शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

किटकनाशक प्राशन केलेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 15:56 IST

येथील शेतकरी उल्हास चंदू जाधव (४५) यांनी १७ जुलै रोजी किटकनाशक औषध प्राशन केले. यवतमाळच्या रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा २० जूलै रोजी मृत्यू झाला. 

लोकमत न्यूज नेटवर्कतळप बु. (वाशिम) : गेल्या चार वर्षांपासून सातत्याने ओढवत असलेली दुष्काळी परिस्थिती आणि याहीवर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने अंगाशिरावर वाढत चाललेले बँकेचे कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेत येथील शेतकरी उल्हास चंदू जाधव (४५) यांनी १७ जुलै रोजी किटकनाशक औषध प्राशन केले. यवतमाळच्या रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा २० जूलै रोजी मृत्यू झाला. प्राप्त माहितीनुसार, तळप बु. येथील शेतकरी उल्हास जाधव यांच्या नावे दोन एकर  शेती असून त्यावरच स्वत:सह पत्नी आणि दोन मुलींचा ते उदरनिर्वाह करित असत. तीन ते चार वर्षांपासून मात्र सततच्या दुष्काळामुळे कुटूंबाचा गाडा ओढणे अशक्य झाले. यावर्षी त्यांनी भारतीय स्टेट बँकेच्या मानोरा शाखेकडून खरीप हंगामाकरिता ३७ हजार रुपयांचे कर्ज घेतले. त्याआधारे दोन एकर शेतात पेरणी केली; मात्र पावसाने दडी मारल्याने डोळ्यादेखील पीक सुकत असल्याने पाहून ते चिंताग्रस्त झाले आणि याच विवंचनेत त्यांनी १७ जुल ै रोजी शेतात किटकनाशक औषध प्राशन केले. त्यांना तातडीने उपचारासाठी यवतमाळ येथे हलविण्यात आले; परंतु २० जुलै रोजी उपचारादम्यान त्यांचा मृत्यू झाला. शेतकरी उल्हास जाधव यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.

टॅग्स :washimवाशिमfarmer suicideशेतकरी आत्महत्या