शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
5
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
6
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
7
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
8
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
9
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
10
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
11
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
12
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
13
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
14
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
15
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
16
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
17
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
18
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
19
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
20
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 

किटकनाशक प्राशन केलेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 3:56 PM

येथील शेतकरी उल्हास चंदू जाधव (४५) यांनी १७ जुलै रोजी किटकनाशक औषध प्राशन केले. यवतमाळच्या रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा २० जूलै रोजी मृत्यू झाला. 

लोकमत न्यूज नेटवर्कतळप बु. (वाशिम) : गेल्या चार वर्षांपासून सातत्याने ओढवत असलेली दुष्काळी परिस्थिती आणि याहीवर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने अंगाशिरावर वाढत चाललेले बँकेचे कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेत येथील शेतकरी उल्हास चंदू जाधव (४५) यांनी १७ जुलै रोजी किटकनाशक औषध प्राशन केले. यवतमाळच्या रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा २० जूलै रोजी मृत्यू झाला. प्राप्त माहितीनुसार, तळप बु. येथील शेतकरी उल्हास जाधव यांच्या नावे दोन एकर  शेती असून त्यावरच स्वत:सह पत्नी आणि दोन मुलींचा ते उदरनिर्वाह करित असत. तीन ते चार वर्षांपासून मात्र सततच्या दुष्काळामुळे कुटूंबाचा गाडा ओढणे अशक्य झाले. यावर्षी त्यांनी भारतीय स्टेट बँकेच्या मानोरा शाखेकडून खरीप हंगामाकरिता ३७ हजार रुपयांचे कर्ज घेतले. त्याआधारे दोन एकर शेतात पेरणी केली; मात्र पावसाने दडी मारल्याने डोळ्यादेखील पीक सुकत असल्याने पाहून ते चिंताग्रस्त झाले आणि याच विवंचनेत त्यांनी १७ जुल ै रोजी शेतात किटकनाशक औषध प्राशन केले. त्यांना तातडीने उपचारासाठी यवतमाळ येथे हलविण्यात आले; परंतु २० जुलै रोजी उपचारादम्यान त्यांचा मृत्यू झाला. शेतकरी उल्हास जाधव यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.

टॅग्स :washimवाशिमfarmer suicideशेतकरी आत्महत्या