शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
3
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
4
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
5
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
6
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
7
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
8
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
9
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
10
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
11
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
12
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
13
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
14
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
15
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
16
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
17
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
18
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
19
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
20
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली

सावधान ! सततचा पाऊस देतोय जलजन्य आजारांना आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:48 IST

००००००००००००००० दूषित पाण्यामुळे होणारे आजार १) डायरिया, गॅस्ट्रो : डायरिया, गॅस्ट्रोच्या आजारात रुग्णाला उलटी, जुलाब होतात. दूषित पाणी प्यायल्यानंतर ...

०००००००००००००००

दूषित पाण्यामुळे होणारे आजार

१) डायरिया, गॅस्ट्रो : डायरिया, गॅस्ट्रोच्या आजारात रुग्णाला उलटी, जुलाब होतात. दूषित पाणी प्यायल्यानंतर चार ते पाच तासात ही लक्षणं दिसू लागतात. पावसाळ्यात ही लक्षणं साथीच्या आजारासारखी पसरतात. उलटी, जुलाब झाल्याने शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होते.

००००००००००००००००

२) कावीळ : दूषित पाण्यामुळे कावीळ आजार होतो. त्यात हेपेटायटिस 'ए' किंवा 'इ' हे प्रकार झाल्याचे आढळतात. दूषित पाणी प्यायल्यानंतर सात ते आठ दिवसांत उलट्या, ताप, लघवी पिवळी होणे किंवा भूक मंदावणं ही लक्षणे दिसतात. चार ते पाच दिवसांनी डोळे पिवळे दिसायला लागतात.

००००००००००००००००

३) टायफॉइड : टायफॉइड हा आणखी एक आजार दूषित पाण्यामुळे होतो. चार ते पाच दिवसांत मोठ्या प्रमाणात ताप येतो. पोटात खूप दुखते. उपचार न घेतल्यास टायफॉइडचे जंतू रक्तात मिसळतात. यामध्ये काही रुग्ण दगावण्याची भीती असते.

००००००००००००००००

आसेगावात डायरियाचे शंभरवर रुग्ण

गेला आठवडाभर सुरू असलेल्या पावसामुळे मंगरूळपीर तालुक्यातील आसेगाव परिसरात पिण्याचे पाणी दूषित होऊन डायरियाचा उद्रेक झाला आहे. बहुतांश ठिकाणी डायरियाचे रुग्ण आढळून येत आहेत. शंभरपेक्षा अधिक लोकांना या आजाराची लागण झाली आहे. त्यात लहान मुलांचे प्रमाण अधिक आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रासह खासगी दवाखान्यात उपचारासाठी गर्दी उसळत आहे.

००००००००००००००००००००

कोट: आसेगावात डायरियाचे अनेक रुग्ण आढळून आले आहेत. तेथे तपासणी मोहीम सुरू आहे. ग्रामसेवकांनी प्रत्येक गावांत जलसुरक्षकांच्या मदतीने पिण्याच्या जलस्त्रोतात ब्लिचिंग पावडर टाकून घ्यावे. ग्रामस्थांनी पाणी गाळून, उकळून प्यावे. काही गावांत आरोग्य केंद्र नसेल, तर आवश्यकतेनुसार शिबिरही घेतले जाईल.

-डॉ. अविनाश आहेर,

जिल्हा आरोग्य अधिकारी

०००००००००००००००००००

ही घ्या काळजी !

- पावसाळ्यात पाणी पिताना शुद्ध करून पिणे हा सर्वोत्तम उपाय.

- वॉटर प्युरी फायरचे पाच ते सहा थेंब पिण्याच्या पाण्याच्या भांड्यात टाकावेत. ते

- हॉटेलमधील उघडे पदार्थ, बाहेरचे पदार्थ खाणे टाळावे.

-पाणीपुरी, भेळ अथवा इतर पदार्थ खाणे टाळावे.

-उलट्या, जुलाबांमुळे शरीरातील पाणी कमी होतं. त्यावेळी मीठ-साखर पाणी सतत पित राहावं.

-ओआरएस पावडर एक लिटर पाण्यात टाकून प्यावी.

- शक्य असेलर नारळाचे पाणी घ्यावे.