शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

केंद्रीय पथकाकडून वाशिम जिल्ह्यातील पीक नुकसानाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 16:26 IST

डॉ. आर.पी. सिंग यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जिल्ह्यात नुकसान झालेल्या क्षेत्राची रविवार, २४ नोव्हेंबर रोजी पाहणी करून बाधीत शेतकºयांशी संवाद साधला.

बाधीत शेतकºयांशी संवाद : पथकातील अन्य अधिकाºयांची उपस्थितीलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. केंद्र सरकारने झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक गठीत केले असून पथकातील केंद्रीय कृषि मंत्रालयांतर्गत येणाºया कापूस विकास संचालनालयाच्या कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे संचालक डॉ. आर.पी. सिंग यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जिल्ह्यात नुकसान झालेल्या क्षेत्राची रविवार, २४ नोव्हेंबर रोजी पाहणी करून बाधीत शेतकºयांशी संवाद साधला.यावेळी जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, अमरावती विभागाचे कृषी सहसंचालक सुभाष नागरे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, रिसोडचे तहसीलदार अजित शेलार, वाशिमचे तहसीलदार विजय साळवे, तालुका कृषी अधिकारी अभिजित देवगिरीकर यांची उपस्थिती होती.सिंग यांच्या पथकाने रिसोड तालुक्यातील महागाव येथील माधव गायकवाड यांच्या नुकसान झालेल्या शेताची पाहणी केली. गायकवाड यांनी यंदा ३ हेक्टरमध्ये सोयाबीनची पेरणी केली होती. त्यापैकी बहुतांश सोयाबीनचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. जे काही सोयाबीन होणार आहे, त्यालाही जेमतेम दर मिळणार आहे. तुरीचेही पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे ते म्हणाले. महागाव शेतशिवारात सुमारे ६४२ हेक्टरवर सोयाबीन पेरण्यात आले होते, यापैकी सुमारे ९० टक्के क्षेत्रावरील सोयाबीनचे नुकसान झाल्याची माहितीही त्यांनी दिली.पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे बाळखेड येथील रमेश भारती यांच्या शेतातील पीक नुकसानाचीही सिंग यांच्या पथकाने पाहणी केली. भारती यांच्या नदीकाठी असलेल्या तीन हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन आणि तूर पिकाचे प्रचंड नुकसान झाले. पुरामुळे जमीन खरडून गेली असून जमिनीचा पोत सुधारण्यासाठी किमान पाच वर्षे लागतील, ही बाब भारती यांनी सिंग यांच्या निदर्शनास आणून दिली. या भेटीत डॉ. आर.पी. सिंग यांच्या पथकाने जिल्ह्यातील इतरही नुकसानग्रस्त गावांना भेटी देऊन शेतकºयांचे म्हणणे ऐकून घेतले.दरम्यान, जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्यातील पावसामुळे झालेल्या पीक नुकसानाचे पंचनामे करून तसे सविस्तर अहवाल राज्य शासनाकडे पाठविण्यात आल्याचे जिल्हाधिकारी मोडक यांनी डॉ. सिंग यांना सांगितले.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरीagricultureशेती