शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
2
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
3
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
4
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
5
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
6
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
7
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
8
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
9
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
10
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
11
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
12
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
13
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
14
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
15
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
16
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
17
धबधबे, बोटिंग आणि निसर्ग सौंदर्य; कांडवनला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी   
18
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
19
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
20
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट

मृतक शेतकर्‍याच्या घरासमोरच लोकप्रतिनिधींचे धरणे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 01:28 IST

वाशिम: येथून जवळच असलेल्या वाघळुद येथील शेतकरी किसन मस्के यांनी सततची नापिकी व कर्जाला कंटाळून ४ फेब्रुवारीला गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, ‘विदर्भ आत्मबळ यात्रा’ घेऊन ११ जिल्हय़ांमध्ये भ्रमंती करणारे काटोलचे आमदार डॉ. आशीष देशमुख यांच्यासह इतर लोकप्रतिनिधींनी ५ फेब्रुवारीला मृतक शेतकर्‍याच्या कुटुंबीयाची भेट घेऊन शासनाच्या निषेधार्थ तेथेच धरणे आंदोलन केले.

ठळक मुद्देआमदार डॉ. देशमुख यांची शासनावर टीका विदर्भातील विविध प्रलंबित प्रश्नांवर झाले मंथन

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: येथून जवळच असलेल्या वाघळुद येथील शेतकरी किसन मस्के यांनी सततची नापिकी व कर्जाला कंटाळून ४ फेब्रुवारीला गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, ‘विदर्भ आत्मबळ यात्रा’ घेऊन ११ जिल्हय़ांमध्ये भ्रमंती करणारे काटोलचे आमदार डॉ. आशीष देशमुख यांच्यासह इतर लोकप्रतिनिधींनी ५ फेब्रुवारीला मृतक शेतकर्‍याच्या कुटुंबीयाची भेट घेऊन शासनाच्या निषेधार्थ तेथेच धरणे आंदोलन केले.विदर्भाची सद्य:स्थिती, सिंचनाचा अनुशेष, शेतकर्‍यांचे विविध प्रश्न, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, उद्योगधंदे, भारनियमन, कुपोषण, नक्षलवाद यासह इतर प्रश्नांवर विदर्भातील जनतेची मते जाणून घेण्यासाठी आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी ‘विदर्भ आत्मबळ यात्रा’ काढली असून, ७ जानेवारीपासून निघालेली ही यात्रा १३ फेब्रुवारीपर्यंत विदर्भातील ६२ मतदारसंघांमधून भ्रमंती करणार आहे. दरम्यान, ५ फेब्रुवारीला आमदार डॉ. देशमुख यांनी वाघळुद येथील शेतकरी किसन मस्के यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. केवळ १0 हजारांच्या कर्जासाठी किसन मस्के यांना आत्महत्या करावी लागली, ही बाब अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगून त्यांनी शासनच्या धोरणावर कडाडून टीका केली. याप्रसंगी आमदार अमित झनक यांच्यासह अँड. किरण सरनाईक, जुगल कोठारी, दत्तराव धांडे, सरपंच कृष्णा देशमुख, तहसीलदार राजेश वजिरे उपस्थित होते. तत्पूर्वी, विदर्भ आत्मबळ यात्रेसोबत आलेल्या डॉ. देशमुख आणि इतर कार्यकर्त्यांनी वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर काही वेळ धरणे आंदोलन करून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. देशमुख म्हणाले, की कापूस, सोयाबीन यासारख्या खरीप पिकांना दीडपटीने मिळणारा हमीभाव काय राहील, हे राज्य सरकारने जाहीर करावे, निव्वळ घोषणाबाजी करून शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत, बेरोजगारांना रोजगार मिळणार नाही. त्यामुळे शासनाने ठोस धोरण जाहीर करणे अपेक्षित आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. सोयाबीनवरील लाल्या आणि कापसावरील बोंडअळीचा प्रादुर्भाव शेतकर्‍यांना त्रस्त करून सोडत आहे. अपूर्ण सिंचन प्रकल्पांसाठी अत्यल्प निधी मिळतो, म्हणूनच सिंचनाचा अनुशेष वाढत आहे. शेतीला पुरेशी वीज मिळणे दुरापास्त झाले आहे. हे सर्व प्रश्न कसे सुटतील, याचे उत्तर शासनाने द्यायला हवे, असे ते म्हणाले. 

टॅग्स :washimवाशिमagitationआंदोलनFarmerशेतकरी