शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

वाशिममध्ये ग्रामपरिवर्तकांची नियुक्ती: उद्योग, सामाजिक संस्थांच्या सहकार्यातून गावांचा विकास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2018 13:42 IST

मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून एक हजार गावे विकसित करणे या मिशनच्या अंमलबजावणीसाठी ‘व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाऊंडेशन’(व्हीएसटीएफ) अर्थात ‘ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशन’ची स्थापना करण्यात आली आहे.

वाशिम -  मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून एक हजार गावे विकसित करणे या मिशनच्या अंमलबजावणीसाठी ‘व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाऊंडेशन’(व्हीएसटीएफ) अर्थात ‘ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशन’ची स्थापना करण्यात आली आहे. या अंतर्गत गावांचा शाश्वत विकास घडविण्यात येणार असून, यामध्ये वाशिम जिल्ह्यातील निवडक गावांचा समावेश करण्यात आला आहे. या अभियानाची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी  ग्राम सामाजिक परिवर्तकांची नेमणूक करण्यात आली आहे. 

शासनाचा निधी, कार्पोरेट कंपन्यांची कार्यकुशलता, लोकसहभाग, व्यावसायिक दृष्टीकोन व तंत्रज्ञानाच्या एकत्रीकरणातून विकासापासून दूर राहिलेल्या खेड्यांचा विकास करण्याचे काम ग्रामीण विकास फेलोशिपद्वारे करण्यात येत आहे. ग्राम परिवर्तकांच्या मार्फत खेड्यांचा शाश्वत विकास घडवून ग्रामपरिवर्तनाची चळवळ गतीमान केली जाणार आहे. ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ सुब्रह्मण्यम यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ग्रामपरिवर्तनाची चळवळ साकारली आहे. ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या मदतीसाठी कॉपोर्रेट क्षेत्र पुढे सरसावल्याने ही चळवळ अधिक गतीमान होताना दिसत आहे.

खेड्यांच्या शाश्‍वत विकासासाठी लोकसहभागातून ग्रामविकास आराखडा निर्माण केला जाणार आहे. ग्रामसभेत आराखड्याला मंजुरी घेऊन जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक मंजुरी देण्यात येणार आहे. सदर आराखड्याची कामे विविध शासन योजनेतून सांगड घालून करण्यात येणार आहेत. सदर योजनेच्या यशस्वीतेसाठी सरकारची विविध खाती, विविध उद्योगसमूह, स्वयंसेवी संस्था व लोकसहभाग यातून सर्वांगीण विकासाचे मॉडेल राबविणारी ही योजना आहे. यामध्ये आरोग्य, रोजगार, स्वच्छता, मलनि:सारण, शेती, प्रशिक्षण, घरकुल योजना, दुर्गम भागात विजेची सुविधा, डिजीटल कनेक्टीव्हिटी, कौशल्य विकास, जलसंचय या मुख्य मानव विकास निर्देशांंवर भर दिला जाणार आहे. राज्यातील खाजगी आणि सार्वजनिक संस्था, उद्योगसमूह तसेच वित्तीय संस्था यांच्या सामाजिक दायित्व उपक्रमाच्या (सी.एस.आर.) माध्यमातून ग्रामीण भागातील एक हजार गावांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासह ही गावे शाश्‍वत विकासासाठी सक्षम करण्याचा महत्त्वाकांशी उपक्रम ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातून राबविण्यात येत आहे.

विविध सामाजिक आव्हानांना तोंड देणा-या खेड्यांचे रुपांतर आदर्श गावांत करण्याचे मुख्य उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या अभियानासाठी संचालक मंडळ, सल्लागार मंडळ, कार्यकारी मंडळ, यांची स्थापना करण्यात आली असून, मुख्यमंत्री ग्रामीण फेलोशिप कार्यक्रमांतर्गत ग्रामपरिवर्तकांची निवड करण्यात आली आहे. ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत ग्राम विकास विभाग नोडेल एजन्सी म्हणून काम पाहत आहे.