शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

वाशिम जिल्ह्यातील दोन हजारावर लाभार्थी शेतकऱ्यांना ‘पेन्शन कार्ड’चे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 14:39 IST

दोन हजारांपेक्षा अधिक लाभार्थी शेतकºयांना आतापर्यंत ‘पेन्शन कार्ड’चे वितरण करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शेतकऱ्यांच्या सुरक्षित भवितव्यासाठी अंमलात आलेल्या प्रधानमंत्री किसान मानधन योजनेमध्ये नाव नोंदणी केलेल्या दोन हजारांपेक्षा अधिक लाभार्थी शेतकºयांना आतापर्यंत ‘पेन्शन कार्ड’चे वितरण करण्यात आले आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी रविवार, ८ सप्टेंबरला दिली.१८ ते ४० वर्षे वयोगटातील २ हेक्टरपर्यंत शेती असलेले सर्व शेतकरी प्रधानमंत्री किसान मानधन योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी पात्र आहेत. याअंतर्गत दर महिन्याला ठराविक रक्कम जमा करणाºया पात्र लाभार्थ्यांना वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर ३ हजार रुपये प्रती महिना पेन्शन मिळणार आहे. लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटूंबियास कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्याची देखील तरतूद या योजनेत करण्यात आली आहे. नाव नोंदणी करण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील सुमारे दोन हजार शेतकºयांनी नाव प्रधानमंत्री किसान मानधन योजनेच्या लाभाकरिता नोंदणी केली असून संबंधितांना पेन्शन कार्डचे वितरणही करण्यात आले आहे.१ आॅगस्ट २०१९ रोजी १८ ते ४० वर्षे वय असलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र असून त्यांना वयानुसार प्रतिमाह ५५ ते २०० रुपये रक्कम जमा करावी लागणार आहे. सदर रक्कम ६० वर्षे पूर्ण होईपर्यंत जमा करणे आवश्यक आहे. यात केंद्र शासनाकडून देखील लाभार्थ्यांनी जमा केलेल्या रकमेइतकीच रक्कम जमा केली जाईल. गाव पातळीवर सुविधा केंद्रांमध्ये (कॉमन सर्व्हिस सेंटर) लाभार्थी नोंदणी करण्यात येत असल्याचे शैलेश हिंगे यांनी सांगितले.नोंदणीसाठी आवश्यक असलेली कागदपत्रेशेतकºयांना त्यांच्या वृद्धपकाळात किमान खर्चाची सोय उपलब्ध व्हावी, या उद्देशाने शासनस्तरावरून प्रधानमंत्री किसान मानधन योजना हाती घेण्यात आली. याअंतर्गत वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रती महिना ३ हजार रुपये पेन्शन सुरू होणार आहे. दरम्यान, या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी लाभार्थ्यांना आधारकार्ड, गाव नमुना ८ ‘अ’, बँक पासबुक, जन्म तारखेचा पुरावा, पत्नीचे नाव आदी माहिती सादर करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, असे कळविण्यात आले. लाभार्थ्यांनी नोंदणीकरिता अन्य कुठेही न जाता प्रामुख्याने जिल्ह्यातील गावागावांमध्ये कार्यान्वित असलेल्या आपले सरकार सेवा केंद्रांवरच नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी