शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

 गाळ, कचऱ्याने रोडावले पूस नदीचे पात्र 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 16:08 IST

वाशिम: जिल्ह्यातील मोठ्या नद्यांपैकी एक असलेल्या पूस नदीचे पात्र गाळ, कचऱ्यासह झुडपांमुळे रोडावले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यातील मोठ्या नद्यांपैकी एक असलेल्या पूस नदीचे पात्र गाळ, कचऱ्यासह झुडपांमुळे रोडावले आहे. परिणामी या नदीचे पात्र पावसाळ्यानंतरच कोरडे पडू लागते. सद्यस्थितीत या नदीचे पात्र पूर्णपणे कोरडे पडले आहे. या नदीवर अवलंबून असलेल्या गावांतून नदीचे पुनरुज्जीवन करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.वाशिम जिल्ह्यातून वाहणाºया प्रमुख नद्यांमध्ये अरुणावती, काटेपूर्णा, कास नदी, चंद्रभागा,पैनगंगा आणि बेंबळा नदीसह पूस नदीचा समावेश आहे. पूस नदी ही पैनगंगा या नदीची उपनदी आहे.  ही नदी वाशिम जिल्ह्यात उगम पावते. पुढे ही नदी यवतमाळ जिल्ह्यातील माहूरजवळ हिवरा संगम येथे पैनगंगेला जाऊन मिळते. या नदीवर अलिकडेच वाशिम जिल्ह्यातील वारा जहॉगिर येथे सिंचन प्रकल्पाची उभारणी करण्यात आली असून, या प्रकल्पाद्वारे शेकडो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. तथापि, या नदीचे अस्तित्व टिकविण्यासाठी फारसे प्रयत्न प्रशासकीय स्तरावर होत असल्याचे दिसत नाही. कधीकाळी खळखळ वाहणाºया नदीचे पात्र आता गाळ, कचऱ्यासह झुडपांमुळे रोडावल्याने ती हिवाळ्यापासूनच कोरडी पडू लागते. त्यामुळे जिल्ह्यात या नदीच्या काठावर वसलेल्या शेकडो गावांना या नदीचा फायदा होत नाही. गुरांच्या पाण्यासाठी आधार ठरणारे नदीपात्र आता पूर्णपणे कोरडे पडले आहे.  यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथून वाहणाºया पूस नदीला गेल्या काही वर्षांत साचलेला कचरा, गाळ यामुळे डबक्याचे स्वरूप आले होते. याची दखल घेत नाम फाउंडेशन व पूस नदी पुनरुज्जीवन अभियान समितीतर्फे 'पूस नदी पुनरुज्जीवन अभियान' राबविण्यात आले. या अभियानाला पुसद येथील नागरिक व सामाजिक संस्थांनी उत्साहाने सहकार्य केल्याचा फायदा यंदा दिसून आला. असेच प्रयत्न वाशिम जिल्ह्यातही होण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :washimवाशिमriverनदी