शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

नादुरुस्त रस्ते, धोकादायक पुलांचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:28 IST

जिल्ह्यात १० जून रोजी सर्वदूर धुवाधार पाऊस कोसळला. यंदाच्या पावसाळ्यातील या पहिल्याच मोठ्या स्वरूपातील पावसामुळे प्रशासकीय यंत्रणेचा मान्सूनपूर्व नियोजनातील ...

जिल्ह्यात १० जून रोजी सर्वदूर धुवाधार पाऊस कोसळला. यंदाच्या पावसाळ्यातील या पहिल्याच मोठ्या स्वरूपातील पावसामुळे प्रशासकीय यंत्रणेचा मान्सूनपूर्व नियोजनातील गाफीलपणा चव्हाट्यावर आला. त्यानंतरही गेल्या ७ दिवसांत अधुनमधून दमदार पावसाची हजेरी सुरूच असून मानोरा शहरातील दिग्रस मार्गावर, येडशी (ता. मंगरूळपीर) फाट्यानजीक, नागठाणा (ता. वाशिम), दापुरी खु. (ता. रिसोड), जवळा (ता. मानोरा) आदी ठिकाणी निर्माणाधिन पुलांची रखडलेली कामे व अस्तित्वात असलेल्या छोट्या स्वरूपातील जमीन समांतर पुलांमुळे पूरपरिस्थिती निर्माण होऊन शेकडो हेक्टर शेतजमीन अक्षरश: खरडून गेली आहे. यासह अनेक ठिकाणी वाहतूक जागीच ठप्प झाल्याचा प्रकारदेखील घडला.

धोकादायक अवस्थेतील या पुलांप्रमाणेच विविध ठिकाणच्या रस्त्यांचीही प्रचंड दुरवस्था बनली आहे. त्यात प्रामुख्याने रिसोड शहरातील सिव्हिल लाईनकडे जाणारा मुख्य रस्ता, मंगरूळपीर-मानोली, वनोजा-पिंजर, आमगव्हाण-कोंडोली, मोप-बोरखेडी, मानोरा-कारपा यांसह इतरही शेकडो रस्त्यांचा समावेश आहे. तथापि, नदी-नाल्यांवरील धोकादायक पुलांमुळे उद्भवणारी पूरपरिस्थिती व रस्त्यांअभावी दळणवळणाचा जाणवणारा प्रश्न लक्षात घेता, प्रशासनाने पावसाळा सुरू होण्यापूर्वी चोख नियोजन करायला हवे होते; मात्र याबाबत उदासीनता बाळगण्यात आल्याने पावसाळ्याच्या पहिल्याच महिन्यात जनजीवन पुरते विस्कळित बनल्याचे दिसून येत आहे.

........................

बाॅक्स :

पूरपरिस्थिती उद्भवल्यास नदीकाठची ६१ गावे होतात बाधित

जिल्ह्यातून पैनगंगा, पूस, कांच, अरुणावती, अडाण, बेंबळा, निर्गुणा, काटेपूर्णा आदी नद्या वाहतात. परिणामी, अतिवृष्टी होऊन पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास नदीकाठची ६१ गावे बाधित होतात. त्यात गोहोगाव, महागाव, धोडप बु., भापूर, तांदुळवाडी, सरपखेड, मोठेगाव, देगाव, लिंगा कोतवाल, किनखेड, मसलापेन, हिवरापेन, पेडगाव, देऊळगाव बंडा, बेलखेडा, आसेगाव पेन, वरूड तोफा, रिठद, खडकी, बोरखेडी, पाचंबा, गणेशपूर, बाळखेड, वटफळ, पेनबोरी, चिचांबापेन, अडोळी, मांगूळझनक, नेतन्सा, आंचळ, गोवर्धन, जवळा बु., हिवरा बु., कोंडोली, धामणी, कारखेडा, वरोली, मानोरा, रामतीर्थ, मंगरूळपीर, आमगव्हाण, गिरोली, शेमलाई, आंबोडा, लाडेगाव, पिंपळगाव बु., उकर्डा, दिघी, वाकी, वाघोळा, खेर्डा, काजळेश्वर, भाैरद, भिलदुर्ग, वाघी बु., दुबळवेल, वाडी रामराव, पिंपरी बु., मोझरी, धोत्रा, पिंपळखुटा या गावांचा समावेश आहे.

...................

३७ लाखांच्या भरपाईचा प्रस्ताव

मानोरा तालुक्यातील कोंडोली येथून वाहणाऱ्या अरुणावती नदीवर सन २००० मध्ये बांधलेला पूल १० जून रोजी पहिल्याच पावसात वाहून गेला. पुराचे पाणी शेतात शिरून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून ३७ लाखांच्या नुकसान भरपाईचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.