शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

लाभार्थींना बागायती जमिनीचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 13:41 IST

बागायती शेती उपलब्ध झाली नसल्याने लाभार्थींना कोरडवाहू (जिरायत) शेतीवरच समाधान मानावे लागले.

- संतोष वानखडे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत मागील १४ वर्षात एकदाही बागायती शेती उपलब्ध झाली नसल्याने लाभार्थींना कोरडवाहू (जिरायत) शेतीवरच समाधान मानावे लागले. या १४ वर्षात चार वेळा कोरडवाहू शेतीही उपलब्ध झाली नाही तर उर्वरीत १० वर्षात २४० लाभार्थींना ९२९ कोरडवाहू शेतीचे वाटप करण्यात आले.गोरगरीब व भूमिहीन लाभार्थींचा आर्थिक स्तर उंचाविण्यासाठी समाजकल्याण विभाग विविध योजना राबवित आहे. त्यापैकीच एक असलेल्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन शेतमजूर कुटुंबांना ४ एकर जिरायत किंवा २ एकर बागायत जमीन उपलब्ध करून देण्यात येते. जमिन खरेदीसाठी शासनाकडून ५० टक्के अनुदान तर उर्वरीत ५० टक्के रक्कम १० वर्षासाठी बिनव्याजी स्वरुपात दिली जाते. पात्र लाभार्थींना जमिन देण्यासाठी शासनाकडून शासकीय दरात प्रथम जमीन खरेदी केली जाते. जमीन विकण्यासाठी कुणी तयार झाला तर लाभार्थींना जमीन दिली जाते.२००४ -०५ ते २०१८-१९ या १४ वर्षात बागायती शेती विकण्यासाठी एकाही शेतकºयंचा प्रस्ताव समाजकल्याण विभागाकडे प्राप्त झाला नाही किंवा तसे प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे १४ वर्षात एकदाही बागायती शेती उपलब्ध होऊ शकली नाही. चार वर्षात कोरडवाहू शेतीदेखील उपलब्ध झाली नाही तर १० वर्षात ९२९ एकर कोरडवाहू शेती उपलब्ध झाल्याने २४० लाभार्थींना ईश्वर चिठ्ठीद्वारे वाटप करण्यात आली, असे समाजकल्याण विभागाने वरिष्ठ निरीक्षक अनंत मुसळे यांनी सांगितले.बागायती शेती विक्री करण्यासाठी कोणताही शेतकरी अद्याप पुढे आला नसल्याने बागायती शेती उपलब्ध होऊ शकली नाही, असा दावा समाजकल्याण विभागातर्फे करण्यात आला.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी