसल्याने काही गावातील नागरिक रास्ता रोको, मोर्चा काढून उपाययोजना करण्याची आग्रही मागणी लावून धरत असल्याचे दिसून येते. मालेगाव तालुक्यातील सोनल मध्यम प्रकल्पातील पाणी इतरत्र वळविण्याचे प्रस्तावित असल्याने जवळपास २० गावांतील शेतकरी, ग्रामस्थांचा पिण्याचा प्रश्न गंभीर बनत  आहे. या गावातील नागरिकांनी १ एप्रिल रोजी शेलुबाजार येथील बाजारपेठ बंद ठेवून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवावा, अशी मागणी केली. मानोरा तालुक्यातील म्हसणी येथून होत असलेल्या प्रादेशीक पाणी पुरवठा योजनेचे पाणी चोंढी गावाला देण्याच्या मागणीसाठी चोंढी गावाच्या नागरिकांनी कारंजा - मानोरा रस्त्यावर ३ एप्रिल रोजी महिलांसह रास्ता रोको केला. मंगरुळपीर  तालुक्यातील कवठळ येथे पाणीप्रश्न पेटला असून, पाणीपुरवठा करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी मंगरूळपीर तहसील कार्यालयावर २ एप्रिल रोजी मोर्चा काढून रोष व्यक्त केला होता. मानोरा तालुक्यातील भोयणी येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणीपुरवठा करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी ३ एप्रिल कारंजा-मानोरा मार्गावर रास्तारोको केला. मंगरूळपीर शहरात गत २२ दिवसांपासून पाणीपुरवठा झाला नाही. किमान पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून जोर धरत आहे.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी