शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जुलैमधील नुकसानभरपाई मिळणार; ऑगस्टमधील मदत लांबणीवर! ५८५६ शेतकऱ्यांच्या बॅक खात्याची माहिती मागविली

By संतोष वानखडे | Updated: September 11, 2022 14:59 IST

Farmer: संततधार पाऊस आणि अतिवृष्टीने यंदा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. जून ते जुलै महिन्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांच्या भरपाईपोटी शासनाकडून जिल्हा प्रशासनाला १.७६ कोटींचा निधी मिळाला असून, ही मदत लवकरच शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

- संतोष वानखडे वाशिम : संततधार पाऊस आणि अतिवृष्टीने यंदा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. जून ते जुलै महिन्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांच्या भरपाईपोटी शासनाकडून जिल्हा प्रशासनाला १.७६ कोटींचा निधी मिळाला असून, ही मदत लवकरच शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येणार आहे. दरम्यान, ऑगस्ट महिन्यातील १.४२ लाख हेक्टर पिकांवरील नुकसानापोटी मिळणारी भरपाई लांबणीवर पडल्याने शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

जिल्ह्यात जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यांत संततधार पाऊस झाला. जुलै व ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर अधिक असल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले. या तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील जवळपास १ लाख ४९ हजार हेक्टर पिकांचे नुकसान झाले. अतिवृष्टीने अनेक भागातील जमिनी खरडून गेल्या आहेत. जुलै महिन्यात बरसलेल्या पावसामुळे १२९७.७२ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान होऊन ५८५६ शेतकऱ्यांना फटका बसला. ऑगस्ट महिन्यात १.४२ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. जून ते ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाचा अहवाल शासनस्तरावर पाठविण्यात आला. नवीन निकषानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळणार असून, पहिल्या टप्प्यात जून ते जुलै महिन्यातील नुकसानापोटी १.७६ कोटींचा निधी जिल्हा प्रशासनाला मिळाला आहे. शासन निर्णयात जून ते ऑगस्ट महिन्यातील नुकसानभरपाईचा उल्लेख असल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. दरम्यान, पहिल्या टप्प्यात १२९७.७२ हेक्टर क्षेत्रावरील पीक नुकसानापोटी ५८५६ शेतकऱ्यांसाठी निधी मिळाला असून, ऑगस्ट महिन्यातील पीक नुकसानभरपाईसाठी लवकरच दुसऱ्या टप्प्यात निधी मिळणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

टॅग्स :Farmerशेतकरीwashimवाशिम