शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

वातावरण बदलामुळे साथीचे आजार वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 14:15 IST

सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी, प्लेटलेट कमी होणे आदी आजार नागरिकांना जडत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मध्यंतरी एक ते दोन दिवस वातावरणातील गारवा गायब होऊन काहीअंशी उष्णता निर्माण झाली; मात्र गत काही दिवसांपासून पुन्हा सातत्याने वातावरणात परिणामकारक बदल होत आहेत. त्यातच गत दोन दिवसांपासून ढगाळी वातावरण कायम असून सूर्यदर्शन दुर्लभ झाले आहे. या सर्व प्रतिकुल परिस्थितीमुळे विविध आजारांची लागण होण्यासोबतच रब्बी हंगामातील पिकांनाही फटका बसत असल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यात ढगाळ वातावरण तसेच पहाटेच्या सुमारास धुके, त्यानंतर गारवा, दुपारी काही प्रमाणात ऊन्ह आणि सायंकाळी पुन्हा गारवा निर्माण होत आहे. वातावरणातील या बदलामुळे बालकांसह नागरिकांचे आरोग्य बिघडत आहे. सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी, प्लेटलेट कमी होणे आदी आजार नागरिकांना जडत आहेत. विशेषत: लहान मुलांना सर्दी, खोकल्याचा त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात दररोज साधारणत: २५० ते ३०० रुग्ण विविध आजारांच्या तपासणीसाठी येत आहेत. २ फेब्रूवारीलाही सरकारी दवाखान्यात उपचारार्थ दाखल झालेल्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. खासगी दवाखान्यातही रुग्णांची तुफान गर्दी होत आहे.वातावरणातील बदल लहान बालक आणि वयोवृद्ध नागरिकांना शक्यतोवर सहन होत नाही. लहान मुलांना सर्दी, ताप आणि खोकला या आजाराने ग्रासले असल्याचे वाढलेल्या रुग्ण संख्येवरून दिसून येत आहे. ग्रामीण व शहरी भागातील खासगी रुग्णालयात ताप, अंगदुखी, सर्दी, खोकला, विषमज्वर अशा रुग्णांची गर्दी होत आहे. त्यातच काही प्रमाणात हिवतापाचेही रुग्ण दाखल होऊ लागले आहेत. वातावरणातील बदलांशी लहान मुले आणि वयोवृद्ध नागरिकांचे आरोग्य तेवढ्या तत्परतेने जुळवून घेत नसल्याने साहजिकच आरोग्य बिघडत असल्याचा दावा काही डॉक्टरांनी केला. खासगी दवाखान्यातही रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून, बहुतांश रुग्ण हे व्हायरल फिव्हरचे असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी दिली.

वातावरणात सातत्याने बदल होत असल्याने सर्दी, ताप, डोकेदुखी व काही प्रमाणात विषमज्वर आदी आजारांचे प्रमाण वाढत आहे. नागरिकांनी दक्षता बाळगणे आवश्यक आहे. वातावरणातील बदलामुळे विशेषत: लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला, तापेची लक्षणे आढळून येत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी घराचा परिसर स्वच्छ ठेवावा. विविध प्रकारच्या आजारांची लक्षणे दिसताच तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.- डॉ. अंबादास सोनटक्केजिल्हा शल्य चिकित्सकजिल्हा सामान्य रुग्णालय, वाशिम

 

टॅग्स :washimवाशिमhospitalहॉस्पिटलHealthआरोग्य