शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
3
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
4
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
5
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
6
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
7
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
8
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
10
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
11
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
12
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
13
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
14
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
15
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
16
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
17
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
18
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
19
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
20
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली

पीक नुकसानाच्या ८६ हजारांवर तक्रारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 15:07 IST

पीक पाहणी तातडीने करण्यासाठी प्रशासनाची धांदलघाई सुरु झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात अवकाळी पावसाची रिपरिप कायमच असल्याने पीक नुकसानाची पाहणी करण्यात अडथळे येत आहेत. पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या ८६ हजार ४३ शेतकºयांच्या पीक नुकसानाच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यात आता पीक न भरणाºया शेतकºयांच्या नुकसानाची पाहणी करण्याचे निर्देशही शासनाने दिले असल्याने पीक पाहणी तातडीने करण्यासाठी प्रशासनाची धांदलघाई सुरु झाली आहे.वाशिम जिल्ह्यात गत १५ दिवसांपासून अवकाळी पावसाने ठाण मांडले आहे. त्यात २७ आॅक्टोबरपासून या पावसाने कहरच केला. त्यामुळे जिल्ह्यात सोयाबीन, तूर, कपाशी या उभ्या खरीप पिकांसह पपई, संत्रा, लिंबू, डाळींब आणि इतर फळपिकांचे नुकसान झालेच शिवाय हजारो शेतकºयांचे काढणीपश्चात सोयाबीनचेही अतोनात नुकसान झाले. या पीक नुकसानापोटी शेतकºयांना आर्थिक मदत करण्यासाठी पीकविमा भरणाºया शेतकºयांना पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीसह तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले. ही तक्रार ४८ तासांत करावी लागणार असल्याने शेतकºयांनी संबंधित केंद्रांवर मोठी गर्दी केली आणि जिल्ह्यातील सहाही तालुक्यांत मिळून गुरुवार ३१ आॅक्टोबरपर्यंत सायंकाळी ६ वाजेपर्यंत एकूण ८६ हजार ४३ शेतकºयांनी पीक नुकसानाच्या तक्रारी प्रशासनाकडे सादर केल्या आहेत.दरम्यान, प्रशासनाने मंगळवारपासून पीक पाहणीचा कार्यक्रमही सुरू केला; परंतु पावसाची रिपरिप सुरू असल्याने या पीक पाहणीतही अडथळे येत आहेत. त्यात आता सर्वच मंडळातील पीक विमा भरणाºया शेतकºयांसह पीक विमा योजनेत सहभाग न घेतलेल्या शेतकºयांच्या पीक नुकसानाची पाहणी करण्याचे निर्देश शासनाने दिले असल्याने प्रशासनाची पीक पाहणीसाठी धांदलघाई सुरू झाली आहे. जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पावसाचा जोरदार तडाखागेल्या काही दिवसांत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. त्यात २८ आॅक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता संपणाºया २४ तासांत एकाच दिवशी वाशिम तालुक्यात ४९.०३ मि.मी., मालेगाव तालुक्यात ३९.१३ मि. मी., रिसोड तालुक्यात २५.८८ मि. मी., मंगरुळपीर तालुक्यात ३१.०० मि. मी., मानोरा तालुक्यात २१.७५ मि. मी. आणि कारंजा तालुक्यात २४.२५ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. या अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील उभी पिके व कापणी झालेल्या पिकांचे नुकसान झाले आहे.

३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसानाचे जिल्ह्यातील सर्व महसूली मंडळातील पंचनामेजिल्ह्यात अवेळी आलेल्या पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार तलाठी, कृषि सहाय्यक व ग्रामविकास अधिकारी यांनी संयुक्त पंचनामे करण्याची कार्यवाही तातडीने करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. जिल्ह्यातील अतिवृष्टी झालेल्या महसूल मंडळांसह सर्वच महसूल मंडळात हे पंचनामे होणार आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. त्यानुसार तलाठी, कृषि सहाय्यक व ग्रामविकास अधिकारी यांनी पंचनाम्यास सुरुवात केली आहे. नुकसानग्रस्त शेतकºयांनी आपल्या पिकांच्या नुकसानाचे पंचनामे न झाल्यास याबाबतची माहिती तलाठी, कृषि सहाय्यक, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी किंवा तहसीलदार यांना कळवावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

७७५ शेतकºयांच्या नुकसानाचे पंचनामेशासनाच्या निर्देशानुसार कृषी विभागासह पीकविमा कंपनीने अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानाचे पंचनामे वेगाने सुरू केले असून, ३१ आॅक्टोबरपर्यंत ७७५ शेतकºयांच्या शेताचे पंचनामेही पूर्ण करण्यात आले आहेत. त्यात वाशिम तालुक्यातील १२०, रिसोड तालुक्यातील ११५, मालेगाव तालुक्यातील ७०, मंगरुळपीर तालुक्यातील २५०, मानोरा तालुक्यातील १०० आणि कारंजा तालुक्यातील १२० शेतकºयांच्या नुकसानाच्या पंचनाम्याचा समावेश आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी