शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

मुसळधार पावसामुळे झेंडू फुलशेतीची नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 16:19 IST

या पावसामुळे मोरगव्हाण येथील तीन शेतकºयांची झेंडु फुलांची शेती जमीनदोस्त झाल्याने त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 

- अशोक चोपडेभर जहॉगिर (रिसोड) :  रिसोड तालुक्यातील भर जहॉगिर परिसरात पावसाअभावी पिके संकटात सापडल्याने शेतकरी वरुणराजाचा धावा करीत होते. अशात ३० आॅगष्ट रोजी परिसरात पावसाने हजेरी लावली तीसुद्धा नुकसान करण्यासाठीच या पावसामुळे मोरगव्हाण येथील तीन शेतकºयांची झेंडु फुलांची शेती जमीनदोस्त झाल्याने त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मोरगव्हाण येथील शेतकरी तथा खरेदी विक्री संचालक विठलराव कोकाटे, ज्ञानबा कुंडलीक कोकाटे आणि दत्ता तुकाराम पारधी यांनी पारंपरिक खरीप पिकांसह आर्थिक विकास साधण्यासाठी वेगळा प्रयोग करताना हंगामी फुलशेती म्हणून झेंडुची लागवड केली होती. यात ज्ञानबा कुंडलीक कोकाटे यांनी दोन एकरात, विठलराव कोकाटे यांनी एका एकरात, तर दत्ता पारधी यांनीही एक एकराहून अधिक क्षेत्रात झेंडुची लागवड केली होती. या पिकासाठी त्यांनी मोठा खर्च केला. निंदण, खुरपण करून हे पिक वाढविले. आता हे पीक कळ्यांवर असून, येत्या महिनाभरात फुले परिपक्व होऊन शेतकºयांना त्यापासून मोठे उत्पन्न मिळण्याचा विश्वास वाटू लागला होता. गत १५ दिवसांपासून पावसाचा पत्ताच नसल्याने शेतकरी पावसाची प्रतिक्षाही करू लागले होते. अशातच पावसाने ऐन पोळ्याच्या दिवशी हजेरी लावल्याने शेतकरी सुखावले खरे; परंतु तब्बल दीड तास बरसणारा हा पाऊस झेंडूची शेती जमीनदोस्त करून गेला. आता या झाडांना फु ले उमलण्याची आशाच राहिली नाही. त्यामुळे या तिन्ही शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. महसूल आणि कृषी विभागाने या नुकसानाची पाहणी करून आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी हे शेतकरी करीत आहेत.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरीRisodरिसोड