शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

वातावरणातील बदलाचा तूर पिकाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 13:35 IST

वाशिम: पश्चिम वऱ्हाडात वातावरणात झालेल्या बदलाचा फटका तूर पिकाला बसत आहे. दिवसा वातावरणातील उष्णता आणि रात्री पडणाऱ्या थंडीचा विपरित परिणाम या पिकावर होत असल्याने फुलोरा गळत आहे.

वाशिम: पश्चिम वऱ्हाडात वातावरणात झालेल्या बदलाचा फटका तूर पिकाला बसत आहे. दिवसा वातावरणातील उष्णता आणि रात्री पडणाऱ्या थंडीचा विपरित परिणाम या पिकावर होत असल्याने फुलोरा गळत आहे. यामुळे उत्पादनात मोठी घट येण्याची भिती निर्माण झाली आहे.पश्चिम वºहाडात यंदा जवळपास १ लाख ६६ हजार हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली आहे. यात बुलडाणा ७८ हजार १६१ हेक्टर, अकोला ४७ हजार ३४१ हेक्टर, तर वाशिम ५९ हजार ७८० हेक्टर, असे तुरीच्या पेरणीचे क्षेत्र आहे. जून महिन्यातील दमदार पावसानंतर बहरलेल्या तुरीला मध्यंतरी जुलै महिन्यात पावसाने खंड दिल्याने थोडा फटका बसून वाढ खुंटली; परंतु आॅगस्ट महिन्यात जोरदार पाऊस आल्याने या पिकाला चांगलाच आधार मिळाला. आता तुरीचे पीक फुलावर असताना हिवाळ्याच्या सुरुवातीला वातावरणात विषम स्वरुपाचा बदल पाहायला मिळत आहे. दिवसाला तापमानात प्रचंड वाढ होत आहे, तर रात्री थंडी पडत असल्याने तुरीच्या पिकावर विपरित परिणाम होऊन या पिकाचा फुलोरा मोठ्या प्रमाणात गळत आहे. प्रत्यक्षात थंडीचा फायदा या पिकाला होतो; परंतु दिवसा सतत वाढत असलेल्या तापमानामुळे हा प्रकार होत आहे. यामुळे पिकाच्या उत्पादनात घट येण्याची भिती निर्माण झाली आहे.

 

सद्यस्थितीत दिवसा तापमान प्रचंड वाढत असल्याने आधीच पावसाअभावी संकटात असलेल्या तुरीची झाडे सुकत आहेत. रात्रीच्या थंडीचा फायदाही पिकाला होत नसून, विषम वातावरणामुळे फुले गळण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.-प्रितम भगतशेतकरी, चांभई (मंगरुळपीर)

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी