शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

उडदाच्या बियाण्यांसाठी ईश्वरचिठ्ठीतून लाभार्थी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 18:23 IST

एकांबा येथे २७ जून रोजी आयोजित चर्चासत्रात उडीद बियाण्यासाठी ईश्वरचिठ्ठीत २५ शेतकºयांची निवड करण्यात आली. 

लोकमत न्यूज नेटवर्कअनसिंग : कृषी विभागातर्फे शेतकरी चर्चासत्र घेतले जात असून, अनसिंगपासून जवळच असलेल्या एकांबा येथे २७ जून रोजी आयोजित चर्चासत्रात उडीद बियाण्यासाठी ईश्वरचिठ्ठीत २५ शेतकºयांची निवड करण्यात आली. मान्सून लांबल्यामुळे शेतकरी चिंतातूर झाले आहेत. शेतकºयांना पेरणीसंदर्भात तंत्रशुद्ध माहिती देण्यासाठी शेतकरी चर्चासत्र घेतले जात आहे. एकांबा येथेदेखील चर्चासत्र घेण्यात आले. एकांबा येथे २५ जून रोजी दमदार पाऊस झाल्यामुळे शेतकºयांना आगामी पेरणीविषयी नियोजन करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. सोयाबीनची लागवड ही सरी-वरंबा, रुंद सरी वरंबा पद्धतीने करण्यासाठी आणि तुरीच्या पिकासाठी कमी कालावधीचे वान घेण्यासाठी प्रेरित करण्यात आले. बीज प्रक्रिया करणे, उगवणशक्ती तपासणे, इत्यादीबाबत माहिती दिली. कृषी विभागातर्फे गावातील २५ शेतकºयांची ईश्वरचिठ्ठीने निवड करून प्रति शेतकरी एक एकरासाठी लागणारे उडीद बियाणे देण्यात आले. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ देण्याची पात्र शेतकरी पात्र कुटुंबाने आपले बँक खाते क्रमांक व आधार कार्ड क्रमांक याची झेराँक्स प्रत दोन दिवसाचे आत तलाठी कार्यालयात अथवा आपल्या गावासाठी नेमुन देण्यात आलेल्या पालक अधिकारी यांचे कडे जमा करावे, असे आवाहन केले. कृषी पर्यवेक्षक मधुकर राऊत आणि कृषी सहाय्यक विजय ढवळे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे  यशस्वीतेसाठी विष्णू काटेकर, विनोद चव्हाण, ज्ञानेश्वर बेंद्रे ,किसन कोरडे, ज्ञानेश्वर काटेकर, विठ्ठल वाबळे आणि समस्त गावकरी यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी