शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

वाशिम जिल्ह्यातील दोन हजारावर लाभार्थी शेतकऱ्यांना ‘पेन्शन कार्ड’चे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 14:39 IST

दोन हजारांपेक्षा अधिक लाभार्थी शेतकºयांना आतापर्यंत ‘पेन्शन कार्ड’चे वितरण करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शेतकऱ्यांच्या सुरक्षित भवितव्यासाठी अंमलात आलेल्या प्रधानमंत्री किसान मानधन योजनेमध्ये नाव नोंदणी केलेल्या दोन हजारांपेक्षा अधिक लाभार्थी शेतकºयांना आतापर्यंत ‘पेन्शन कार्ड’चे वितरण करण्यात आले आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी रविवार, ८ सप्टेंबरला दिली.१८ ते ४० वर्षे वयोगटातील २ हेक्टरपर्यंत शेती असलेले सर्व शेतकरी प्रधानमंत्री किसान मानधन योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी पात्र आहेत. याअंतर्गत दर महिन्याला ठराविक रक्कम जमा करणाºया पात्र लाभार्थ्यांना वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर ३ हजार रुपये प्रती महिना पेन्शन मिळणार आहे. लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटूंबियास कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्याची देखील तरतूद या योजनेत करण्यात आली आहे. नाव नोंदणी करण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील सुमारे दोन हजार शेतकºयांनी नाव प्रधानमंत्री किसान मानधन योजनेच्या लाभाकरिता नोंदणी केली असून संबंधितांना पेन्शन कार्डचे वितरणही करण्यात आले आहे.१ आॅगस्ट २०१९ रोजी १८ ते ४० वर्षे वय असलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र असून त्यांना वयानुसार प्रतिमाह ५५ ते २०० रुपये रक्कम जमा करावी लागणार आहे. सदर रक्कम ६० वर्षे पूर्ण होईपर्यंत जमा करणे आवश्यक आहे. यात केंद्र शासनाकडून देखील लाभार्थ्यांनी जमा केलेल्या रकमेइतकीच रक्कम जमा केली जाईल. गाव पातळीवर सुविधा केंद्रांमध्ये (कॉमन सर्व्हिस सेंटर) लाभार्थी नोंदणी करण्यात येत असल्याचे शैलेश हिंगे यांनी सांगितले.नोंदणीसाठी आवश्यक असलेली कागदपत्रेशेतकºयांना त्यांच्या वृद्धपकाळात किमान खर्चाची सोय उपलब्ध व्हावी, या उद्देशाने शासनस्तरावरून प्रधानमंत्री किसान मानधन योजना हाती घेण्यात आली. याअंतर्गत वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रती महिना ३ हजार रुपये पेन्शन सुरू होणार आहे. दरम्यान, या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी लाभार्थ्यांना आधारकार्ड, गाव नमुना ८ ‘अ’, बँक पासबुक, जन्म तारखेचा पुरावा, पत्नीचे नाव आदी माहिती सादर करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, असे कळविण्यात आले. लाभार्थ्यांनी नोंदणीकरिता अन्य कुठेही न जाता प्रामुख्याने जिल्ह्यातील गावागावांमध्ये कार्यान्वित असलेल्या आपले सरकार सेवा केंद्रांवरच नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी