शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

वातावरणातील बदलाचा पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 16:04 IST

आसेगाव पो.स्टे. (वाशिम) : वातावरणातील बदल आणि बुधवारी रात्रीच्या सुमारास रिमझिम पाऊस आल्याचा फटका रब्बी हंगामातील पिकांना बसला.

लोकमत न्यूज नेटवर्कआसेगाव पो.स्टे. (वाशिम) : वातावरणातील बदल आणि बुधवारी रात्रीच्या सुमारास रिमझिम पाऊस आल्याचा फटका रब्बी हंगामातील पिकांना बसला. नैसर्गिक संकटामुळे आसेगाव पो.स्टे. परिसरातील शेतकरी त्रस्त असून, शासनाने नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकºयांनी ८ फेब्रुवारी रोजी केली.रब्बी पिके अंतिम टप्प्यात आली असताना गत आठवड्यापासून वातावरणात अचानक बदल झाल्याने पिकांना फटका बसत आहे. अशातच बुधवार, ६ फेब्रुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास आसेगाव परिसरात रिमझिम पाऊस पडला.  यामुळे शेतकºयांची तारांबळ उडाली. जनावरांचा चारा, कुटार झाकण्यासाठी शेतकºयांना धडपड करावी लागली. ७ फेब्रुवारी रोजी सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याने आंबा , गहू, हरभरा, हळद  या रब्बी पिकांची मळणी धोक्यात सापडली आहे. भाजीपाल्यासह सर्वच बागायती पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकºयांच्या समस्येत भर पडली. आंब्याचा मोहोर गळणे, डाळिंबावर किडीचा प्रादुर्भाव होत आहे. वातावरणातील बदलाचा सर्वाधिक फटका हळद या पिकाला बसला आहे. नांदगाव येथे वातावरणातील बदलामुळे हळद पिकावर करपा रोग पडल्याने उत्पादनात घट येण्याची भीती वर्तविली जात आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी