शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
3
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
4
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
5
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
6
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
7
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
8
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
9
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
10
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
11
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
12
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
13
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
14
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
15
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
16
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
17
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
18
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
19
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
20
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं

मृतक शेतकर्‍याच्या घरासमोरच लोकप्रतिनिधींचे धरणे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 01:28 IST

वाशिम: येथून जवळच असलेल्या वाघळुद येथील शेतकरी किसन मस्के यांनी सततची नापिकी व कर्जाला कंटाळून ४ फेब्रुवारीला गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, ‘विदर्भ आत्मबळ यात्रा’ घेऊन ११ जिल्हय़ांमध्ये भ्रमंती करणारे काटोलचे आमदार डॉ. आशीष देशमुख यांच्यासह इतर लोकप्रतिनिधींनी ५ फेब्रुवारीला मृतक शेतकर्‍याच्या कुटुंबीयाची भेट घेऊन शासनाच्या निषेधार्थ तेथेच धरणे आंदोलन केले.

ठळक मुद्देआमदार डॉ. देशमुख यांची शासनावर टीका विदर्भातील विविध प्रलंबित प्रश्नांवर झाले मंथन

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: येथून जवळच असलेल्या वाघळुद येथील शेतकरी किसन मस्के यांनी सततची नापिकी व कर्जाला कंटाळून ४ फेब्रुवारीला गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, ‘विदर्भ आत्मबळ यात्रा’ घेऊन ११ जिल्हय़ांमध्ये भ्रमंती करणारे काटोलचे आमदार डॉ. आशीष देशमुख यांच्यासह इतर लोकप्रतिनिधींनी ५ फेब्रुवारीला मृतक शेतकर्‍याच्या कुटुंबीयाची भेट घेऊन शासनाच्या निषेधार्थ तेथेच धरणे आंदोलन केले.विदर्भाची सद्य:स्थिती, सिंचनाचा अनुशेष, शेतकर्‍यांचे विविध प्रश्न, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, उद्योगधंदे, भारनियमन, कुपोषण, नक्षलवाद यासह इतर प्रश्नांवर विदर्भातील जनतेची मते जाणून घेण्यासाठी आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी ‘विदर्भ आत्मबळ यात्रा’ काढली असून, ७ जानेवारीपासून निघालेली ही यात्रा १३ फेब्रुवारीपर्यंत विदर्भातील ६२ मतदारसंघांमधून भ्रमंती करणार आहे. दरम्यान, ५ फेब्रुवारीला आमदार डॉ. देशमुख यांनी वाघळुद येथील शेतकरी किसन मस्के यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. केवळ १0 हजारांच्या कर्जासाठी किसन मस्के यांना आत्महत्या करावी लागली, ही बाब अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगून त्यांनी शासनच्या धोरणावर कडाडून टीका केली. याप्रसंगी आमदार अमित झनक यांच्यासह अँड. किरण सरनाईक, जुगल कोठारी, दत्तराव धांडे, सरपंच कृष्णा देशमुख, तहसीलदार राजेश वजिरे उपस्थित होते. तत्पूर्वी, विदर्भ आत्मबळ यात्रेसोबत आलेल्या डॉ. देशमुख आणि इतर कार्यकर्त्यांनी वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर काही वेळ धरणे आंदोलन करून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. देशमुख म्हणाले, की कापूस, सोयाबीन यासारख्या खरीप पिकांना दीडपटीने मिळणारा हमीभाव काय राहील, हे राज्य सरकारने जाहीर करावे, निव्वळ घोषणाबाजी करून शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत, बेरोजगारांना रोजगार मिळणार नाही. त्यामुळे शासनाने ठोस धोरण जाहीर करणे अपेक्षित आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. सोयाबीनवरील लाल्या आणि कापसावरील बोंडअळीचा प्रादुर्भाव शेतकर्‍यांना त्रस्त करून सोडत आहे. अपूर्ण सिंचन प्रकल्पांसाठी अत्यल्प निधी मिळतो, म्हणूनच सिंचनाचा अनुशेष वाढत आहे. शेतीला पुरेशी वीज मिळणे दुरापास्त झाले आहे. हे सर्व प्रश्न कसे सुटतील, याचे उत्तर शासनाने द्यायला हवे, असे ते म्हणाले. 

टॅग्स :washimवाशिमagitationआंदोलनFarmerशेतकरी