शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

गारंय... लुटंय... 5 रुपयांची पाणी बाटली २०मध्ये, अन्न औषध विभागाचे दुर्लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 12:02 IST

दरवर्षी विशेषत: उन्हाळ्यात थंड पाण्याच्या बाटल्यांचा धंदा चांगलाच जोर धरतो. एकट्या वाशिम शहरात या माध्यमातून दैनंदिन लाखो रुपयांची उलाढाल होते

वाशिम : उन्हाळा दिवसागणिक तापत चालल्याने दिवसभर पाण्यावाचून प्रत्येकाचा जीव कासावीस होत आहे. अशा स्थितीत गार पाणी प्यायला मिळाल्यास मोठा दिलासा मिळतो. त्यामुळेच बाटलीबंद पाणी विकत घेऊन अनेक जण तहान भागवत आहेत; मात्र हे पाणी थंड असले तरी ते शुद्ध असेलच याची हमी देता येत नाही. याशिवाय पाच रुपयांची बाटली चक्क २० रुपयांना विकली जात असून या गंभीर प्रकाराकडे अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

दरवर्षी विशेषत: उन्हाळ्यात थंड पाण्याच्या बाटल्यांचा धंदा चांगलाच जोर धरतो. एकट्या वाशिम शहरात या माध्यमातून दैनंदिन लाखो रुपयांची उलाढाल होते; मात्र केवळ लिटरभर पाण्यासाठी २० रुपये खर्चावे लागत असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक झळ सहन करावी लागत आहे. नामांकित तथा ब्रॅन्डेड कंपन्यांनी ठरविलेल्या दरानेच ‘लोकल’मध्ये सुरू झालेल्या स्वयंघोषित कंपन्याही त्याच दराने बाटलीबंद पाणी विकत असल्याचे दिसून येत आहे. हे पाणी खरोखरच सर्व निकष पाळून शुद्ध केले जातेय का, हे पाहण्याची तसदी मात्र कुणीही घेत नाही.

पाणी नमुने तपासले जातात का?

पाण्यात साधारणत: आर्सेनिक, कॅडमियम, झिंक आणि मर्क्युरी (पारा) अशा जड धातूंचे घटक समाविष्ट असतात. ज्यामुळे मेटॅबाॅलिझम प्रक्रियेत व्यत्यय निर्माण होणे, मज्जासंस्था व किडनीचे कार्य बिघडणे आदी प्रकारचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे वेळोवेळी पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासले जाणे आवश्यक आहे; मात्र या महत्त्वपूर्ण बाबीकडे कुणीही लक्ष देत नाही.

शहरात तिघांनाच परवानगी

वाशिम शहरात बाटलीबंद पाणी तयार करून विक्री करण्याची परवानगी केवळ तीन व्यावसायिकांनाच देण्यात आलेली आहे. ‘बीआयएस’ (ब्युरो ऑफ इंडियन स्टॅन्डर्ड)ची मान्यता असल्याशिवाय बाटलीबंद पाणी तयार करून ते विक्री करण्याचा परवाना अन्न व औषध प्रशासनाकडून दिला जात नाही. असे असले तरी बाटलीबंद पाणी विक्री करण्याच्या व्यवसायात छुप्या मार्गाने अनेक जण उतरले असून त्यांच्यावर सध्यातरी कुणाचेही नियंत्रण राहिलेले नाही.

मनुष्यबळच नाही

विशेषत: उन्हाळ्याच्या दिवसांत बाटलीबंद पाण्याचा गोरखधंदा मोठ्या प्रमाणात चालतो. हे पाणी शुद्ध की अशुद्ध हे तपासण्यात यायला हवे; मात्र अन्न व औषध प्रशासनाकडे पुरेसे मनुष्यबळच नाही. त्यामुळे तपासणी मोहीम थंडबस्त्यात आहे.

टॅग्स :WaterपाणीwashimवाशिमSummer Specialसमर स्पेशल