शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

नुकसानभरपाईसाठी शेतक-यांनी विमा कंपनीच्या प्रतिनिधींशी संपर्क साधावा,  ४८ तासांची मुदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2018 15:51 IST

सर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकºयांना विम्याचे कवच मिळावे, यासाठी संबंधित शेतक-यांनी...

वाशिम - नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकºयांना विम्याचे कवच मिळावे, यासाठी संबंधित शेतक-यांनी नॅशनल इन्शूरन्स कंपनीचे वाशिम जिल्ह्याचे प्रतिनिधी चंदन खोब्रागडे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन वाशिमचे तालुका कृषी अधिकारी अभिजित देवगीरकर यांनी बुधवारी केले.

लहरी हवामान, नैसर्गिक आपत्ती आदींमुळे होणाºया पीक हाणीची भरपाई शेतकºयांना मिळावी यासाठी पंतप्रधान पीक विमा योजना लागू केलेली आहे. या योजनेत पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आपत्ती, वीज, गारपीट, चक्रीवादळ, पुर व भुस्खलन, दुष्काळ, पाऊस खंड, किड व रोग, पेरणी व लावणी न झाल्याने होणा-या पिकाचे नुकसान, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान इत्यादी बाबीचा विचार करुन जोखीमस्तर  ठरविण्यात येतो. रब्बी हंगामात गहू, हरभरा, करडई, रब्बी ज्वारी आदी पिकांचा विमा उतरविणा-या शेतक-यांना जोखीमस्तरानुसार भरपाई मिळणार आहे. त्यासाठी संबंधित शेतक-यांना ४८ तासांच्या आत विमा कंपनीशी संपर्क साधणे आवश्यक आहे. नॅशनल इन्शूरन्स कंपनीचे वाशिम जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून चंदन खोब्रागडे यांच्यावर जबाबदारी असून, संबंधित शेतकºयांनी खोब्रागडे यांच्याशी संपर्क साधणे आवश्यक आहे. ८४११८८६१७२ या क्रमांकावर एसएमएसद्वारे किंवा व्हॉटस्अ‍ॅपद्वारे विमा भरल्याची पावती टाकून ४८ तासाच्या आत संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाने केले.

दरम्यान, वाशिम जिल्ह्यातील बहुतांश शेतकºयांनी रब्बी हंगामात पीक विमा उतरविला नसल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील केवळ सहा हजार ५०० शेतकºयांनी विमा उतरविला आहे. विमा कंपन्यांकडून लादलेल्या जाचक अटी, भरपाई मिळण्यास होणारा विलंब व दाद मागण्याची कोणतीही सोय नसल्यामुळे या योजनेकडे पाठ फिरविली असल्याचा दावा शेतकºयांनी केला. कर्जदार शेतकºयांना पीक विमा उतरविणे बंधनकारक असते. मात्र, वेळेवर कर्जमाफीचा लाभ मिळाला नसल्याने बहुतांश शेतकºयांना रब्बी हंगामात पीक विमा उतरविता आला नाही तसेच रब्बी हंगामात पीककर्ज काढणाºया शेतकºयांची संख्याही खरिप हंगामाच्या तुलनेत अल्प असते. त्यामुळे पीक विमा उतरविण्यात कर्जदार शेतकºयांची संख्याही कमी आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी