शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचे अनुदान तुटपुंजे; शेतकऱ्यांमध्ये नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 12:57 IST

राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेने अमलात आलेल्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेची कृषी विभागाकडून अंमलबजावणी सुरू आहे; मात्र महाराष्ट्रातील जिल्ह्यांसाठी केवळ १०० कोटी रुपये अनुदानाची तरतूद असून, तालुकानिहाय २४ ते २५ लाख रुपयेच मिळत आहेत.

ठळक मुद्दे शासनाने महाराष्ट्रातील छोट्या जिल्ह्यांना दीड ते दोन कोटी रुपयेच अनुदान मंजूर केले आहे. अनुदान वितरित करायचे झाल्यास प्रति शेतकरी केवळ ५० हजार रुपये अनुदान देणे शक्य आहे.अनुदानामुळे लाभार्थी निवडीवर मर्यादा येत असल्याने कृषी विभागाचीही डोकेदुखी वाढली आहे.

वाशिम : राज्याचे माजी कृषी मंत्री स्व.भाऊसाहेब फुंडकर यांचे कार्य सदैव स्मरणात राहावे, यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेने अमलात आलेल्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेची कृषी विभागाकडून अंमलबजावणी सुरू आहे; मात्र महाराष्ट्रातील जिल्ह्यांसाठी केवळ १०० कोटी रुपये अनुदानाची तरतूद असून, तालुकानिहाय २४ ते २५ लाख रुपयेच मिळत आहेत. त्यातून केवळ ५० शेतकºयांची निवड शक्य असून, त्यांनाही तुटपुंजे अनुदान मिळणार असल्याने शेतकºयांमधून याप्रती नाराजीचा सूर उमटत आहे.भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत आंबा, डाळिंब, काजु, पेरू, सीताफळ, आवळा, चिंच, जांभुळ, कोकम, फणस, कागदी लिंबु, चिकु, संत्रा, मोसंबी, अंजीर व नारळ आदी स्वरूपातील फळबाग लागवडीचा समावेश करण्यात आला आहे. या माध्यमातून शेतकरी स्वावलंबी व्हावे, हा उद्देश बाळगण्यात आला असला, तरी त्यासाठी भरीव अनुदानाची तरतूद अपेक्षित असताना शासनाने महाराष्ट्रातील छोट्या जिल्ह्यांना दीड ते दोन कोटी रुपयेच अनुदान मंजूर केले आहे. त्यातून पात्र लाभार्थींची निवड करून त्यांना अनुदान वितरित करण्याचे शासनाचे निर्देश आहेत.प्रत्यक्षात मात्र तालुक्यांच्या वाट्याला २४ ते २५ लाख रुपयेच अनुदान येत असल्याने त्यातून साधारणत: ५० शेतकºयांची निवड करून त्यांना अनुदान वितरित करायचे झाल्यास प्रति शेतकरी केवळ ५० हजार रुपये अनुदान देणे शक्य आहे. एवढ्या कमी रकमेतून किती हेक्टरवर फळबाग लागवड करायची, असा प्रश्न शेतकºयांमधून उपस्थित केला जात आहे. याशिवाय अर्ज अधिक प्रमाणात प्राप्त होत असताना तुटपुंज्या अनुदानामुळे लाभार्थी निवडीवर मर्यादा येत असल्याने कृषी विभागाचीही डोकेदुखी वाढली आहे.भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेंतर्गत वाशिम जिल्ह्यातील सहा तालुक्यांच्या वाट्याला प्रत्येकी २४ ते २५ लाख रुपये अनुदान आलेले आहे. त्यानुसार, देय अनुदानाच्या मर्यादेत शेतकºयांची ‘लकी ड्रॉ’द्वारे निवड केली जात आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकºयांना ५० ते ६० हजार अनुदान देणे शक्य आहे.- दत्तात्रय गावसानेजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम.

 

टॅग्स :washimवाशिमBhausaheb Phundkarभाऊसाहेब फुंडकरagricultureशेतीFarmerशेतकरीgovernment schemeसरकारी योजना