शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

Bhavna Gavli : मला ED ची कुठलिही नोटीस नाही पण; भावना गवळींनी मौन सोडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 18:54 IST

Bhavna Gavli : माझ्या ऑफिसलाही ईडीची नोटीस बजावण्यात आली नाही. पण, माझ्या संस्थेवर ईडीचे अधिकारी आलेले आहेत.

ठळक मुद्देएक आकडा घ्यायचा आणि राईचा पर्वत बनवायचा अशा पद्धतीने या ठिकाणी काही नेत्यांनी मागच्या काही दिवसात खेळ मांडलेला आहे, असे स्पष्टीकरणही गवळी यांनी दिले. 

वाशिम : शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या यवतमाळ-वाशिम येथील ५ संस्थांवर सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) छापे टाकले आहेत. मुंबईहून वाशिमला पोहोचलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांनी गवळींच्या संस्थांवर धाडी टाकल्या. याप्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांची कारवाई पूर्ण झाल्यावर आपण बोलू, असं त्यांनी सांगितलं होता. त्यानंतर, गवळींनी प्रथमच मौन सोडलं आहे. ईडीने मला कुठलिही नोटीस नोटीस बजावली नसल्याचे त्यांनी सांगितले. 

माझ्या ऑफिसलाही ईडीची नोटीस बजावण्यात आली नाही. पण, माझ्या संस्थेवर ईडीचे अधिकारी आलेले आहेत. येथे चौकशी करत असून सगळं आणीबाणीसारखी वागणून शिवसेनेच्या मंत्र्यांना, लोकांना दिल्या जात आहेत. त्यांना टार्गेट केलं जात आहे, असा आरोप भावना गवळी यांनी केला आहे. माझ्या संस्थेचा मी स्वतः एफआयआर नोंद केला होता. मला हिशोब मिळाला नाही आणि त्यातलं एक वाक्य पकडायचं, एक आकडा घ्यायचा आणि राईचा पर्वत बनवायचा अशा पद्धतीने या ठिकाणी काही नेत्यांनी मागच्या काही दिवसात खेळ मांडलेला आहे, असे स्पष्टीकरणही गवळी यांनी दिले. 

100 कोटींच्या घोटाळ्याचा सोमैय्यांचा आरोप

भावना गवळींनी आपल्या बालाजी आर्टीकल फोर्ट कारखान्यासाठी 44 कोटी रुपये भारत सरकारच्या बँकेचे कर्ज घेतले, 11 कोटी रुपये कर्ज स्टेट बँकांकडून घेतले. विशेष म्हणजे हा 55 कोटी रुपयांचा कारखाना आपल्याच बेनामी कंपनी असलेल्या भावना अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेडला केवळ 25 लाख रुपयांत विकला, असा गंभीर आरोप किरीट सोमैय्या यांनी केला आहे. त्यानंतर, नवीन बेनामी कंपनीवर आखणी 11 कोटी रुपयांचं कर्ज घेण्यात आलं. अशाप्रकारे भावना गवळींनी 100 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप किरीट सोमैय्या यांनी केला आहे. 

शिवसेना-भाजपमध्ये जुंपली

शिवसेना खासदार भावना गवळी यांच्याकडून संस्थांच्या माध्यमातून लूटमार सुरू आहे. शिवसेना नेत्यांची माफियागिरी सुरू आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी दिली. त्यांनी गवळी यांच्याविरोधात सुरू असलेल्या कारवाईचं स्वागत केलं. शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली. सत्ताधारी पक्षाकडून तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचे आरोप आधी भाजपकडून केले जायचे. तेव्हा भाजप विरोधी पक्षात होता. मात्र आता भाजप सत्तेत आल्यानंतर त्यांच्याकडूनही तेच सुरू आहे. ईडीच्या नोटिसा अनेकांना जातात. धाडी पडतात. मात्र त्यांचं पुढे काय होतं?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Bhavna Gavliभावना गवळीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस