शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

वाशिम : कोरोनाचा एकही संशयित नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 11:36 IST

५ व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरण कक्षात, ६ जणांना घरीच विलगीकरण करून निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात अद्यापपर्यंत कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला एकही संशयित अथवा बाधित रुग्ण आढळलेला नाही. परदेशातून परत आलेल्या ३२ व्यक्तींपैकी ५ व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरण कक्षात, ६ जणांना घरीच विलगीकरण करून निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. मात्र त्यांच्यामध्ये सुद्धा कोणतेही लक्षणे आढलेली नाहीत. उर्वरित २१ व्यक्तींचा १४ दिवसांचा विलगीकरण कालावधी पूर्ण झाला असून त्यांच्यामध्ये कोरोना विषाणू संसर्गाची कोणतीही लक्षणे आढळली नसल्याने त्यांना विलगीकरणाच्या बाहेर करण्यात आले.कोरोना विषाणू संसर्गाने संपूर्ण जग हादरले असून, खबरदारीचा उपाय म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ एप्रिलपर्यंत ‘लॉक-डाऊन’चे निर्देश दिले आहेत. त्याची वाशिम जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू असून, सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत नागरिकांना जागरूक केले जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ३२ व्यक्ती परदेशातून परत आल्या आहेत. यापैकी ५ व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरण कक्षात तर ६ जणांना घरीच विलगीकरण करून निगराणीखाली ठेवण्यात आले. उर्वरीत २१ जणांचा विलगीकरण कालावधी २८ मार्च रोजी पूर्ण झाला. कुणालाही कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत एकही संशयित अथवा बाधित रुग्ण आढळलेला नाही, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.अद्याप कोरोना विषाणूचा एकही रूग्ण आढळला नसला तरी संभाव्य धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने संचारबंदी आदेश, जिल्हा बंदी आदेशाची कठोर अंमलबजावणी सुरू केली आहे. शेजारील काही जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला संशयित रुग्ण आढळत असल्याने यापासून सावध होत २८ मार्चला जिल्हा बंदचे आदेश दिले. पुढील आदेशापर्यंत कोणत्याही व्यक्तीला जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नाही तसेच जिल्ह्यातील कोणताही व्यक्ती जिल्ह्याबाहेर जाणार नाही, या आदेशाची तंतोतंत अंमलबजावणी २९ मार्चपासून सुरू केली आहे तसेच यापूर्वी संचारबंदी काळात जीवनावश्यक वस्तूंची विक्री २४ तास सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली होती. परंतू, संभाव्य धोका टाळण्यासाठी २९ मार्चपासून पुढील आदेशापर्यंत सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंतच जीवनावश्यक वस्तूंची विक्री सुरु केली जाणार आहे. रविवारी या आदेशाची अंमलबजावणी झाली.दक्षता बाळगाकोरोना विषाणू संसर्गाच्या संभाव्य धोक्यापासून सावधगिरी म्हणून प्रत्येक नागरिकानी स्वत:बरोबरच इतरांची काळजी घ्यावी, संचारबंदी आदेशाची अंमलबजावणी करावी, शक्यतोवर घराबाहेर पडू नये, स्वच्छता राखावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस