शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

वाशिम जिल्ह्यात पाणीप्रश्न पेटतोय; ग्रामस्थ आक्रमक, उपाययोजनांसंदर्भात नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 15:59 IST

वाशिम : एप्रिल महिन्याला सुरूवात होत नाही; तोच पाणीप्रश्न गंभीर बनला असून पाण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ विविध माध्यमातून आंदोलनाचा पवित्रा घेत असल्याचे अलिकडील काही घटनांवरून दिसून येते.

ठळक मुद्दे विहिर अधिग्रहणाचा अपवाद वगळता उर्वरीत उपाययोजनांची अंमलबजावणी संथगतीने असल्याने नागरिकांमधून रोष व्यक्त होत आहे.चोंढी गावाला देण्याच्या मागणीसाठी चोंढी गावाच्या नागरिकांनी कारंजा - मानोरा रस्त्यावर ३ एप्रिल रोजी महिलांसह रास्ता रोको केला. पाणीपुरवठा करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी ३ एप्रिल कारंजा-मानोरा मार्गावर रास्तारोको केला.

वाशिम : एप्रिल महिन्याला सुरूवात होत नाही; तोच पाणीप्रश्न गंभीर बनला असून पाण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ विविध माध्यमातून आंदोलनाचा पवित्रा घेत असल्याचे अलिकडील काही घटनांवरून दिसून येते.

२०१७ मध्ये पावसाने सरासरी गाठली नाही. त्यामुळे जलप्रकल्पातही पुरेशा प्रमाणात पाणी नाही. यावर्षी वाशिम जिल्ह्यातील ५१० पेक्षा अधिक गावांत पाणीटंचाई निर्माण झाली असून, पाणीटंचाई निवारणार्थ प्रशासनाने उपाययोजना प्रस्तावित केलेल्या आहेत. मात्र, विहिर अधिग्रहणाचा अपवाद वगळता उर्वरीत उपाययोजनांची अंमलबजावणी संथगतीने असल्याने नागरिकांमधून रोष व्यक्त होत आहे. पाणी उपलब्ध नसल्याने काही गावातील नागरिक रास्ता रोको, मोर्चा काढून उपाययोजना करण्याची आग्रही मागणी लावून धरत असल्याचे दिसून येते. मालेगाव तालुक्यातील सोनल मध्यम प्रकल्पातील पाणी इतरत्र वळविण्याचे प्रस्तावित असल्याने जवळपास २० गावांतील शेतकरी, ग्रामस्थांचा पिण्याचा प्रश्न गंभीर बनत  आहे. या गावातील नागरिकांनी १ एप्रिल रोजी शेलुबाजार येथील बाजारपेठ बंद ठेवून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवावा, अशी मागणी केली. मानोरा तालुक्यातील म्हसणी येथून होत असलेल्या प्रादेशीक पाणी पुरवठा योजनेचे पाणी चोंढी गावाला देण्याच्या मागणीसाठी चोंढी गावाच्या नागरिकांनी कारंजा - मानोरा रस्त्यावर ३ एप्रिल रोजी महिलांसह रास्ता रोको केला. मंगरुळपीर  तालुक्यातील कवठळ येथे पाणीप्रश्न पेटला असून, पाणीपुरवठा करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी मंगरूळपीर तहसील कार्यालयावर २ एप्रिल रोजी मोर्चा काढून रोष व्यक्त केला होता. मानोरा तालुक्यातील भोयणी येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणीपुरवठा करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी ३ एप्रिल कारंजा-मानोरा मार्गावर रास्तारोको केला. मंगरूळपीर शहरात गत २२ दिवसांपासून पाणीपुरवठा झाला नाही. किमान पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून जोर धरत आहे.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी