शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

रिसोड शहरात दुषित पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 16:02 IST

रिसोड (वाशिम) : नगर परिषदेच्यावतीने शहरात गेल्या दहा ते बारा दिवसांपासून नागरिकांना दुषित पाणी पुरवठा होत आहे. नळ योजनेद्वारे सोडण्यात येणारे पाणी पिवळ्या रंगाचे आणि गाळमिश्रीत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम) : नगर परिषदेच्यावतीने शहरात गेल्या दहा ते बारा दिवसांपासून नागरिकांना दुषित पाणी पुरवठा होत आहे. नळ योजनेद्वारे सोडण्यात येणारे पाणी पिवळ्या रंगाचे आणि गाळमिश्रीत आहे. हे पाणी पिण्यास योग्य नसल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून, नगर परिषदेने याची दखल घेण्याची मागणी नागरिक करीत आहेत.रिसोड शहराला मालेगाव तालुक्यातील पाणीपुरवठा अडोळ प्रेकल्पावरील योजनेतून पाणी पुरवठा करण्यात येतो. या प्रकल्पात सद्यस्थितीत उन्हाळाभर पुरेल एवढा साठा असून, रिसोड शहरात व्यवस्थीत पाणी पुरवठाही केला जातो; परंतु गेल्या १० ते १२ दिवसांपासून नागरिकांच्या नळातून दुषित पाणी येत आहे. हे पाणी पिवळसर आणि गाळमिश्रीत आहे. त्यामुळे नागरिकांत भितीचे वातावरण तयार झाले आहे. हे पाणी पिण्यासाठी योग्य नसून, नागरिकांच्या पिण्यात आल्यास अतिसार किंवा मुत्राशयाच्या आजाराची लागणही यामुळे होण्याची शक्यता आहे. तथापि, नगरपरिषद प्रशासनाकडून अद्याप याची दखल घेऊन शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी कुठलाही उपाय करण्यात आलेला नाही.  रिसोड शहरात सध्या नळाला सहा दिवसांनी पाणीपुरवठा शहरात नागरिकांना केला जात असून हेच पाणी त्यांना पिण्यास व वापरण्यास कमीत कमी सहा दिवस संकलन करून ठेवावे लागते अशातच असे पिवळे पाणी जर नागरिकांच्या नळाला आले तर त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण शकतो यावर त्वरित उपाय म्हणून नगर प्रशासन नगरपालिका प्रशासनाने यावर गांभीर्याने लक्ष घालणे आवश्यक असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत. दरम्यान, नळाला दुषित पाणी येत असल्यामुळे नागरिक पिण्यासाठी कॅनचे पाणी विकत घेत आहेत. त्यामुळे रिसोड शहरातील वॉटर फिल्टर प्लांटधारकांना सुगीचे दिवस आल्याचे दिसून येते. मध्यम आणि उच्चवर्गीय हा खर्च करू शकत असले तरी, गरीबांना मात्र हेच पाणी प्यावे लागत असल्याचेही दिसत आहे. (तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोडWaterपाणी