शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी विहिरीवर जीवघेणी गर्दी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2018 14:21 IST

माळशेलूत भीषण पाणीटंचाई

मंगरुळपीर: तालुक्यात पाणीटंचाईची समस्या रौद्र रुप धारण करू लागली आहे. माळशेलू येथे पिण्याच्या पाण्यासाठी विहिरीवर अक्षरश: जीवघेणी गर्दी उसळत असून, यामुळे एखादी व्यक्ती विहिरीत पडून अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मंगरुळपीर तालुक्यातील निम्म्यापेक्षा अधिक गावांत पाणीटंचाईने रौद्र रूप धारण केले आहे. त्या दृष्टीने उपाययोजना तोकड्या असल्यानं पाण्याअभावी ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत. पाण्यासाठी ग्रामस्थांना तीन किलोमीटरची पायपीट करावी लागते आहे. तालुक्यातील माळशेलूमध्ये पाणीटंचाईची समस्या खूपच तीव्र झाली आहे. तब्बल १८०९ लोकसंख्या असलेल्या या गावातील जलस्रोत आटल्यानं भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणी टंचाईची  समस्या कमी करण्यासाठी ग्रामपंचायतच्यावतीने गावाबाहेर, दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. या विहिरीतील पाणी पाईपलाईनने गावातील विहिरीत चार ते पाच दिवसांनी सोडण्यात येते. या विहिरीत पाणी सोडताच गावकरी पाणी भरण्यासाठी विहिरीवर धाव घेतात. यामध्ये महिला, पुरुष, मुले आणि मुलींचाही समावेश असतो. आधीच आकाराने फारशी लहान असलेल्या या विहिरीच्या काठावर दाटीवाटीने लोक उभे राहून पाणी ओढतात. अशात घाईघाईने पाणी ओढताना स्वत:चा तोल जाऊन किंवा दुसऱ्याचा धक्का लागून एखादी व्यक्ती विहिरीत पडून दुर्घटना घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.  

टॅग्स :Waterपाणीwashimवाशिम