शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

शिथिलता मिळताच पहिल्याच दिवशी बाजारपेठेत गर्दी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 17:49 IST

पहिल्याच दिवशी वाशिमसह जिल्ह्यातील बाजारपेठेत नागरिकांची गर्दी उसळली असून, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालनही झाले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या १७ दिवसांपासून दुपारी २ वाजेपर्यंतच दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी होती. १ आॅगस्टपासून लॉकडाऊन शिथिल केले असून, आता सायंकाळी ५ वाजेपर्यंत बाजारपेठ खुली राहणार आहे. पहिल्याच दिवशी वाशिमसह जिल्ह्यातील बाजारपेठेत नागरिकांची गर्दी उसळली असून, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालनही झाले नाही.बाहेरगावावरून परतणाऱ्या नागरिकांमुळे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. जुलै महिन्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रिसोड व मंगरूळपीर शहरात १५ ते २१ जुलैदरम्यान संपूर्ण लॉकडाऊन तर उर्वरीत शहरात १५ ते ३१ जुलैदरम्यान सकाळी १० ते दुपारी २ या दरम्यान बाजारपेठ खुली होती. लॉकडाऊनसंदर्भात १ आॅगस्टपासून सुधारीत नियमावली लागू झाली. जिल्ह्यात ३१ आॅगस्ट २०२० पर्यंत लॉकडाऊन लागू राहणार आहे. जिल्ह्यात यापूर्वी परवानगी दिलेली सर्व दुकाने, आस्थापना, सेवा सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतच्या कालावधीत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. तसेच दवाखाने (पशुवैद्यकीय दवाखान्यांसह), मेडिकल स्टोअर्स २४ तास सुरु राहणार आहेत. नवीन नियमावलीनुसार दुध संकलन व विक्री, भाजीपाला बाजार सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. सर्व बँका सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरु राहतील. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर पहिल्याच दिवशी वाशिमसह रिसोड, मालेगाव, कारंजा, मानोरा, मंगरूळपीर येथील बाजारपेठेत नागरिकांची गर्दी झाल्याचे दिसून आले. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालनही झाले नाही. वाशिम येथील पाटणी चौकातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणेची चांगलीच दमछाक झाली. बँका सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहणार असतानाही, दुपारच्या सुमारास बँकेत ग्राहकांची एकच गर्दी झाल्याचे दिसून आले. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले.

टॅग्स :washimवाशिमCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक