शहरं
Join us  
Trending Stories
1
रिलायन्सला मोठा झटका! चीनचा तंत्रज्ञान देण्यास नकार; लिथियम-आयन बॅटरी सेल निर्मिती प्रकल्प तूर्तास स्थगित
2
लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
3
आजचे राशीभविष्य : सोमवार १२ जानेवारी २०२६; या राशीचे लोक आज दृढ विचार आणि आत्मविश्वासाने कामे पूर्ण करू शकतील
4
Home Loan घेण्याचा विचार करताय? मग थांबा! 'या' सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त होम लोन; जाणून घ्या
5
मुंबई: नितेश राणेंच्या बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ, चिठ्ठीत लिहिलं होतं की...
6
'तर मराठी माणसाची ही शेवटची निवडणूक ठरेल'; आज चुकलात तर म्हणत राज ठाकरेंचा इशारा
7
प्रचारासाठी यूपी, बिहारमधून १४२ गाड्या मुंबईत दाखल; वाहनांना आरटीओकडून सशर्त परवानगी
8
भ्रष्टाचार करुन पैसे खाल्ले, हेही फलकावर लिहा; कामचोर म्हणत एकनाथ शिंदे यांची टीका
9
देशातील १० पैकी ७ मोठ्या कंपन्यांचे मार्केट कॅप ३.६३ लाख कोटींनी कमी झालं, रिलायन्सला सर्वात जास्त नुकसान
10
अंबरनाथ, बदलापूर तो झाँकी हैं, कल्याण-डोंबिवली बाकी हैं! शिंदेसेनेला खिंडीत पकडण्याची खेळी
11
"जो रामाचा नाही, तो कामाचा नाही, ते सत्तेत असताना घरात बसले होते"; देवेंद्र फडणवीस यांची टीका
12
सांबा, राजौरी आणि पूंछमध्ये संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन दिसले, नियंत्रण रेषेवर घुसखोरीची भीती, सुरक्षा दल हाय अलर्टवर
13
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...  
14
बाळासाहेब असते तर.. त्यांना आनंद झाला असता; पहिल्यांदाच राज यांनी बोलून दाखविली मनातील भावना
15
"मुंबईचे पुन्हा बॉम्बे करण्याचा डाव"; शिवाजी पार्कवरील सभेत उद्धव ठाकरेंचा आरोप
16
पुण्यातून निवडणूक लढवणार का?, देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
17
"...नाही तर अजितदादांची जाहीर माफी मागा, तुमचे हेच चाळे"; उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले
18
IND vs NZ : ना अनुष्का ना वामिका! जिंकलेली प्रत्येक ट्रॉफी थेट ‘या’ व्यक्तीकडे पाठवतो विराट, म्हणाला…
19
BMC Elections 2026 : "साडे तीनशे वर्षापूर्वी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात..."; जयंत पाटलांची भाजपावर टीका
20
WPL 2026 : अनुष्का शर्मानं 'फ्लाइंग शो'सह जेमीचा षटकार रोखला! अखेरच्या षटकात सोफीनं सामना फिरवला
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पावसामुळे झेंडू फुलशेतीची नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 16:19 IST

या पावसामुळे मोरगव्हाण येथील तीन शेतकºयांची झेंडु फुलांची शेती जमीनदोस्त झाल्याने त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 

- अशोक चोपडेभर जहॉगिर (रिसोड) :  रिसोड तालुक्यातील भर जहॉगिर परिसरात पावसाअभावी पिके संकटात सापडल्याने शेतकरी वरुणराजाचा धावा करीत होते. अशात ३० आॅगष्ट रोजी परिसरात पावसाने हजेरी लावली तीसुद्धा नुकसान करण्यासाठीच या पावसामुळे मोरगव्हाण येथील तीन शेतकºयांची झेंडु फुलांची शेती जमीनदोस्त झाल्याने त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मोरगव्हाण येथील शेतकरी तथा खरेदी विक्री संचालक विठलराव कोकाटे, ज्ञानबा कुंडलीक कोकाटे आणि दत्ता तुकाराम पारधी यांनी पारंपरिक खरीप पिकांसह आर्थिक विकास साधण्यासाठी वेगळा प्रयोग करताना हंगामी फुलशेती म्हणून झेंडुची लागवड केली होती. यात ज्ञानबा कुंडलीक कोकाटे यांनी दोन एकरात, विठलराव कोकाटे यांनी एका एकरात, तर दत्ता पारधी यांनीही एक एकराहून अधिक क्षेत्रात झेंडुची लागवड केली होती. या पिकासाठी त्यांनी मोठा खर्च केला. निंदण, खुरपण करून हे पिक वाढविले. आता हे पीक कळ्यांवर असून, येत्या महिनाभरात फुले परिपक्व होऊन शेतकºयांना त्यापासून मोठे उत्पन्न मिळण्याचा विश्वास वाटू लागला होता. गत १५ दिवसांपासून पावसाचा पत्ताच नसल्याने शेतकरी पावसाची प्रतिक्षाही करू लागले होते. अशातच पावसाने ऐन पोळ्याच्या दिवशी हजेरी लावल्याने शेतकरी सुखावले खरे; परंतु तब्बल दीड तास बरसणारा हा पाऊस झेंडूची शेती जमीनदोस्त करून गेला. आता या झाडांना फु ले उमलण्याची आशाच राहिली नाही. त्यामुळे या तिन्ही शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. महसूल आणि कृषी विभागाने या नुकसानाची पाहणी करून आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी हे शेतकरी करीत आहेत.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरीRisodरिसोड