शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

जिल्हा परिषद निवडणूक; रणधुमाळीने तापले राजकीय वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2020 12:26 PM

कडाक्याच्या थंडीत ग्रामीण भागात राजकीय वातावरण तापले असून, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी ७ जानेवारी रोजी मतदान होत आहे. ५२ जिल्हा परिषद गट व १०४ पंचायत समिती गण असे मिळून एकूण ७२४ उमेदवार निवडणुक रिंगणात असून, रणधुमाळीस प्रारंभ झाला आहे. कडाक्याच्या थंडीत ग्रामीण भागात राजकीय वातावरण तापले असून, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.जिल्हा परिषदेचे ५२ गट व पंचायत समितीचे १०४ गण आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर सर्वच गट व गणातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. ५२ गटासाठी २६३ उमेदवार रिंगणात असून, रणधुमाळीला प्रारंभ झाला. कारंजा तालुक्यात ८ जिल्हा परिषद गटासाठी ४९ उमेदवार, वाशिम तालुक्यात १० गटासाठी ५० उमेदवार, मालेगाव तालुक्यात ९ गटासाठी ५३ उमेदवार, रिसोड तालुक्यात ९ गटासाठी ३७ उमेदवार, मंगरूळपीर तालुक्यात ८ गटासाठी ३५ उमेदवार आणि मानोरा तालुक्यात ८ गटासाठी ३९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. जिल्ह्यातील १०४ पंचायत समिती गणासाठी एकूण ४६१ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये कारंजा तालुक्यातील १६ पंचायत समिती गणासाठी ७२ उमेदवार, मंगरूळपीर तालुक्यात १६ गणासाठी ७० उमेदवार, वाशिम तालुक्यात २० गणासाठी ७७ उमेदवार, मालेगाव तालुक्यात १८ गणासाठी ८८ उमेदवार, रिसोड तालुक्यात १८ गणासाठी ७२ उमेदवार, मानोरा तालुक्यात १६ गणासाठी ८२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पार्टी, भारिप-बमसं, वाशिम जिल्हा जनविकास आघाडीचे उमेदवार रिंगणात असून, सर्वांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेवरची सत्ता कायम राखण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली असून, काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरून स्टार प्रचारकांची यादीही प्रसिद्ध झाली आहे. स्टार प्रचारकांची सभा लावण्यासाठी काँग्रेसच्या उमेदवारांनी वरिष्ठांकडे ‘फिल्डिंग’ लावल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनेही सदस्य संख्या वाढविण्यासाठी मंत्र्यांच्या सभांचे नियोजन केल्याची माहिती आहे. शिवसेना व भाजपाच्यावतीनेही सभांचे नियोजन असून, अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी अंतर्गत गटबाजी शमविण्यावर भर दिला जात आहे. वंचित बहुजन आघाडीतर्फे भारिप-बमसं या बॅनरखाली निवडणूक लढविली जात असून, दोन अंकी आकडा गाठण्यासाठी वरिष्ठ पदाधिकारी जिल्ह्यात तळ ठोकून आहेत. माजी खासदार अनंतराव देशमुख यांची वाशिम जिल्हा जनविकास आघाडीदेखील रिसोड, मालेगाव व मानोरा तालुक्यात नशीब आजमावत असून, दोन अंकी आकडा गाठण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लागली आहे. रणधुमाळीला प्रारंभ झाल्याने कडाक्याच्या थंडीत ग्रामीण भागातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असल्याचे दिसून येते.(प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद