शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नुकसानभरपाईसाठी शेतक-यांनी विमा कंपनीच्या प्रतिनिधींशी संपर्क साधावा,  ४८ तासांची मुदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2018 15:51 IST

सर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकºयांना विम्याचे कवच मिळावे, यासाठी संबंधित शेतक-यांनी...

वाशिम - नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकºयांना विम्याचे कवच मिळावे, यासाठी संबंधित शेतक-यांनी नॅशनल इन्शूरन्स कंपनीचे वाशिम जिल्ह्याचे प्रतिनिधी चंदन खोब्रागडे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन वाशिमचे तालुका कृषी अधिकारी अभिजित देवगीरकर यांनी बुधवारी केले.

लहरी हवामान, नैसर्गिक आपत्ती आदींमुळे होणाºया पीक हाणीची भरपाई शेतकºयांना मिळावी यासाठी पंतप्रधान पीक विमा योजना लागू केलेली आहे. या योजनेत पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आपत्ती, वीज, गारपीट, चक्रीवादळ, पुर व भुस्खलन, दुष्काळ, पाऊस खंड, किड व रोग, पेरणी व लावणी न झाल्याने होणा-या पिकाचे नुकसान, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान इत्यादी बाबीचा विचार करुन जोखीमस्तर  ठरविण्यात येतो. रब्बी हंगामात गहू, हरभरा, करडई, रब्बी ज्वारी आदी पिकांचा विमा उतरविणा-या शेतक-यांना जोखीमस्तरानुसार भरपाई मिळणार आहे. त्यासाठी संबंधित शेतक-यांना ४८ तासांच्या आत विमा कंपनीशी संपर्क साधणे आवश्यक आहे. नॅशनल इन्शूरन्स कंपनीचे वाशिम जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून चंदन खोब्रागडे यांच्यावर जबाबदारी असून, संबंधित शेतकºयांनी खोब्रागडे यांच्याशी संपर्क साधणे आवश्यक आहे. ८४११८८६१७२ या क्रमांकावर एसएमएसद्वारे किंवा व्हॉटस्अ‍ॅपद्वारे विमा भरल्याची पावती टाकून ४८ तासाच्या आत संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाने केले.

दरम्यान, वाशिम जिल्ह्यातील बहुतांश शेतकºयांनी रब्बी हंगामात पीक विमा उतरविला नसल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील केवळ सहा हजार ५०० शेतकºयांनी विमा उतरविला आहे. विमा कंपन्यांकडून लादलेल्या जाचक अटी, भरपाई मिळण्यास होणारा विलंब व दाद मागण्याची कोणतीही सोय नसल्यामुळे या योजनेकडे पाठ फिरविली असल्याचा दावा शेतकºयांनी केला. कर्जदार शेतकºयांना पीक विमा उतरविणे बंधनकारक असते. मात्र, वेळेवर कर्जमाफीचा लाभ मिळाला नसल्याने बहुतांश शेतकºयांना रब्बी हंगामात पीक विमा उतरविता आला नाही तसेच रब्बी हंगामात पीककर्ज काढणाºया शेतकºयांची संख्याही खरिप हंगामाच्या तुलनेत अल्प असते. त्यामुळे पीक विमा उतरविण्यात कर्जदार शेतकºयांची संख्याही कमी आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी