शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

नियोजनाअभावी राज्यस्तरीय स्पर्धेच्या खेळाडूंची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 23:17 IST

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणेअंतर्गत वाशिम जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी आलेल्या खेळाडूंना जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या नियोजनाअभावी मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागला.

ठळक मुद्देप्रशासनाचा भोंगळ कारभारविद्यार्थ्यांना रात्री १० पर्यंत उपहारही मिळाला नाही 

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणेअंतर्गत वाशिम जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी आलेल्या खेळाडूंना जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या नियोजनाअभावी मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागला. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणेअंतर्गत वाशिम जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने १२ ते १५ आॅक्टोबर या कालावधीत राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन गुरुवारी सायंकाळी ५ वाजता  होणार होते; परंतु पावसामुळे ते होऊ शकले नाही. दरम्यान, या स्पर्धेसाठी लातूर, हिंगोली, औरंगाबाद, यवतमाळ,  उस्मानाबादसह अनेक जिलह्यातील खेळाडू वाशिम येथे बुधवारीच दाखल झाले. असून, या राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेमध्ये १४ वर्षे, १७ वर्षे व १९ वर्षे वयोगटातील मुली व मुलांचे ८ विभागाचे व क्रीडा प्रबोधनी यांचा प्रत्येकी एक संघ असे एकूण ५४ संघ सहभागी होणार आहेत. प्रत्येक संघात १२ खेळाडूंचा समावेश असून त्यांच्यासोबत एक संघ व्यवस्थापक  आसले आहेत. आता या खेळाडूंच्या संघांसह सोबत आलेल्या सर्व चमुच्या राहण्यासह जेवणाची व्यवस्था क्रीडा संकुलात किंवा इतर ठिकाणी करणे अपेक्षीत होते; परंतु त्याची थोडही काळजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून घेण्यात आली नाही. त्यामुळे या स्पर्धेत सहभागी झालेल्या एकाही खेळाडूंना जेवणच काय, तर सकाळचा उपाहारही मिळू शकला नाही. दिवसभर हे सर्व चिमुकले खेळाडू भुकेने व्याकूळ होत असतानाही त्याची दखल प्रशासनाकडून घेण्यात येत नसल्याने या खेळाडूंनी अखेर जिल्हाधिकाºयांकडे धाव घेण्याचेही ठरविले. राज्यस्तरीय स्पर्धेचे महत्त्व लक्षात घेता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयासह संबंधित यंत्रणेकडून सर्वच बाजूंचा विचार करून योग्य नियोजन करण्यासह खेळाडूंच्या सोयीची काळजी घेणे अपेक्षीत असताना त्याचा पूर्ण अभाव वाशिम येथे पाहायला मिळाला. परिणामी खेळाडूंची मोठ्या प्रमाणात गैरसोय झालीच शिवाय वाशिमच्या नावालाही गालबोट लागले. रात्री उशिरा १० वाजताच्या सुमारास या खेळाडूंना दिवसाचे पहिले जेवण मिळाल्याचे या संदर्भात माहिती घेतल्यानंतर सांगण्यात आले.