शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

धरणांची पातळी चिंताजनक; सहाही तालुक्यांत ‘पाणी संकट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 14:30 IST

सहाही तालुक्यांची स्थिती गंभीर असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत बोरसे यांनी शनिवारी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गत तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धोक्यात सापडलेली खरीप हंगामातील पिके तरारली आहेत; परंतु धरणांच्या पाणीपातळीत वाढ झालेली नाही. काही धरणांमधील शिल्लक असलेल्या मृत जलसाठ्यातूनच नागरिकांना पाणी पुरविले जात असून याबाबतीत सहाही तालुक्यांची स्थिती गंभीर असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत बोरसे यांनी शनिवारी दिली.यंदाच्या पावसाळ्यात जून महिना पूर्णत: कोरडा गेला. तसेच जुलै महिनाही अर्धाअधिक उलटून गेल्यानंतरही पावसाचा थांगपत्ता नव्हता. यामुळे खरीप हंगामातील पिके संकटात सापडण्यासोबतच उन्हाळ्यात उद्भवलेली प्रखर पाणीटंचाई देखील कायम होती. दरम्यान, २५ जुलैपासून वातावरणात बदल झाला असून पाऊस होत आहे. यामुळे पाण्याअभावी खरीप हंगामातील पिके धोक्यातून बाहेर पडली आहेत; मात्र रिमझिम स्वरूपातील पावसामुळे जिल्ह्यातील ३ मध्यम आणि १३१ लघू प्रकल्पांच्या पाणीपातळीत कुठलीही वाढ झालेली नाही.मालेगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चाकातिर्थ प्रकल्पातील पाणी कुरळा धरणाच्या विहिरीत सोडून मालेगावकरांची तहान भागविण्यात येत आहे. वाशिम, कारंजा, मंगरूळपीर, मानोरा आणि रिसोड या पाच शहरांसह ग्रामीण भागात मात्र पाणीटंचाईचा प्रश्न कायम आहे. एकबुर्जी प्रकल्पात आजमितीस केवळ एक ते दीड टक्के जलसाठा शिल्लक आहे. दरम्यान, जोपर्यंत मोठा पाऊस होवून शहरांतर्गत नाल्या वाहत्या होत नाहीत, तोपर्यंत धरणे देखील भरणार नाहीत, अशी एकंदरित स्थिती आहे.

बॅरेजच्या पाण्याचा पर्याय खुलागतवर्षी वाशिम नगर परिषदेने पैनगंगा नदीवरील कोकलगाव बॅरेजमध्ये अडविले जाणारे पाणी एकबुर्जी जलाशयापर्यंत आणण्याकरिता पाईपलाईन टाकण्यासह अन्य सुविधांची उभारणी केलेली आहे. दरम्यान, सद्या तसेच यापुढे नगर परिषदेकडून पुढाकार घेतल्यास पैनगंगेचे पाणी कोकलगाव बॅरेजमध्ये अडवून ते एकबुर्जी प्रकल्पात सोडण्यास परवानगी दिली जाईल. धरणात पाणी साठविण्यासाठी हा पर्याय खुला असून नगर परिषदेने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

यंदाच्या पावसाळ्यात जुलै महिन्याच्या प्रारंभी काही प्रमाणात पाऊस झाला; मात्र त्यानंतर मोठ्या प्रमाणात उन्ह पडल्याने धरणांची पाणीपातळी वाढली नाही. गेल्या दोन ते तीन दिवसात पाऊस झाला; परंतु तो देखील मोठ्या स्वरूपातील नसल्याने आहे त्या परिस्थितीत कुठलाही विशेष फरक पडलेला नाही.- प्रशांत बोरसेकार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाईDamधरण