शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
4
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
5
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
6
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
8
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
9
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
10
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
11
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
12
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
13
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
14
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
15
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
16
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
17
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
18
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
19
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
20
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास

"नावली जि.प. शाळा पॅटर्न" राबविण्याचा निर्धार

By admin | Updated: July 3, 2017 20:29 IST

वाशिम : वर्षातील ३६५ दिवसही भरणारी नावली येथील जिल्हा परिषद शाळा इतरांसाठी प्रेरणादायी ठरत असून, या शाळेचा पॅटर्न अन्य जिल्हा परिषद शाळेत राबविण्याचा निर्धार जिल्हा परिषद प्रशासनाने केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वर्षातील ३६५ दिवसही भरणारी नावली येथील जिल्हा परिषद शाळा इतरांसाठी प्रेरणादायी ठरत असून, या शाळेचा पॅटर्न अन्य जिल्हा परिषद शाळेत राबविण्याचा निर्धार जिल्हा परिषद प्रशासनाने केला आहे. यासंदर्भात नावलीच्या शिक्षकांशी संवाद साधला असून, लवकरच तालुकानिहाय बैठका घेतल्या जाणार आहेत, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी सोमवारी दिली.खासगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळांमधील शैक्षणिक दर्जा दर्जेदार नसतो, अशी मानसिकता श्रीमंत गटातील बहुतांश पालकांची होत आहे. यातूनच श्रीमंत गटातील पालक आपल्या पाल्याचा प्रवेश शक्यतोवर जिल्हा परिषद शाळेत निश्चित करीत नसल्याचे दिसून येते. मात्र, हा समज रिसोड तालुक्यातील नावली येथील जिल्हा परिषद शाळेने खोडून काढला आहे. नावली येथील शिक्षकांनी गत वर्षीपासून अनोखे उपक्रम राबविले तसेच पालकांचा विश्वास संपादन केला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेला स्वत:ची शाळा समजून विद्यार्थ्यांना नियोजित वेळेव्यतिरिक्तही शिक्षणाचे धडे दिले. उन्हाळ्यातही सुट्टी न घेता सकाळच्या सत्रात गणित, विज्ञान, भाषा व अन्य विषयांचे ह्यवर्गह्ण घेतले. या सर्व सकारात्मक प्रयत्नांमुळे आजरोजी नावली जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी हाऊसफुल झाल्याने ह्यप्रवेश बंदह्णचे फलक लावण्याची वेळ आली आहे. नावलीच्या शिक्षकांनी ही किमया कशी साधली? याची सविस्तर माहिती घेण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी शनिवार, १ जुलै रोजी सायंकाळी जिल्हा परिषदेत संवाद कार्यक्रम घेतला. यावेळी शिक्षण व आरोग्य सभापती सुधीर पाटील गोळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास मानकर, रिसोडचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी खराटे, सर्व शिक्षा अभियानाचे अभियंता माहोरे, गवई आदींची उपस्थिती होती. यावेळी नावली शाळेचे मुख्याध्यापक गारडे म्हणाले की, आपली शाळा समजून विद्यार्थी हा केंद्रबिंदू ठेवल्याने पालकांचा विश्वास बसला. यापूर्वी नावली गावातून रिसोड, मालेगाव येथे तीन स्कूल बसमधून विद्यार्थी शिक्षणासाठी खासगी शाळेत जात होते. नावली जिल्हा परिषद शाळेतही अनोखे उपक्रम राबविल्याने आणि शाळेत आवश्यक त्या सर्व भौतिक सुविधा उपलब्ध झाल्याने यावर्षी नावली येथे अन्य ठिकाणाची एकही स्कूल बस विद्यार्थी घेण्यासाठी येत नाही. नावलीचा हा उपक्रम जिल्ह्यातील अन्य जिल्हा परिषद शाळांनी राबविल्यास जिल्हा परिषद शाळांवर पालकांचा विश्वास बसेल, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली. यासंदर्भात मुख्याध्यापकांशी चर्चा करण्यासाठी लवकरच तालुकास्तरावर बैठक आयोजित करण्याच्या सूचना पाटील यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना केल्या.