शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
3
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
4
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
5
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
6
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
7
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
8
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
9
Navratri 2025: वडापावची क्रेव्हिंग होतेय? झटपट करा 'हा' उपासाचा कुरकुरीत बटाटेवडा
10
काय सांगता? स्लिम होण्याचा ट्रेंड जीवघेणा; बारीक लोकांमध्ये अकाली मृत्यूचा धोका तिप्पट
11
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
12
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
13
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
14
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
15
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
16
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
17
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
18
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
19
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
20
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

"नावली जि.प. शाळा पॅटर्न" राबविण्याचा निर्धार

By admin | Updated: July 3, 2017 20:29 IST

वाशिम : वर्षातील ३६५ दिवसही भरणारी नावली येथील जिल्हा परिषद शाळा इतरांसाठी प्रेरणादायी ठरत असून, या शाळेचा पॅटर्न अन्य जिल्हा परिषद शाळेत राबविण्याचा निर्धार जिल्हा परिषद प्रशासनाने केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वर्षातील ३६५ दिवसही भरणारी नावली येथील जिल्हा परिषद शाळा इतरांसाठी प्रेरणादायी ठरत असून, या शाळेचा पॅटर्न अन्य जिल्हा परिषद शाळेत राबविण्याचा निर्धार जिल्हा परिषद प्रशासनाने केला आहे. यासंदर्भात नावलीच्या शिक्षकांशी संवाद साधला असून, लवकरच तालुकानिहाय बैठका घेतल्या जाणार आहेत, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी सोमवारी दिली.खासगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळांमधील शैक्षणिक दर्जा दर्जेदार नसतो, अशी मानसिकता श्रीमंत गटातील बहुतांश पालकांची होत आहे. यातूनच श्रीमंत गटातील पालक आपल्या पाल्याचा प्रवेश शक्यतोवर जिल्हा परिषद शाळेत निश्चित करीत नसल्याचे दिसून येते. मात्र, हा समज रिसोड तालुक्यातील नावली येथील जिल्हा परिषद शाळेने खोडून काढला आहे. नावली येथील शिक्षकांनी गत वर्षीपासून अनोखे उपक्रम राबविले तसेच पालकांचा विश्वास संपादन केला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेला स्वत:ची शाळा समजून विद्यार्थ्यांना नियोजित वेळेव्यतिरिक्तही शिक्षणाचे धडे दिले. उन्हाळ्यातही सुट्टी न घेता सकाळच्या सत्रात गणित, विज्ञान, भाषा व अन्य विषयांचे ह्यवर्गह्ण घेतले. या सर्व सकारात्मक प्रयत्नांमुळे आजरोजी नावली जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी हाऊसफुल झाल्याने ह्यप्रवेश बंदह्णचे फलक लावण्याची वेळ आली आहे. नावलीच्या शिक्षकांनी ही किमया कशी साधली? याची सविस्तर माहिती घेण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी शनिवार, १ जुलै रोजी सायंकाळी जिल्हा परिषदेत संवाद कार्यक्रम घेतला. यावेळी शिक्षण व आरोग्य सभापती सुधीर पाटील गोळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास मानकर, रिसोडचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी खराटे, सर्व शिक्षा अभियानाचे अभियंता माहोरे, गवई आदींची उपस्थिती होती. यावेळी नावली शाळेचे मुख्याध्यापक गारडे म्हणाले की, आपली शाळा समजून विद्यार्थी हा केंद्रबिंदू ठेवल्याने पालकांचा विश्वास बसला. यापूर्वी नावली गावातून रिसोड, मालेगाव येथे तीन स्कूल बसमधून विद्यार्थी शिक्षणासाठी खासगी शाळेत जात होते. नावली जिल्हा परिषद शाळेतही अनोखे उपक्रम राबविल्याने आणि शाळेत आवश्यक त्या सर्व भौतिक सुविधा उपलब्ध झाल्याने यावर्षी नावली येथे अन्य ठिकाणाची एकही स्कूल बस विद्यार्थी घेण्यासाठी येत नाही. नावलीचा हा उपक्रम जिल्ह्यातील अन्य जिल्हा परिषद शाळांनी राबविल्यास जिल्हा परिषद शाळांवर पालकांचा विश्वास बसेल, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली. यासंदर्भात मुख्याध्यापकांशी चर्चा करण्यासाठी लवकरच तालुकास्तरावर बैठक आयोजित करण्याच्या सूचना पाटील यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना केल्या.