...............
वाशिम शहरात वाहनांवर कारवाई
वाशिम : शहरातील पाटणी चाैकामध्ये अस्ताव्यस्त वाहने उभी करणाऱ्यांसह मास्कचा वापर न करणाऱ्या वाहनचालकांवर मंगळवारी कारवाई करण्यात आली. ही कारवाई सुरु असताना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले.
................
अरुंद रस्त्यामुळे रहदारीला अडथळा
वाशिम : शहरात काही ठिकाणी आजही अरूंद रस्ते आहेत. यामुळे शहरवासीयांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कुणाच्या घरासमोर वाहन उभे केल्यानंतर वाद होऊन त्याचे रुपांतर भांडणात होत असल्याने किमान मुख्य रस्त्यांचे रुंदीकरण करावे, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
.............
स्वतंत्र कार्यालय देण्याची मागणी
वाशिम : कृषी विभागातील महत्त्वाचे पद असलेल्या तालुका कृषी अधिकाऱ्यांना स्वतंत्र कार्यालय नाही. जिल्ह्यातील बहुतांश तालुका कृषी अधिकारी कार्यालयांचा कारभार हा भाड्याच्या इमारतीत सुरू असून, आवश्यक सुविधा नसल्याने कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे.
.............
खाद्यान्न सुरक्षा जनजागृतीला ‘खो’
वाशिम : नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत खाद्यान्न सुरक्षेचा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे. प्रशासकीय पातळीवरुन यासंबंधी कुठलीही जनजागृती होताना दिसत नाही. जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठकदेखील दरमहा होत नसल्याचे दिसत आहे.
.............
अतिक्रमणाने गायरान जमीन धोक्यात
वाशिम : ग्रामीण भागात बहुतांश गावांमध्ये शेकडो हेक्टर गायरान वनजमीन होती; मात्र वाढते अतिक्रमण व जंगलतोडीमुळे वनजमिनीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष पुरविण्याची मागणी शे. रऊफ यांनी बुधवारी केली.