शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

वाशिम जिल्ह्यात ढगाळ वातावरण; साथरोग बळावले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 17:35 IST

वाशिम : गत तीन-चार दिवसांपासून वातावरणात बदल जाणवत आहे. ढगाळ वातावरण असल्यामुळे साथरोग बळावले असून, सरकारी रुग्णालयासह खासगी दवाखान्यात रूग्णांची गर्दी होत असल्याचे दिसून येते. 

ठळक मुद्देढगाळ वातावरण असल्याने बालकांपासून ते वृद्धांपर्यंत सर्दी, ताप, खोकला आदी आजार जडत असल्याचे दिसून येते. उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयासह ग्रामीण रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्ण दाखल होत असल्याचे दिसून येते.  बाहेरील अन्न-पदार्थ खाण्याचे टाळावे तसेच पाणी शक्यतोवर तापवून घ्यावे आणि त्यानंतरच शूद्ध झालेले पाणी प्राशन करावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला. 

वाशिम : गत तीन-चार दिवसांपासून वातावरणात बदल जाणवत आहे. ढगाळ वातावरण असल्यामुळे साथरोग बळावले असून, सरकारी रुग्णालयासह खासगी दवाखान्यात रूग्णांची गर्दी होत असल्याचे दिसून येते. 

यावर्षी वातावरणात बदल जाणवत आहे. जानेवारी व फेब्रुवारी महिन्यातही वातावरणात बदल झाल्याने साथरोग बळावले होते. मार्च महिन्यात साधारणत: दुसऱ्या आठवड्यापासून कमी-अधिक प्रमाणात ढगाळ वातावरण असल्याने बालकांपासून ते वृद्धांपर्यंत सर्दी, ताप, खोकला आदी आजार जडत असल्याचे दिसून येते. वातावरणातील बदलाची सर्वाधिक झळ लहान मुले आणि वयोवृद्ध नागरिकांना बसत आहे. उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयासह ग्रामीण रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्ण दाखल होत असल्याचे दिसून येते.  जिल्हा सामान्य रुग्णालयात गत तीन-चार दिवसांपासून रुग्णांची संख्या वाढली असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल कावरखे यांनी सांगितले. 

सकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण, दुपारी तापते ऊन आणि सायंकाळनंतर कधी उकाडा तर कधी गारवा यामुळे आरोेग्य बिघडत असल्याचा दावा डॉक्टरांनी केला. साधारणत: मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सरकारी रुग्णालयांत रूग्णांची संख्या वाढत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. वातावरणातील बदलामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. बाहेरील अन्न-पदार्थ खाण्याचे टाळावे तसेच पाणी शक्यतोवर तापवून घ्यावे आणि त्यानंतरच शूद्ध झालेले पाणी प्राशन करावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला. 

टॅग्स :washimवाशिमHealthआरोग्य