शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

पावसामुळे महामार्ग झाले घसरगुंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 16:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मंगरुळपीर ( वाशिम ): जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांमुळे वाहनधारकांची चांगलीच पंचाईत झाली आहे. अर्धवट ...

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर (वाशिम): जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांमुळे वाहनधारकांची चांगलीच पंचाईत झाली आहे. अर्धवट पुलांमुळे पाऊस आल्यानंतर मार्ग बंद पडत असतानाच या महामार्गाच्या कच्च्या रस्त्यावर पावसामुळे चिखल तयार होत असल्याने वाहने घसरण्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे अपघाताची भिती वाढली आहे. वाशिम-मंगरुळपीर आणि शेलुबाजार-मंगरुळपीर दरम्यान हे चित्र पाहायला मिळत आहे.जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण आणि राज्य रस्ते विकास महामंडळांतर्गत चार राष्ट्रीय महामार्गांची कामे होत आहेत, तर एका मार्गाचे काम अद्याप सुरू व्हायचे आहे. सध्या सुरू असलेल्या महामार्गांमध्ये मंगरुळपीर-महान, वाशिम-मंगरुळपीर, कारंजा-मंगरुळपीर, मानोरा-मंगरुळपीर, मालेगाव-मेहकर या मार्गांचा समावेश आहे. या महामार्गांच्या कामासाठी कंत्राटदारांनी पूर्वीचे रस्ते खोदून सपाटीकरण केले आहे. हे करताना माती मिश्रीत मुरुमाचा मोठा वापर झाला आहे. त्यामुळे पाऊस आल्यानंतर मार्गावर चिखल तयार होऊन वाहने घसरण्याचे प्रकार घडत आहेत. यात दुचाकीसह चारचाकी वाहनेही घसरत असल्याने एखादवेळी समोरून येणाºया वाहनाला धडक लागून मोठा अपघात घडण्याची भिती निर्माण झाली आहे. वाशिम-मंगरुळपीर आणि शेलुबाजार मंगरुळपीरसह मानोरा-मंगरुळपीरदरम्यानच्या कामांवर वाहने घसरण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणच्या अभियंत्यांनी या प्रकारात जातीने लक्ष घालून कंत्राटदारांना कच्च्या रस्त्यावर खडी टाकून व्यवस्थित दबाई करण्याच्या सुचना देणे अत्यावश्यक झाले आहे. ----------------------
टॅग्स :washimवाशिमhighwayमहामार्ग