शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

धरणांची पातळी चिंताजनक; सहाही तालुक्यांत ‘पाणी संकट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 14:30 IST

सहाही तालुक्यांची स्थिती गंभीर असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत बोरसे यांनी शनिवारी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गत तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धोक्यात सापडलेली खरीप हंगामातील पिके तरारली आहेत; परंतु धरणांच्या पाणीपातळीत वाढ झालेली नाही. काही धरणांमधील शिल्लक असलेल्या मृत जलसाठ्यातूनच नागरिकांना पाणी पुरविले जात असून याबाबतीत सहाही तालुक्यांची स्थिती गंभीर असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत बोरसे यांनी शनिवारी दिली.यंदाच्या पावसाळ्यात जून महिना पूर्णत: कोरडा गेला. तसेच जुलै महिनाही अर्धाअधिक उलटून गेल्यानंतरही पावसाचा थांगपत्ता नव्हता. यामुळे खरीप हंगामातील पिके संकटात सापडण्यासोबतच उन्हाळ्यात उद्भवलेली प्रखर पाणीटंचाई देखील कायम होती. दरम्यान, २५ जुलैपासून वातावरणात बदल झाला असून पाऊस होत आहे. यामुळे पाण्याअभावी खरीप हंगामातील पिके धोक्यातून बाहेर पडली आहेत; मात्र रिमझिम स्वरूपातील पावसामुळे जिल्ह्यातील ३ मध्यम आणि १३१ लघू प्रकल्पांच्या पाणीपातळीत कुठलीही वाढ झालेली नाही.मालेगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चाकातिर्थ प्रकल्पातील पाणी कुरळा धरणाच्या विहिरीत सोडून मालेगावकरांची तहान भागविण्यात येत आहे. वाशिम, कारंजा, मंगरूळपीर, मानोरा आणि रिसोड या पाच शहरांसह ग्रामीण भागात मात्र पाणीटंचाईचा प्रश्न कायम आहे. एकबुर्जी प्रकल्पात आजमितीस केवळ एक ते दीड टक्के जलसाठा शिल्लक आहे. दरम्यान, जोपर्यंत मोठा पाऊस होवून शहरांतर्गत नाल्या वाहत्या होत नाहीत, तोपर्यंत धरणे देखील भरणार नाहीत, अशी एकंदरित स्थिती आहे.

बॅरेजच्या पाण्याचा पर्याय खुलागतवर्षी वाशिम नगर परिषदेने पैनगंगा नदीवरील कोकलगाव बॅरेजमध्ये अडविले जाणारे पाणी एकबुर्जी जलाशयापर्यंत आणण्याकरिता पाईपलाईन टाकण्यासह अन्य सुविधांची उभारणी केलेली आहे. दरम्यान, सद्या तसेच यापुढे नगर परिषदेकडून पुढाकार घेतल्यास पैनगंगेचे पाणी कोकलगाव बॅरेजमध्ये अडवून ते एकबुर्जी प्रकल्पात सोडण्यास परवानगी दिली जाईल. धरणात पाणी साठविण्यासाठी हा पर्याय खुला असून नगर परिषदेने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

यंदाच्या पावसाळ्यात जुलै महिन्याच्या प्रारंभी काही प्रमाणात पाऊस झाला; मात्र त्यानंतर मोठ्या प्रमाणात उन्ह पडल्याने धरणांची पाणीपातळी वाढली नाही. गेल्या दोन ते तीन दिवसात पाऊस झाला; परंतु तो देखील मोठ्या स्वरूपातील नसल्याने आहे त्या परिस्थितीत कुठलाही विशेष फरक पडलेला नाही.- प्रशांत बोरसेकार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाईDamधरण