शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

पीक नुकसानाच्या ८६ हजारांवर तक्रारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 15:07 IST

पीक पाहणी तातडीने करण्यासाठी प्रशासनाची धांदलघाई सुरु झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात अवकाळी पावसाची रिपरिप कायमच असल्याने पीक नुकसानाची पाहणी करण्यात अडथळे येत आहेत. पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या ८६ हजार ४३ शेतकºयांच्या पीक नुकसानाच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यात आता पीक न भरणाºया शेतकºयांच्या नुकसानाची पाहणी करण्याचे निर्देशही शासनाने दिले असल्याने पीक पाहणी तातडीने करण्यासाठी प्रशासनाची धांदलघाई सुरु झाली आहे.वाशिम जिल्ह्यात गत १५ दिवसांपासून अवकाळी पावसाने ठाण मांडले आहे. त्यात २७ आॅक्टोबरपासून या पावसाने कहरच केला. त्यामुळे जिल्ह्यात सोयाबीन, तूर, कपाशी या उभ्या खरीप पिकांसह पपई, संत्रा, लिंबू, डाळींब आणि इतर फळपिकांचे नुकसान झालेच शिवाय हजारो शेतकºयांचे काढणीपश्चात सोयाबीनचेही अतोनात नुकसान झाले. या पीक नुकसानापोटी शेतकºयांना आर्थिक मदत करण्यासाठी पीकविमा भरणाºया शेतकºयांना पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीसह तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले. ही तक्रार ४८ तासांत करावी लागणार असल्याने शेतकºयांनी संबंधित केंद्रांवर मोठी गर्दी केली आणि जिल्ह्यातील सहाही तालुक्यांत मिळून गुरुवार ३१ आॅक्टोबरपर्यंत सायंकाळी ६ वाजेपर्यंत एकूण ८६ हजार ४३ शेतकºयांनी पीक नुकसानाच्या तक्रारी प्रशासनाकडे सादर केल्या आहेत.दरम्यान, प्रशासनाने मंगळवारपासून पीक पाहणीचा कार्यक्रमही सुरू केला; परंतु पावसाची रिपरिप सुरू असल्याने या पीक पाहणीतही अडथळे येत आहेत. त्यात आता सर्वच मंडळातील पीक विमा भरणाºया शेतकºयांसह पीक विमा योजनेत सहभाग न घेतलेल्या शेतकºयांच्या पीक नुकसानाची पाहणी करण्याचे निर्देश शासनाने दिले असल्याने प्रशासनाची पीक पाहणीसाठी धांदलघाई सुरू झाली आहे. जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पावसाचा जोरदार तडाखागेल्या काही दिवसांत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. त्यात २८ आॅक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता संपणाºया २४ तासांत एकाच दिवशी वाशिम तालुक्यात ४९.०३ मि.मी., मालेगाव तालुक्यात ३९.१३ मि. मी., रिसोड तालुक्यात २५.८८ मि. मी., मंगरुळपीर तालुक्यात ३१.०० मि. मी., मानोरा तालुक्यात २१.७५ मि. मी. आणि कारंजा तालुक्यात २४.२५ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. या अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील उभी पिके व कापणी झालेल्या पिकांचे नुकसान झाले आहे.

३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसानाचे जिल्ह्यातील सर्व महसूली मंडळातील पंचनामेजिल्ह्यात अवेळी आलेल्या पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार तलाठी, कृषि सहाय्यक व ग्रामविकास अधिकारी यांनी संयुक्त पंचनामे करण्याची कार्यवाही तातडीने करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. जिल्ह्यातील अतिवृष्टी झालेल्या महसूल मंडळांसह सर्वच महसूल मंडळात हे पंचनामे होणार आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. त्यानुसार तलाठी, कृषि सहाय्यक व ग्रामविकास अधिकारी यांनी पंचनाम्यास सुरुवात केली आहे. नुकसानग्रस्त शेतकºयांनी आपल्या पिकांच्या नुकसानाचे पंचनामे न झाल्यास याबाबतची माहिती तलाठी, कृषि सहाय्यक, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी किंवा तहसीलदार यांना कळवावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

७७५ शेतकºयांच्या नुकसानाचे पंचनामेशासनाच्या निर्देशानुसार कृषी विभागासह पीकविमा कंपनीने अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानाचे पंचनामे वेगाने सुरू केले असून, ३१ आॅक्टोबरपर्यंत ७७५ शेतकºयांच्या शेताचे पंचनामेही पूर्ण करण्यात आले आहेत. त्यात वाशिम तालुक्यातील १२०, रिसोड तालुक्यातील ११५, मालेगाव तालुक्यातील ७०, मंगरुळपीर तालुक्यातील २५०, मानोरा तालुक्यातील १०० आणि कारंजा तालुक्यातील १२० शेतकºयांच्या नुकसानाच्या पंचनाम्याचा समावेश आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी