शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

सावधान ! सततचा पाऊस देतोय जलजन्य आजारांना आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:48 IST

००००००००००००००० दूषित पाण्यामुळे होणारे आजार १) डायरिया, गॅस्ट्रो : डायरिया, गॅस्ट्रोच्या आजारात रुग्णाला उलटी, जुलाब होतात. दूषित पाणी प्यायल्यानंतर ...

०००००००००००००००

दूषित पाण्यामुळे होणारे आजार

१) डायरिया, गॅस्ट्रो : डायरिया, गॅस्ट्रोच्या आजारात रुग्णाला उलटी, जुलाब होतात. दूषित पाणी प्यायल्यानंतर चार ते पाच तासात ही लक्षणं दिसू लागतात. पावसाळ्यात ही लक्षणं साथीच्या आजारासारखी पसरतात. उलटी, जुलाब झाल्याने शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होते.

००००००००००००००००

२) कावीळ : दूषित पाण्यामुळे कावीळ आजार होतो. त्यात हेपेटायटिस 'ए' किंवा 'इ' हे प्रकार झाल्याचे आढळतात. दूषित पाणी प्यायल्यानंतर सात ते आठ दिवसांत उलट्या, ताप, लघवी पिवळी होणे किंवा भूक मंदावणं ही लक्षणे दिसतात. चार ते पाच दिवसांनी डोळे पिवळे दिसायला लागतात.

००००००००००००००००

३) टायफॉइड : टायफॉइड हा आणखी एक आजार दूषित पाण्यामुळे होतो. चार ते पाच दिवसांत मोठ्या प्रमाणात ताप येतो. पोटात खूप दुखते. उपचार न घेतल्यास टायफॉइडचे जंतू रक्तात मिसळतात. यामध्ये काही रुग्ण दगावण्याची भीती असते.

००००००००००००००००

आसेगावात डायरियाचे शंभरवर रुग्ण

गेला आठवडाभर सुरू असलेल्या पावसामुळे मंगरूळपीर तालुक्यातील आसेगाव परिसरात पिण्याचे पाणी दूषित होऊन डायरियाचा उद्रेक झाला आहे. बहुतांश ठिकाणी डायरियाचे रुग्ण आढळून येत आहेत. शंभरपेक्षा अधिक लोकांना या आजाराची लागण झाली आहे. त्यात लहान मुलांचे प्रमाण अधिक आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रासह खासगी दवाखान्यात उपचारासाठी गर्दी उसळत आहे.

००००००००००००००००००००

कोट: आसेगावात डायरियाचे अनेक रुग्ण आढळून आले आहेत. तेथे तपासणी मोहीम सुरू आहे. ग्रामसेवकांनी प्रत्येक गावांत जलसुरक्षकांच्या मदतीने पिण्याच्या जलस्त्रोतात ब्लिचिंग पावडर टाकून घ्यावे. ग्रामस्थांनी पाणी गाळून, उकळून प्यावे. काही गावांत आरोग्य केंद्र नसेल, तर आवश्यकतेनुसार शिबिरही घेतले जाईल.

-डॉ. अविनाश आहेर,

जिल्हा आरोग्य अधिकारी

०००००००००००००००००००

ही घ्या काळजी !

- पावसाळ्यात पाणी पिताना शुद्ध करून पिणे हा सर्वोत्तम उपाय.

- वॉटर प्युरी फायरचे पाच ते सहा थेंब पिण्याच्या पाण्याच्या भांड्यात टाकावेत. ते

- हॉटेलमधील उघडे पदार्थ, बाहेरचे पदार्थ खाणे टाळावे.

-पाणीपुरी, भेळ अथवा इतर पदार्थ खाणे टाळावे.

-उलट्या, जुलाबांमुळे शरीरातील पाणी कमी होतं. त्यावेळी मीठ-साखर पाणी सतत पित राहावं.

-ओआरएस पावडर एक लिटर पाण्यात टाकून प्यावी.

- शक्य असेलर नारळाचे पाणी घ्यावे.