शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पाण्यासाठी विहिरीवर जीवघेणी गर्दी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2018 14:21 IST

माळशेलूत भीषण पाणीटंचाई

मंगरुळपीर: तालुक्यात पाणीटंचाईची समस्या रौद्र रुप धारण करू लागली आहे. माळशेलू येथे पिण्याच्या पाण्यासाठी विहिरीवर अक्षरश: जीवघेणी गर्दी उसळत असून, यामुळे एखादी व्यक्ती विहिरीत पडून अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मंगरुळपीर तालुक्यातील निम्म्यापेक्षा अधिक गावांत पाणीटंचाईने रौद्र रूप धारण केले आहे. त्या दृष्टीने उपाययोजना तोकड्या असल्यानं पाण्याअभावी ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत. पाण्यासाठी ग्रामस्थांना तीन किलोमीटरची पायपीट करावी लागते आहे. तालुक्यातील माळशेलूमध्ये पाणीटंचाईची समस्या खूपच तीव्र झाली आहे. तब्बल १८०९ लोकसंख्या असलेल्या या गावातील जलस्रोत आटल्यानं भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणी टंचाईची  समस्या कमी करण्यासाठी ग्रामपंचायतच्यावतीने गावाबाहेर, दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. या विहिरीतील पाणी पाईपलाईनने गावातील विहिरीत चार ते पाच दिवसांनी सोडण्यात येते. या विहिरीत पाणी सोडताच गावकरी पाणी भरण्यासाठी विहिरीवर धाव घेतात. यामध्ये महिला, पुरुष, मुले आणि मुलींचाही समावेश असतो. आधीच आकाराने फारशी लहान असलेल्या या विहिरीच्या काठावर दाटीवाटीने लोक उभे राहून पाणी ओढतात. अशात घाईघाईने पाणी ओढताना स्वत:चा तोल जाऊन किंवा दुसऱ्याचा धक्का लागून एखादी व्यक्ती विहिरीत पडून दुर्घटना घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.  

टॅग्स :Waterपाणीwashimवाशिम