शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

वाशिम जिल्ह्यात पाणीप्रश्न पेटतोय; ग्रामस्थ आक्रमक, उपाययोजनांसंदर्भात नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 15:59 IST

वाशिम : एप्रिल महिन्याला सुरूवात होत नाही; तोच पाणीप्रश्न गंभीर बनला असून पाण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ विविध माध्यमातून आंदोलनाचा पवित्रा घेत असल्याचे अलिकडील काही घटनांवरून दिसून येते.

ठळक मुद्दे विहिर अधिग्रहणाचा अपवाद वगळता उर्वरीत उपाययोजनांची अंमलबजावणी संथगतीने असल्याने नागरिकांमधून रोष व्यक्त होत आहे.चोंढी गावाला देण्याच्या मागणीसाठी चोंढी गावाच्या नागरिकांनी कारंजा - मानोरा रस्त्यावर ३ एप्रिल रोजी महिलांसह रास्ता रोको केला. पाणीपुरवठा करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी ३ एप्रिल कारंजा-मानोरा मार्गावर रास्तारोको केला.

वाशिम : एप्रिल महिन्याला सुरूवात होत नाही; तोच पाणीप्रश्न गंभीर बनला असून पाण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ विविध माध्यमातून आंदोलनाचा पवित्रा घेत असल्याचे अलिकडील काही घटनांवरून दिसून येते.

२०१७ मध्ये पावसाने सरासरी गाठली नाही. त्यामुळे जलप्रकल्पातही पुरेशा प्रमाणात पाणी नाही. यावर्षी वाशिम जिल्ह्यातील ५१० पेक्षा अधिक गावांत पाणीटंचाई निर्माण झाली असून, पाणीटंचाई निवारणार्थ प्रशासनाने उपाययोजना प्रस्तावित केलेल्या आहेत. मात्र, विहिर अधिग्रहणाचा अपवाद वगळता उर्वरीत उपाययोजनांची अंमलबजावणी संथगतीने असल्याने नागरिकांमधून रोष व्यक्त होत आहे. पाणी उपलब्ध नसल्याने काही गावातील नागरिक रास्ता रोको, मोर्चा काढून उपाययोजना करण्याची आग्रही मागणी लावून धरत असल्याचे दिसून येते. मालेगाव तालुक्यातील सोनल मध्यम प्रकल्पातील पाणी इतरत्र वळविण्याचे प्रस्तावित असल्याने जवळपास २० गावांतील शेतकरी, ग्रामस्थांचा पिण्याचा प्रश्न गंभीर बनत  आहे. या गावातील नागरिकांनी १ एप्रिल रोजी शेलुबाजार येथील बाजारपेठ बंद ठेवून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवावा, अशी मागणी केली. मानोरा तालुक्यातील म्हसणी येथून होत असलेल्या प्रादेशीक पाणी पुरवठा योजनेचे पाणी चोंढी गावाला देण्याच्या मागणीसाठी चोंढी गावाच्या नागरिकांनी कारंजा - मानोरा रस्त्यावर ३ एप्रिल रोजी महिलांसह रास्ता रोको केला. मंगरुळपीर  तालुक्यातील कवठळ येथे पाणीप्रश्न पेटला असून, पाणीपुरवठा करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी मंगरूळपीर तहसील कार्यालयावर २ एप्रिल रोजी मोर्चा काढून रोष व्यक्त केला होता. मानोरा तालुक्यातील भोयणी येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणीपुरवठा करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी ३ एप्रिल कारंजा-मानोरा मार्गावर रास्तारोको केला. मंगरूळपीर शहरात गत २२ दिवसांपासून पाणीपुरवठा झाला नाही. किमान पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून जोर धरत आहे.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी