शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

CoronaVirus : विदेशातून आलेल्या पाच जणांवर ‘वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 14:31 IST

आठ दिवसांपूर्वी फिलिपाईन्स आणि ईटली येथून वाशिम जिल्ह्यात पाच व्यक्ती परत आले आहेत.

लोकमत न्युज नेटवर्क वाशिम: ’कोरोना’ विषाणूचा संसर्ग जगभरात वाढत असतानाच विदेशात असलेले मूळ वाशिमचे पाच जण परत आले आहेत. या पाचही जणांवर आरोग्य विभागाचा वॉच असून, त्यांची नियमित तपासणी केली जात आहे, असे असले तरी, जिल्ह्यात अद्याप ‘कोरोना’चा एकही संशयित रुग्ण नसल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी शनिवारी दिली.कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच असताना देशभरातील आरोग्य यंत्रणा या विषाणूच्या संसर्गावर नियंत्रणासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. वाशिम जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागानेही विशेष उपाय योजना आखल्या आहेत. या अंतर्गत विदेशातून वाशिममध्ये येत असलेल्या व्यक्तींवर प्रशासन जातीने लक्ष ठेवत आहे. गेल्या आठ दिवसांपूर्वी फिलिपाईन्स आणि ईटली येथून वाशिम जिल्ह्यात पाच व्यक्ती परत आले आहेत. या पाचही जणांची प्रकृती चांगली असली तरी, आरोग्य विभागाचे पथक त्यांची नियमित तपासणी करीत आहे. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची कोणतीही लक्षणे अद्याप दिसली नाहीत. तरी त्यांना इतरांपासून वेगळे ठेवण्यात आले आहे.  

 जिल्ह्यात गत काही दिवसांत विदेशातून पाचच नागरिक परत आले आहेत. त्यांच्यावर आरोग्य विभागाचे लक्ष आहे. ‘कोरोना’चा संसर्ग झाल्याची कोणती लक्षणे अद्याप दिसली नाहीत. तथापि, त्यांची नावे उघड करता येणार नाहीत.-अंबादास सोनटक्के,जिल्हा शल्यचिकित्सक, वाशिम

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसwashimवाशिम