शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

CoronaVirus : विदेशातून आलेल्या पाच जणांवर ‘वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 14:31 IST

आठ दिवसांपूर्वी फिलिपाईन्स आणि ईटली येथून वाशिम जिल्ह्यात पाच व्यक्ती परत आले आहेत.

लोकमत न्युज नेटवर्क वाशिम: ’कोरोना’ विषाणूचा संसर्ग जगभरात वाढत असतानाच विदेशात असलेले मूळ वाशिमचे पाच जण परत आले आहेत. या पाचही जणांवर आरोग्य विभागाचा वॉच असून, त्यांची नियमित तपासणी केली जात आहे, असे असले तरी, जिल्ह्यात अद्याप ‘कोरोना’चा एकही संशयित रुग्ण नसल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी शनिवारी दिली.कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच असताना देशभरातील आरोग्य यंत्रणा या विषाणूच्या संसर्गावर नियंत्रणासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. वाशिम जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागानेही विशेष उपाय योजना आखल्या आहेत. या अंतर्गत विदेशातून वाशिममध्ये येत असलेल्या व्यक्तींवर प्रशासन जातीने लक्ष ठेवत आहे. गेल्या आठ दिवसांपूर्वी फिलिपाईन्स आणि ईटली येथून वाशिम जिल्ह्यात पाच व्यक्ती परत आले आहेत. या पाचही जणांची प्रकृती चांगली असली तरी, आरोग्य विभागाचे पथक त्यांची नियमित तपासणी करीत आहे. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची कोणतीही लक्षणे अद्याप दिसली नाहीत. तरी त्यांना इतरांपासून वेगळे ठेवण्यात आले आहे.  

 जिल्ह्यात गत काही दिवसांत विदेशातून पाचच नागरिक परत आले आहेत. त्यांच्यावर आरोग्य विभागाचे लक्ष आहे. ‘कोरोना’चा संसर्ग झाल्याची कोणती लक्षणे अद्याप दिसली नाहीत. तथापि, त्यांची नावे उघड करता येणार नाहीत.-अंबादास सोनटक्के,जिल्हा शल्यचिकित्सक, वाशिम

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसwashimवाशिम