शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
3
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
4
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
5
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
6
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
7
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
8
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
9
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
10
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
11
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
12
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
13
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
14
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
15
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
16
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
17
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
18
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
19
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
20
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!

वाशिम : कोरोनाचा एकही संशयित नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 11:36 IST

५ व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरण कक्षात, ६ जणांना घरीच विलगीकरण करून निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात अद्यापपर्यंत कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला एकही संशयित अथवा बाधित रुग्ण आढळलेला नाही. परदेशातून परत आलेल्या ३२ व्यक्तींपैकी ५ व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरण कक्षात, ६ जणांना घरीच विलगीकरण करून निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. मात्र त्यांच्यामध्ये सुद्धा कोणतेही लक्षणे आढलेली नाहीत. उर्वरित २१ व्यक्तींचा १४ दिवसांचा विलगीकरण कालावधी पूर्ण झाला असून त्यांच्यामध्ये कोरोना विषाणू संसर्गाची कोणतीही लक्षणे आढळली नसल्याने त्यांना विलगीकरणाच्या बाहेर करण्यात आले.कोरोना विषाणू संसर्गाने संपूर्ण जग हादरले असून, खबरदारीचा उपाय म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ एप्रिलपर्यंत ‘लॉक-डाऊन’चे निर्देश दिले आहेत. त्याची वाशिम जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू असून, सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत नागरिकांना जागरूक केले जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ३२ व्यक्ती परदेशातून परत आल्या आहेत. यापैकी ५ व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरण कक्षात तर ६ जणांना घरीच विलगीकरण करून निगराणीखाली ठेवण्यात आले. उर्वरीत २१ जणांचा विलगीकरण कालावधी २८ मार्च रोजी पूर्ण झाला. कुणालाही कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत एकही संशयित अथवा बाधित रुग्ण आढळलेला नाही, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.अद्याप कोरोना विषाणूचा एकही रूग्ण आढळला नसला तरी संभाव्य धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने संचारबंदी आदेश, जिल्हा बंदी आदेशाची कठोर अंमलबजावणी सुरू केली आहे. शेजारील काही जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला संशयित रुग्ण आढळत असल्याने यापासून सावध होत २८ मार्चला जिल्हा बंदचे आदेश दिले. पुढील आदेशापर्यंत कोणत्याही व्यक्तीला जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नाही तसेच जिल्ह्यातील कोणताही व्यक्ती जिल्ह्याबाहेर जाणार नाही, या आदेशाची तंतोतंत अंमलबजावणी २९ मार्चपासून सुरू केली आहे तसेच यापूर्वी संचारबंदी काळात जीवनावश्यक वस्तूंची विक्री २४ तास सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली होती. परंतू, संभाव्य धोका टाळण्यासाठी २९ मार्चपासून पुढील आदेशापर्यंत सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंतच जीवनावश्यक वस्तूंची विक्री सुरु केली जाणार आहे. रविवारी या आदेशाची अंमलबजावणी झाली.दक्षता बाळगाकोरोना विषाणू संसर्गाच्या संभाव्य धोक्यापासून सावधगिरी म्हणून प्रत्येक नागरिकानी स्वत:बरोबरच इतरांची काळजी घ्यावी, संचारबंदी आदेशाची अंमलबजावणी करावी, शक्यतोवर घराबाहेर पडू नये, स्वच्छता राखावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस