शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

पीक विमाधारकांच्या नुकसानाचा अहवाल विभागस्तरावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 15:50 IST

या अहवालात बाधित शेतकºयांची नावे, गावे, पेरणीचे क्षेत्र, बाधित क्षेत्र ही अचूक माहिती नमूद करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले. यातील पीकविमाधारक शेतकऱ्यांच्या नुकसानाचा अहवाल जिल्हा कृषी विभागामार्फत विभागस्तरावर पाठविण्यात आला आहे. या अहवालानुसार जिल्ह्यात २ लाख ३ हजार ४०० शेतकऱ्यांच्या १ लाख ७२ हजार ६५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचे नमूद असून, या अहवालाचे परिक्षण करून पीकविमाधारक शेतकºयांना निकषानुसार पीकविमा मंजूर करण्यात येणार आहे.जिल्ह्यात २७ आॅक्टोबर ते ४ नोव्हेंबरदरम्यान अवकाळी पावसामुळे शेतातील उभ्या पिकांसह काढणी केलेल्या सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानामुळे हवालदील झालेल्या शेतकºयांना आधार देण्यासाठी शासनाने महसूल व कृषी विभागाला तातडीने पंचनामे पूर्ण करण्याच्या सुचना केल्या. त्यानंतर प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न करून ८ नोव्हेंबरपर्यंत पिकांचे पंचनामे पूर्ण केले. तथापि, या पंचनाम्यानंतर पीक विमा न भरणाºया आणि पीक विमा भरणाºया शेतकºयांचे स्वतंत्र अहवाल तयार करण्याची कसरत प्रशासनाला करावी लागली. जिल्ह्यात २ लाख ९६ हजार १२५ शेतकºयांनी २ लाख ४ हजार ७८५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचा विमा उतरविला होता. त्यातील १ लाख ५२ हजार १९४ शेतकºयांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानापोटी विम्याचा लाभ मिळण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज केले. या अर्जानुसार प्रशासनाने शेतकºयांच्या नुकसानाचे पंचनामेही केले. यानुसार पीक विमा काढणाºया शेतकºयांपैकी ६५ हजार ५४८ शेतकºयांच्या २८ हजार २६७ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रातील उभ्या पिकांचे, तर १ लाख ३७ हजार ८५२ शेतकºयांच्या १ लाख ४३ हजार ७९८ हेक्टर क्षेत्रातील काढणी केलेल्या पिकांचे नुकसान झाल्याचे आढळून आले. अर्थात पीक विमा काढणाºया एकूण २ लाख ३ हजार ४०० शेतकºयांच्या १ लाख ७२ हजार ६५ पेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. या शेतकºयांना पीकविम्याच्या निकषानुसार मदत देण्यासाठी कृषी विभागाच्यावतीने एक सर्वकष अहवाल तयार करण्यात आला. हा अहवाल विविध प्रपत्रात तयार करावा लागल्याने अहवाल तयार होण्यासाठी तब्बल २० दिवस लागले. या अहवालानुसार अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानाचे दोन प्रकारात वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यात उभ्या पिकांचे क्षेत्र वेगळे असून, काढणी पश्चात पिकांचे क्षेत्र वेगळे आहे. या अहवालात बाधित शेतकºयांची नावे, गावे, पेरणीचे क्षेत्र, बाधित क्षेत्र ही अचूक माहिती नमूद करण्यात आली आहे. विभागस्तरावर होणार पडताळणीवाशिम जिल्ह्यात पीकविमाधारक शेतकºयांचे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे क्षेत्र आणि शेतकºयांची संख्या, तसेच पिकांच्या माहितीचा अहवाल जिल्हा प्रशासनाच्यावतीने विभागीय कृषी सहसंचालकांकडे पाठविण्यात आला आहे. त्यानंतर या अहवालाची विभागीय आयुक्तांमार्फत पडताळणी केली जाणार आहे. या पडताळणीनंतरच शासनाकडे हा अहवाल पाठविण्यात येणार आहे. शेतकºयांना भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत पीकविमा मंजूर केला जाणार असून, सोयाबीन पिकाच्या शंभर टक्के नुकसानापोटी शेतकºयांना एकरी ४३ हजार ५०० रुपये मिळणार आहेत.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी