शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अजेंडा नसलेली काँग्रेस सैरभैर झाली!; जावडेकरांची विरोधकांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2018 17:36 IST

केंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीच्यावतीने देशभरातील जनतेसाठी विविध स्वरूपातील महत्वाकांक्षी योजना, उपक्रम राबविण्यात येत आहेत.

वाशिम : केंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीच्यावतीने देशभरातील जनतेसाठी विविध स्वरूपातील महत्वाकांक्षी योजना, उपक्रम राबविण्यात येत आहेत. काँग्रेसकडे मात्र ठोस असे करण्यासारखे काहीच उरले नाही, कुठलाही महत्वपूर्ण अजेंडा नाही. त्यामुळे सैरभैर झालेली काँग्रेस विद्यमान भाजपा सरकारवर निरर्थक व बिनबुडाचे आरोप करीत सुटली आहे, अशी घणाघाती टीका केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी येथे शनिवार, २२ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत केली.जिल्ह्यातील पाच ठिकाणी उभारण्यात आलेल्या आरोग्यवर्धिनी केंद्रांचे (हेल्थ अ‍ॅण्ड वेलनेस सेंटर) ना. जावडेकर यांच्याहस्ते आज उद्घाटन झाले. यादरम्यान दुपारी ३ वाजता वाशिममध्ये माजी आमदार अ‍ॅड. विजय जाधव यांच्या निवासस्थानी त्यांनी पत्रकारांना संबोधित केले. पुढे बोलताना जावडेकर म्हणाले, की भाजपा सरकारने सर्वच पातळ्यांवर सर्वंकष विकास साधण्याकडे विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून देशभरातील ११५ मागास जिल्ह्यांचा ‘अ‍ॅस्पिरेशनल डिस्ट्रीक्ट’ उपक्रमात समावेश करून संबंधित जिल्ह्यांमध्ये सर्व प्रकारच्या मुलभूत सुविधा पुरविण्यात येत आहेत. याशिवाय २३ सप्टेंबर रोजी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रांची (झारखंड) येथून देशभरातील ६०० पेक्षा अधिक जिल्ह्यांसाठी ‘आयुष्यमान भारत’ या आरोग्यविषयक योजनेची घोषणा करणार आहेत. याअंतर्गत १० कोटी ७० लाख कुटूंबांना दरवर्षी आरोग्यविषयक खर्चासाठी ५ लाख रुपयांपर्यंतच्या मदतीची तरतूद करण्यात आलेली आहे. एकूणच विद्यमान सरकार देशातील प्रत्येक नागरिकाचा फायदा डोळ्यासमोर ठेवून कार्य करित असताना काँग्रेस मात्र बिनबुडाचे आरोप करण्यात धन्यता मानत आहे. कधी पेट्रोल; तर कधी केरोसीन, राफेल घोटाळा झाल्याचे भासवून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, त्यात कुठलेही तथ्य नसून आगामी २०१९ मध्येही जनता भाजपालाच स्पष्ट कौल देईन, असा विश्वास मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यावेळी व्यक्त केला. पत्रकार परिषदेला खासदार संजय धोत्रे, आमदार राजेंद्र पाटणी, माजी आमदार अ‍ॅड. विजय जाधव, पुरूषोत्तम राजगुरू आदिंची उपस्थिती होती.

टॅग्स :Prakash Javadekarप्रकाश जावडेकरwashimवाशिम