शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

सततच्या पावसामुळे गरिबांच्या घरांना धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:48 IST

जिल्ह्यात जून ते १३ सप्टेंबरदरम्यान ७०८ मि.मी. पावसाची अपेक्षा असताना प्रत्यक्षात ८५१.६० मि.मी. पाऊस पडला. त्यात गेल्या आठवडाभरातच अर्थात ...

जिल्ह्यात जून ते १३ सप्टेंबरदरम्यान ७०८ मि.मी. पावसाची अपेक्षा असताना प्रत्यक्षात ८५१.६० मि.मी. पाऊस पडला. त्यात गेल्या आठवडाभरातच अर्थात ७ सप्टेंबर ते १२ सप्टेंबरदरम्यान २९ मि.मी. पावसाची नाेंद झाली. यात सोमवार ६ ते मंगळवार ७ सप्टेंबरदरम्यानच्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ४७.७० मि.मी. पाऊस पडला. या पावसामुळे मोलमजुरी करणाऱ्या गरिबांच्या घराला धोका निर्माण झाला. त्यात कारंजा, मंगरुळपीर आणि मानोरा तालुक्यात मिळून सहा घरे काेसळल्याच्या घटनाही घडल्या. सुदैवाने यात जीवितहानीसारखी अप्रिय घटना टळली तरी या गरीब कुटुंबांच्या घरातील जीवनावश्यक वस्तू आणि इतर साहित्यांचे मोठे नुकसान झाले. संबंधित विभागाने आपदग्रस्त ग्रामस्थांच्या घरांच्या पडलेल्या भिंतीचे तातडीने पंचनामे करून मदत करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

०००००००००००००००००

कोठेकोठे घडल्या घटना

मानोरा तालुक्यातील इंझोरी येथे ८ सप्टेंबरला बंडू ऊर्फ महादेव पारधी यांच्यासह इतर काही कामगारांची घरे कोसळली. कारंजा तालुक्यातील धनज बु. येथील सुनील डफडे यांचे घर सततच्या पावसामुळे १० सप्टेंबर रोजी कोसळले. उंबर्डा बाजार येथील मीना हुतके, प्रमोद धोपे, गणेश ठाकरे, उमेश ठाकरे, मयूर बुरघाटे, मुमताजबी शे.इसाक यांच्यासह अनेक ग्रामस्थांच्या घरांच्या मातीच्या भिंती ८ सप्टेंबर रोजी जमीनदोस्त झाल्या, तर काजळेश्वर येथील प्रल्हाद मनिराम पवार आणि गणेश विष्णू राठोड यांच्या घराच्या भिंती पावसामुळे कोसळल्या.

००००००००००००००

घरकुलाच्या लाभाअभावी जीव धोक्यात

शासनाकडून आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि कुडामातीच्या घरात राहणाऱ्या कुटुंबांसाठी प्रधानमंत्री आवास, इंदिरा आवास, रमाई आवास योजना अस्तित्वात आणल्या. त्याचा लाभ मिळावा म्हणून अनेकांनी प्रशासनाकडे अर्जही केले. त्यातील काहींना घरकुल मंजूर झाले असले तरी अनुदान रखडले आहे, तर काहींना घरकुलच मंजूर झाले नसल्याने त्यांचे घराचे स्वप्न अर्धवटच असून, सततच्या पावसामुळे मातीची घरे कोसळून त्यांच्या जिवाला धोका आहे.

०००००००००००००००००

कोट: शासनाकडून घरकुल योजना राबविल्या जातात. घर नसलेल्यांना अर्ज करण्यासही सांगितले जाते; परंतु अर्ज केल्यानंतर विविध अटी घालून वंचित ठेवले जाते. कधी ८ नसल्याचे, तर कधी कर भरला नसल्याचे सांगून प्रशासनाकडून योजनेचा लाभ देण्यास टाळाटाळ केली जाते. त्यामुळे मातीच्या घरात जीव धोक्यात घालून राहावे लागते.

-विष्णू राठोड,

आपदग्रस्त काजळेश्वर

००००००००००००००००००००००००

कोट: गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घराच्या भिंतीत पाणी मुरल्याने भिंत कोसळली, आम्ही झोपेत असताना ही घटना घडली. सुदैवाने आमचे प्राण वाचले. शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ मिळाला, तर आम्ही सुरक्षितपणे जीवन जगू शकतो. जिल्हा प्रशासनाने याची दखल घ्यावी.

- सुनील डफडे,

आपदग्रस्त, धनज बु.

०००००००००००००००००००००००००