शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गारंय... लुटंय... 5 रुपयांची पाणी बाटली २०मध्ये, अन्न औषध विभागाचे दुर्लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 12:02 IST

दरवर्षी विशेषत: उन्हाळ्यात थंड पाण्याच्या बाटल्यांचा धंदा चांगलाच जोर धरतो. एकट्या वाशिम शहरात या माध्यमातून दैनंदिन लाखो रुपयांची उलाढाल होते

वाशिम : उन्हाळा दिवसागणिक तापत चालल्याने दिवसभर पाण्यावाचून प्रत्येकाचा जीव कासावीस होत आहे. अशा स्थितीत गार पाणी प्यायला मिळाल्यास मोठा दिलासा मिळतो. त्यामुळेच बाटलीबंद पाणी विकत घेऊन अनेक जण तहान भागवत आहेत; मात्र हे पाणी थंड असले तरी ते शुद्ध असेलच याची हमी देता येत नाही. याशिवाय पाच रुपयांची बाटली चक्क २० रुपयांना विकली जात असून या गंभीर प्रकाराकडे अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

दरवर्षी विशेषत: उन्हाळ्यात थंड पाण्याच्या बाटल्यांचा धंदा चांगलाच जोर धरतो. एकट्या वाशिम शहरात या माध्यमातून दैनंदिन लाखो रुपयांची उलाढाल होते; मात्र केवळ लिटरभर पाण्यासाठी २० रुपये खर्चावे लागत असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक झळ सहन करावी लागत आहे. नामांकित तथा ब्रॅन्डेड कंपन्यांनी ठरविलेल्या दरानेच ‘लोकल’मध्ये सुरू झालेल्या स्वयंघोषित कंपन्याही त्याच दराने बाटलीबंद पाणी विकत असल्याचे दिसून येत आहे. हे पाणी खरोखरच सर्व निकष पाळून शुद्ध केले जातेय का, हे पाहण्याची तसदी मात्र कुणीही घेत नाही.

पाणी नमुने तपासले जातात का?

पाण्यात साधारणत: आर्सेनिक, कॅडमियम, झिंक आणि मर्क्युरी (पारा) अशा जड धातूंचे घटक समाविष्ट असतात. ज्यामुळे मेटॅबाॅलिझम प्रक्रियेत व्यत्यय निर्माण होणे, मज्जासंस्था व किडनीचे कार्य बिघडणे आदी प्रकारचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे वेळोवेळी पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासले जाणे आवश्यक आहे; मात्र या महत्त्वपूर्ण बाबीकडे कुणीही लक्ष देत नाही.

शहरात तिघांनाच परवानगी

वाशिम शहरात बाटलीबंद पाणी तयार करून विक्री करण्याची परवानगी केवळ तीन व्यावसायिकांनाच देण्यात आलेली आहे. ‘बीआयएस’ (ब्युरो ऑफ इंडियन स्टॅन्डर्ड)ची मान्यता असल्याशिवाय बाटलीबंद पाणी तयार करून ते विक्री करण्याचा परवाना अन्न व औषध प्रशासनाकडून दिला जात नाही. असे असले तरी बाटलीबंद पाणी विक्री करण्याच्या व्यवसायात छुप्या मार्गाने अनेक जण उतरले असून त्यांच्यावर सध्यातरी कुणाचेही नियंत्रण राहिलेले नाही.

मनुष्यबळच नाही

विशेषत: उन्हाळ्याच्या दिवसांत बाटलीबंद पाण्याचा गोरखधंदा मोठ्या प्रमाणात चालतो. हे पाणी शुद्ध की अशुद्ध हे तपासण्यात यायला हवे; मात्र अन्न व औषध प्रशासनाकडे पुरेसे मनुष्यबळच नाही. त्यामुळे तपासणी मोहीम थंडबस्त्यात आहे.

टॅग्स :WaterपाणीwashimवाशिमSummer Specialसमर स्पेशल