शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय पथकाकडून वाशिम जिल्ह्यातील पीक नुकसानाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 16:26 IST

डॉ. आर.पी. सिंग यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जिल्ह्यात नुकसान झालेल्या क्षेत्राची रविवार, २४ नोव्हेंबर रोजी पाहणी करून बाधीत शेतकºयांशी संवाद साधला.

बाधीत शेतकºयांशी संवाद : पथकातील अन्य अधिकाºयांची उपस्थितीलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. केंद्र सरकारने झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक गठीत केले असून पथकातील केंद्रीय कृषि मंत्रालयांतर्गत येणाºया कापूस विकास संचालनालयाच्या कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे संचालक डॉ. आर.पी. सिंग यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जिल्ह्यात नुकसान झालेल्या क्षेत्राची रविवार, २४ नोव्हेंबर रोजी पाहणी करून बाधीत शेतकºयांशी संवाद साधला.यावेळी जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, अमरावती विभागाचे कृषी सहसंचालक सुभाष नागरे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, रिसोडचे तहसीलदार अजित शेलार, वाशिमचे तहसीलदार विजय साळवे, तालुका कृषी अधिकारी अभिजित देवगिरीकर यांची उपस्थिती होती.सिंग यांच्या पथकाने रिसोड तालुक्यातील महागाव येथील माधव गायकवाड यांच्या नुकसान झालेल्या शेताची पाहणी केली. गायकवाड यांनी यंदा ३ हेक्टरमध्ये सोयाबीनची पेरणी केली होती. त्यापैकी बहुतांश सोयाबीनचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. जे काही सोयाबीन होणार आहे, त्यालाही जेमतेम दर मिळणार आहे. तुरीचेही पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे ते म्हणाले. महागाव शेतशिवारात सुमारे ६४२ हेक्टरवर सोयाबीन पेरण्यात आले होते, यापैकी सुमारे ९० टक्के क्षेत्रावरील सोयाबीनचे नुकसान झाल्याची माहितीही त्यांनी दिली.पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे बाळखेड येथील रमेश भारती यांच्या शेतातील पीक नुकसानाचीही सिंग यांच्या पथकाने पाहणी केली. भारती यांच्या नदीकाठी असलेल्या तीन हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन आणि तूर पिकाचे प्रचंड नुकसान झाले. पुरामुळे जमीन खरडून गेली असून जमिनीचा पोत सुधारण्यासाठी किमान पाच वर्षे लागतील, ही बाब भारती यांनी सिंग यांच्या निदर्शनास आणून दिली. या भेटीत डॉ. आर.पी. सिंग यांच्या पथकाने जिल्ह्यातील इतरही नुकसानग्रस्त गावांना भेटी देऊन शेतकºयांचे म्हणणे ऐकून घेतले.दरम्यान, जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्यातील पावसामुळे झालेल्या पीक नुकसानाचे पंचनामे करून तसे सविस्तर अहवाल राज्य शासनाकडे पाठविण्यात आल्याचे जिल्हाधिकारी मोडक यांनी डॉ. सिंग यांना सांगितले.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरीagricultureशेती