शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

मृतक शेतकर्‍याच्या घरासमोरच लोकप्रतिनिधींचे धरणे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 01:28 IST

वाशिम: येथून जवळच असलेल्या वाघळुद येथील शेतकरी किसन मस्के यांनी सततची नापिकी व कर्जाला कंटाळून ४ फेब्रुवारीला गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, ‘विदर्भ आत्मबळ यात्रा’ घेऊन ११ जिल्हय़ांमध्ये भ्रमंती करणारे काटोलचे आमदार डॉ. आशीष देशमुख यांच्यासह इतर लोकप्रतिनिधींनी ५ फेब्रुवारीला मृतक शेतकर्‍याच्या कुटुंबीयाची भेट घेऊन शासनाच्या निषेधार्थ तेथेच धरणे आंदोलन केले.

ठळक मुद्देआमदार डॉ. देशमुख यांची शासनावर टीका विदर्भातील विविध प्रलंबित प्रश्नांवर झाले मंथन

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: येथून जवळच असलेल्या वाघळुद येथील शेतकरी किसन मस्के यांनी सततची नापिकी व कर्जाला कंटाळून ४ फेब्रुवारीला गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, ‘विदर्भ आत्मबळ यात्रा’ घेऊन ११ जिल्हय़ांमध्ये भ्रमंती करणारे काटोलचे आमदार डॉ. आशीष देशमुख यांच्यासह इतर लोकप्रतिनिधींनी ५ फेब्रुवारीला मृतक शेतकर्‍याच्या कुटुंबीयाची भेट घेऊन शासनाच्या निषेधार्थ तेथेच धरणे आंदोलन केले.विदर्भाची सद्य:स्थिती, सिंचनाचा अनुशेष, शेतकर्‍यांचे विविध प्रश्न, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, उद्योगधंदे, भारनियमन, कुपोषण, नक्षलवाद यासह इतर प्रश्नांवर विदर्भातील जनतेची मते जाणून घेण्यासाठी आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी ‘विदर्भ आत्मबळ यात्रा’ काढली असून, ७ जानेवारीपासून निघालेली ही यात्रा १३ फेब्रुवारीपर्यंत विदर्भातील ६२ मतदारसंघांमधून भ्रमंती करणार आहे. दरम्यान, ५ फेब्रुवारीला आमदार डॉ. देशमुख यांनी वाघळुद येथील शेतकरी किसन मस्के यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. केवळ १0 हजारांच्या कर्जासाठी किसन मस्के यांना आत्महत्या करावी लागली, ही बाब अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगून त्यांनी शासनच्या धोरणावर कडाडून टीका केली. याप्रसंगी आमदार अमित झनक यांच्यासह अँड. किरण सरनाईक, जुगल कोठारी, दत्तराव धांडे, सरपंच कृष्णा देशमुख, तहसीलदार राजेश वजिरे उपस्थित होते. तत्पूर्वी, विदर्भ आत्मबळ यात्रेसोबत आलेल्या डॉ. देशमुख आणि इतर कार्यकर्त्यांनी वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर काही वेळ धरणे आंदोलन करून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. देशमुख म्हणाले, की कापूस, सोयाबीन यासारख्या खरीप पिकांना दीडपटीने मिळणारा हमीभाव काय राहील, हे राज्य सरकारने जाहीर करावे, निव्वळ घोषणाबाजी करून शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत, बेरोजगारांना रोजगार मिळणार नाही. त्यामुळे शासनाने ठोस धोरण जाहीर करणे अपेक्षित आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. सोयाबीनवरील लाल्या आणि कापसावरील बोंडअळीचा प्रादुर्भाव शेतकर्‍यांना त्रस्त करून सोडत आहे. अपूर्ण सिंचन प्रकल्पांसाठी अत्यल्प निधी मिळतो, म्हणूनच सिंचनाचा अनुशेष वाढत आहे. शेतीला पुरेशी वीज मिळणे दुरापास्त झाले आहे. हे सर्व प्रश्न कसे सुटतील, याचे उत्तर शासनाने द्यायला हवे, असे ते म्हणाले. 

टॅग्स :washimवाशिमagitationआंदोलनFarmerशेतकरी