शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वातावरणात बदलामुळे वाशिम जिल्ह्यातील तूर, हरभरा पीक धोक्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 19:32 IST

वातावरणातील सततच्या बदलामुळे तुरीसह हरभरा पिकांचे मोठया प्रमाणात नुकसानाची संभावना व्यक्त केली जात आहे. हरभºयावर ढगाळ वातावरणामुळे मोठया प्रमाणात अळया पडत असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकरी वर्गातून केल्या जात आहे.

ठळक मुद्देगव्हाला पोषक वातावरण तुरीचा फुलोर गळाला

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वातावरणातील सततच्या बदलामुळे तुरीसह हरभरा पिकांचे मोठया प्रमाणात नुकसानाची संभावना व्यक्त केली जात आहे. हरभ-यावर ढगाळ वातावरणामुळे मोठया प्रमाणात अळया पडत असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकरी वर्गातून केल्या जात आहे.वाशिम जिल्हयात गत पंधरा दिवसांपासून अधून मधून वातावरणात अचानक बदल पडत आहे. कधी थंडी, कधी ढगाळ तर कधी उन्ह पडत असल्याने याचा पिकांना फटका बसत आहे. ढगाळ वातावरणामुळे तुरीच्या झाडांची फुले गळून गेल्याने त्यातून काहीचउत्पन्न होण्याची शक्यता दिसून येत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. अनेक शेतामध्ये केवळ फुलो-याविना तुरटयाच शेतात उभ्या दिसून येत आहेत. अनेक शेतक-यांनी नुकतीच काही दिवसांपूर्वी हरभरा पिकांची पेरणी केली. ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने हरभºयांवर अळया पडण्यास सुरुवात झाल्याने त्यावर नियंत्रणासाठी शेतकरी धावपळ करतांना दिसून येत आहे. गत दोन वर्षांपासून अगोदरच सोयाबीन, तूर , हरभरा या शेतमालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने त्रस्त असलेल्या शेतक-यांना या अस्मानी संकटामुळे चिंतेत टाकले आहे. या वातावरणातील बदलामुळे भाजीपाला उत्पादक शेतक-यांचेही मोठया प्रमाणात नुकसान होत असल्याचे भाजीपाला उत्पादक शेतकरी सांगत आहेत. अनेक शेतकºयांना तुरीची सोंगणी व काढणीला लागणारा खर्चही निघणार नसल्याचे चित्र आहे.

 

शेतक-यांची धडपड

  • वातावरणातील बदलामुळे हरभरावर पडत असलेल्या अळयांवर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकºयांनी धावपळ सुरु केली आहे. कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करुन पीके वाचविण्यासाठी काय उपाय योजना कराव्यात यासंदर्भात शेतकरी माहिती घेतांना दिसून येत आहेत. हातचे पीक न जाण्यासाठी धडपड दिसून येत आहे. 
  • गत आठ दिवसांपासून पडत असलेली थंडी गव्हाला पोषक ठरत असल्याने गहू उत्पादक शेतकºयांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. परंतु यामध्ये अनेक शेतकºयांनी तूर व हरभरा सुध्दा पेरला असल्याने त्याचे नुकसानाबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.
  • शेतक-यांवर वातावरणातील बदलामुळे उदभवलेले संकट टाळण्यासाठी कृषी विभागाने शेतात जावून मार्गदर्शन करावे अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
  • तूर उत्पादक शेतक-यांना लावलेला खर्च ही येणाºया उत्पादनातून होणार नसल्यासने अनेक शेतकरी पुढील नियोजनाच्या चिंतेत आहेत.

वातावरणातील बदलामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकºयांना कृषी विभागाने मार्गदर्शन करुन शेतकºयांना संकटातून काढण्याचा मार्ग सांगावा व तसे मार्गदर्शनासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.                   - गणेश इरतकर, शेतकरी 

टॅग्स :agricultureशेती