शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला कृती दलाचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:29 IST

वाशिम : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे पालकांचा मृत्यू झाल्याने अनाथ बनलेल्या १८ वर्षांच्या आतील बालकांची माहिती ३१ मेपर्यंत संकलित करावी, ...

वाशिम : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे पालकांचा मृत्यू झाल्याने अनाथ बनलेल्या १८ वर्षांच्या आतील बालकांची माहिती ३१ मेपर्यंत संकलित करावी, जेणेकरून अशा बालकांची काळजी घेण्यासोबतच त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देणे, योग्यप्रकारे संगोपन करण्याची कार्यवाही करणे शक्य होईल, असे जिल्हाधिकारी शन्मुगराजन एस. यांनी सांगितले. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर गठित जिल्हा कृती दलाच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात २७ मे रोजी झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा नगरपालिका प्रशासन अधिकारी दीपक मोरे, जिल्हा बालकल्याण समितीच्या अध्यक्षा डॉ. जयश्री गुट्टे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) संजय जोल्हे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे, प्रभारी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी भगवान ढोले, समितीचे सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुभाष राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.

ज्या १८ वर्षांच्या आतील बालकांच्या पालकांचा जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, त्यांचा शोध घेण्याची जबाबदारी जिल्हा शल्यचिकित्सकांनी अन्य जिल्ह्यातील जिल्हा शल्यचिकित्सकांशी समन्वय साधून पार पाडावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. कोरोनाच्या संसर्गामुळे ज्या महिलेच्या पतीचा मृत्यू झाल्याने बालकांच्या व महिलेच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असेल, तर त्या महिलेला उपजीविकेची साधने उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून द्यावा. कोरोनामुळे आई, वडिलांचा किंवा दोघांपैकी एकाचा मृत्यू झाला असेल, अशा बालकांची नावे व यादी तातडीने तयार करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राठोड म्हणाले, कोविडमुळे ज्यांचे एक पालक मृत्यू पावले, अशी १६ बालके, तर ज्यांचे दोन्ही पालक मृत्यू पावले, अशी ५ बालके, अशी एकूण २१ बालकांची माहिती प्राप्त झाली आहे. चाईल्ड लाईनमार्फत गृहचौकशी करून त्यांना बालसंगोपन योजना मंजूर करण्यात आली आहे. सद्यस्थितीत सर्व बालके नातेवाईकांकडे राहत असल्याचे त्यांनी सांगितले.

बैठकीला चाईल्ड लाईनचे समन्वयक महेश राऊत, संरक्षण अधिकारी आलोक अग्रहरी, एम. के. जऊळकर यांची उपस्थिती होती.

००००

बालकांचा शोध घेण्यासाठी सर्वेक्षण

जिल्हा परिषदेचा पंचायत विभाग आणि शहरी भागातील नगरपालिकांनी कोरोनामुळे पालक गमावल्यामुळे अनाथ बनलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी योग्यप्रकारे सर्वेक्षण करून त्या बालकांचा शोध घ्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी शन्मुगराजन एस. यांनी दिल्या.

नगरपरिषदेकडे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींची नोंद असल्याने त्या कुटुंबांचा शोध घेऊन त्यांची १८ वर्षांच्या आतील बालके अनाथ झाली असल्यास माहिती संकलित करून माहिला व बालकल्याण विभागाला द्यावी. तसेच महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील त्या कुटुंबाला भेट देऊन माहिती घ्यावी. गावपातळीवर अनाथ बालकांचा शोध घेण्यासाठी अंगणवाडी सेविकेने योग्य प्रकारे काम करावे, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

००००००