शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीवर, महाविकाआघाडीची काय परिस्थिती?
2
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
3
Jawhar Nagar Parishad Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
4
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
5
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
6
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
7
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
8
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
9
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
10
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
11
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
12
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
13
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
14
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
15
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
16
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
17
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
18
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
19
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
20
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
Daily Top 2Weekly Top 5

धरणांची पातळी चिंताजनक; सहाही तालुक्यांत ‘पाणी संकट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 14:30 IST

सहाही तालुक्यांची स्थिती गंभीर असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत बोरसे यांनी शनिवारी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गत तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धोक्यात सापडलेली खरीप हंगामातील पिके तरारली आहेत; परंतु धरणांच्या पाणीपातळीत वाढ झालेली नाही. काही धरणांमधील शिल्लक असलेल्या मृत जलसाठ्यातूनच नागरिकांना पाणी पुरविले जात असून याबाबतीत सहाही तालुक्यांची स्थिती गंभीर असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत बोरसे यांनी शनिवारी दिली.यंदाच्या पावसाळ्यात जून महिना पूर्णत: कोरडा गेला. तसेच जुलै महिनाही अर्धाअधिक उलटून गेल्यानंतरही पावसाचा थांगपत्ता नव्हता. यामुळे खरीप हंगामातील पिके संकटात सापडण्यासोबतच उन्हाळ्यात उद्भवलेली प्रखर पाणीटंचाई देखील कायम होती. दरम्यान, २५ जुलैपासून वातावरणात बदल झाला असून पाऊस होत आहे. यामुळे पाण्याअभावी खरीप हंगामातील पिके धोक्यातून बाहेर पडली आहेत; मात्र रिमझिम स्वरूपातील पावसामुळे जिल्ह्यातील ३ मध्यम आणि १३१ लघू प्रकल्पांच्या पाणीपातळीत कुठलीही वाढ झालेली नाही.मालेगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चाकातिर्थ प्रकल्पातील पाणी कुरळा धरणाच्या विहिरीत सोडून मालेगावकरांची तहान भागविण्यात येत आहे. वाशिम, कारंजा, मंगरूळपीर, मानोरा आणि रिसोड या पाच शहरांसह ग्रामीण भागात मात्र पाणीटंचाईचा प्रश्न कायम आहे. एकबुर्जी प्रकल्पात आजमितीस केवळ एक ते दीड टक्के जलसाठा शिल्लक आहे. दरम्यान, जोपर्यंत मोठा पाऊस होवून शहरांतर्गत नाल्या वाहत्या होत नाहीत, तोपर्यंत धरणे देखील भरणार नाहीत, अशी एकंदरित स्थिती आहे.

बॅरेजच्या पाण्याचा पर्याय खुलागतवर्षी वाशिम नगर परिषदेने पैनगंगा नदीवरील कोकलगाव बॅरेजमध्ये अडविले जाणारे पाणी एकबुर्जी जलाशयापर्यंत आणण्याकरिता पाईपलाईन टाकण्यासह अन्य सुविधांची उभारणी केलेली आहे. दरम्यान, सद्या तसेच यापुढे नगर परिषदेकडून पुढाकार घेतल्यास पैनगंगेचे पाणी कोकलगाव बॅरेजमध्ये अडवून ते एकबुर्जी प्रकल्पात सोडण्यास परवानगी दिली जाईल. धरणात पाणी साठविण्यासाठी हा पर्याय खुला असून नगर परिषदेने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

यंदाच्या पावसाळ्यात जुलै महिन्याच्या प्रारंभी काही प्रमाणात पाऊस झाला; मात्र त्यानंतर मोठ्या प्रमाणात उन्ह पडल्याने धरणांची पाणीपातळी वाढली नाही. गेल्या दोन ते तीन दिवसात पाऊस झाला; परंतु तो देखील मोठ्या स्वरूपातील नसल्याने आहे त्या परिस्थितीत कुठलाही विशेष फरक पडलेला नाही.- प्रशांत बोरसेकार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाईDamधरण