शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
4
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
5
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
8
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
9
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
10
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
11
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
12
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
13
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
14
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
20
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा

ओंकारगिरबाबा पुण्यतिथीनिमित्त उसळला जनसागर!

By admin | Updated: July 17, 2017 02:36 IST

महाप्रसादाचे वितरण : शिरपूर येथे ५१ भजनी दिंड्यांच्या गजरात निघाली शोभायात्रा

लोकमत न्यूज नेटवर्क शिरपूर : येथील समर्थ जानगीर महाराज संस्थानवर सुरू असलेल्या ओंकारगिर बाबा यांच्या पुण्यतिथी सोहळयाचा रविवारी भक्तीमय वातावरणात समारोप करण्यात आला. यानिमित्त ओंकारगिर बाबांच्या पालखीची गावातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. त्यानंतर महाप्रसाद वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचा हजारो भाविकांनी लाभ घेतलादरवर्षी प्रमाणे यावर्षी शिरपूर येथील जानगीर महाराज संस्थान मध्ये संत ओंकारगिर बाबा यांची पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात आला. ९ जुलै पासून सुरु झालेल्या ओंकारगिर बाबा पुण्यतिथी सोहळयानिमित्त संस्थानमध्ये भरगच्च धार्मिक कार्यक्रम पार पडले. रविवार १६ जुलै हा सोहळयाचा मुख्यदिवस असल्याने सकाळी ५ वाजता ओंकारगिरबाबा यांच्या प्रतिमा रथाची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ‘जानगीर महाराज की जय, ‘ओंकारगिर बाबा की जय’ असा जयघोष करीत ही शोभायात्रा संपूर्ण गावात फिरविण्यात आली. दरम्यान, मिर्झा मियॉ दर्गाह, अंतरिक्ष पार्श्वनाथ जैन मंदिर, सावता माळी युवक मंडळ, इरतकर वेटाळाकडून भाविकासाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. गावातील बसस्थानक परिसर, जैन मंदिर परिसरातून पालखी दुपारी संस्थानवर पोहचल्यानंतर दुपारी ३ वाजतापासून भाविकांना महाप्रसादाचे वितरण करून पुण्यतिथी सोहळयाची सांगता करण्यात आली. टाळमृदंगाचा नाद आणि समर्थ जानगीर महाराज, तसेच ओंकारगिर बाबांच्या जयघोषात हजारो भाविक तल्लीन झाले होते. त्यामुळे संपूर्ण गावाता भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.मिर्झा मिया दरगाहमध्ये शोभायात्रेचे स्वागतओंकारगिरबाबा पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त काढण्यात आलेली शोभायात्रा परंपरेनुसार मिर्झा मियॉ बाबांच्या दर्गाहवर नेण्यात आली. या ठिकाणी मिर्झा मियॉ बाबा दर्गाहच्या विश्वस्तांनी ओकांरगिर महारारांच्या पालखीचे स्वागत केले. गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा अद्यापही अबाधित असून, यामुळे गावातील धार्मिक सलोख्याची प्रचिती येते. दरम्यान, अंतरिक्ष पार्श्वनाथ जैन मंदिरावरही या शोभायात्रेचे मनोभावे स्वागत करण्यात आले. ९० क्विंटलचा महाप्रसाद!ओंकारगिर बाबांच्या पुण्यतिथी सोहळ्याच्या समारोपानिमित्त महाप्रसादासाठी ११ क्विंटलची बुंदी, ५१ क्विंटल गव्हाच पोळ्या व ३१ क्विंटल काशीफळाची भाजी बनविण्यात आली होती. हा प्रसाद बनविण्यासाठी गावकरी, युवकांसह संत ओंकारगिर संस्थानच्या विश्वस्तांनी परीश्रम घेतले. बुंंदीची ५० हजार पाकिटे तयार करण्यासाठी गावकरी, युवक, तसेच संत आेंकारगिर बाबा कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सहकार्य केले. दुपारी ३ वाजतापासून सुरू झालेल्या या कार्यक्रमात ६० हजार भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.