शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

नुकसान पंचनाम्यांच्या ‘डाटा एन्ट्री’चे काम युद्धस्तरावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 13:25 IST

दुसरा शनिवार या सुटीच्या दिवशीही तालुका कृषी अधिकारी, तलाठी, मंडळ कृषी अधिकाऱ्यांसह अन्य सर्व कर्मचारी तालुका कृषी अधिकारी आणि तहसील कार्यालयातील संगणकांवर ‘डाटा एन्ट्री’करिता हजर असल्याचे दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील ७९५ गावांमधील पिकांचे अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान, नुकसानाचे पंचनामे करण्यात आले असून, आता विभागीय आयुक्त आणि पिकविमा कंपन्यांकडे वस्तूनिष्ठ अहवाल सादर करण्यासाठी प्रशासनाकडून विहित प्रपत्रात पंचनाम्यातील माहिती समाविष्ट करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी दुसरा शनिवार या सुटीच्या दिवशीही तालुका कृषी अधिकारी, तलाठी, मंडळ कृषी अधिकाऱ्यांसह अन्य सर्व कर्मचारी तालुका कृषी अधिकारी आणि तहसील कार्यालयातील संगणकांवर ‘डाटा एन्ट्री’करिता हजर असल्याचे दिसून आले.आॅक्टोबर महिन्याच्या २७ तारखेपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने अक्षरश: थैमान घातले. ३ नोव्हेंबरपर्यंत जोर कायम असलेल्या या पावसामुळे सोंगून शेतात रचून ठेवलेल्या सोयाबिनच्या सुड्या पूर्णत: ओल्या होण्यासह सोंगणीच्या स्थितीत असलेले उभे सोयाबिन, कपाशी, तूर, हळद, फुलांची झाडे, फळबागांना जबर फटका बसला. दरम्यान, शासनाच्या आदेशाचे पालन करित महसूल, कृषी विभागाने तातडीची पावले उचलत नुकसानाचे सर्वेक्षण व पंचनामे करण्याची कामे हाती घेतली. त्यासाठी ८ नोव्हेंबरची अंतीम मुदत देण्यात आली होती. त्यानुसार, जिल्ह्यातील ७९५ गावांमध्ये झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून प्रशासकीय यंत्रणेतील कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडील लिखीत अहवाल कृषी विभाग आणि तहसील कार्यालयांकडे सादर केले आहेत. आता या लिखीत अहवाल गावनिहाय, तहसीलनिहाय वेगवेगळे करून संगणकातील ठराविक प्रपत्रात भरण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी ९ नोव्हेंबरला दुसरा शनिवार हा सुटीचा दिवस असतानाही प्रशासकीय यंत्रणेतील सर्व कर्मचारी तालुका मुख्यालयी तहसील कार्यालय आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालयात हजर असल्याचे दिसून आले. हे काम आटोपल्यानंतर अंतीम अहवाल विभागीय आयुक्त आणि विविध पिकविमा कंपन्यांकडे सादर केले जाणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.‘पीक विमा क्लेम’ अर्जांची पडताळणीजिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात २ लाख ९५ हजार २९० शेतकºयांनी २ लाख ४ हजार १०० हेक्टर क्षेत्रासाठी १७ कोटी ६२ लाख ९३ हजार २१४ रुपये पिकविम्यापोटी भरले आहेत. दरम्यान, २७ आॅक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत अवकाळी पावसामुळे झालेल्या अनेक शेतकºयांनी पिकविमा कंपनीकडून नुकसानभरपाई मिळण्याकरिता अर्ज केले आहेत. सदर अर्ज जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी अधिकारी कार्यालयांना प्राप्त झाले असून ते गावनिहाय वेगवेगळे करून पडताळणी केली जात आहे. त्यानंतर सदर सर्व अर्जांची ‘डाटा एन्ट्री’ करून प्रत्यक्ष नुकसानाचे अहवाल विमा कंपन्यांकडे सादर केले जातील, अशी माहिती वाशिमचे तालुका कृषी अधिकारी अभिजित देवगिरीकर यांनी दिली. शनिवारी तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचाºयांकडून हे काम गतीने सुरू असल्याचे दिसून आले.

टॅग्स :washimवाशिम