शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

बोंडअळी नियंत्रणासाठी बाधित पाती, फुले, बोंडे कापा; कृषी विभागाचा सल्ला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 18:06 IST

वाशिम : कपाशीच्या पिकावरील गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी बोंडअळीने बाधित झालेले पाती, बोंडे आणि फुले तोडून टाकावी, असा सल्ला कृषी विभागाच्यावतीने देण्यात येत आहे.

ठळक मुद्देअमरावती विभागात कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे.किडीवर नियंत्रणासाठी मार्गदर्शन सभा आणि फेरोमेन सापळे लावण्याचे आवाहन केले. कपाशी पिकातील बोंडअळी बाधित पाती, फुले आणि बोंडे तोडण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कपाशीच्या पिकावरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे, त्यामुळे मोठे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. कीटकनाशकांचा आता या किडीवर काही परिणामही होत नसल्याचे दिसत आहे. आता यावर नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी बोंडअळीने बाधित झालेले पाती, बोंडे आणि फुले तोडून टाकावी, असा सल्ला कृषी विभागाच्यावतीने देण्यात येत आहे.अमरावती विभागात कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. कृषी विभागाच्यावतीने या किडीवर नियंत्रणासाठी मार्गदर्शन सभा आणि फेरोमेन सापळे लावण्याचे आवाहन केले. तथापि, या सर्व प्रयत्नानंतरही काहीच फायदा झाला नाही. गुलाबी बोंडअळीच्या जीवनचक्रातील घटक वातावरणात चार महिने टिकून राहतात, त्यामुळे एकात्मिक कीड व्यवस्थापन करणे, वेळेवर पीक काढणे, कपाशीच्या हंगामापूर्वी आणि पीक कापणीनंतर शेतात स्वच्छता राखणे, कपाशीचे अवशेष अर्थात पºहाटी, गळलेली बोंडे दीर्घकाळ शेतात न ठेवणे, सतत कापूस न घेता पीक फेरपालट करणे, रासायनिक खतांचा आवश्यक तेनुसारच वापर करणे आदी बाबींची काळजी घ्यावी लागते; परंतु शेतकºयांकडून त्याची फारशी दखल घेण्यात येत नाही. यंदाही कपाशीवर या अळीचा प्रादुर्भाव आटोक्यावर बाहेर जात असल्याने कृषी विभागाकडून शेतशिवारांची पाहणी करून शेतकºयांना कपाशी पिकातील बोंडअळी बाधित पाती, फुले आणि बोंडे तोडण्याचा सल्ला देण्यात येत आहे.बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून, एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अभाव आणि पिकांची फेरपालट न केल्याने हा प्रकार यंदाही दिसत आहे. फेरोमेन सापळे कपाशीच्या पिकांत तांत्रिक पद्धतीने लावतानाच शेतकºयांनी बाधित झालेली बोंडे, पाती आणि फुले तोडून टाकावीत, असा आमचा सल्ला आहे.-दत्तात्रय गावसाने,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वाशिम.

 

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीcottonकापूसFarmerशेतकरी