शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

शाळा, महाविद्यालयांमध्ये लोकशाहीचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 17:36 IST

२५ सप्टेंबरपासून शालेय परिपाठामध्ये विद्यार्थ्यांना मतदान व लोकशाही विषयी माहिती दिली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : विधानसभा निवडणुकीत जास्ती जास्त मतदारांनी सहभागी व्हावे, याकरिता शाळा, महाविद्यालयांमध्ये विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. २५ सप्टेंबरपासून शालेय परिपाठामध्ये विद्यार्थ्यांना मतदान व लोकशाही विषयी माहिती दिली जात आहे.३० सप्टेंबर रोजी सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये वयोगटानुसार चित्रकला, रांगोळी स्पर्धा व मतदार जागृतीविषयक घोषवाक्य स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानंतर ५ आॅक्टोंबर रोजी सकाळी प्रभातफेरीचे आयोजन करून मतदार जागृती केली जाणार आहे. ७ आॅक्टोंबर रोजी सर्व शाळा व महाविद्यालयात निबंध स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. ९ आॅक्टोंबर रोजी सर्व विद्यार्थी आपल्या पालकांना पत्र लिहून मतदानाचे महत्व पटवून देणार आहेत. लोकशाही आणि निवडणूक, मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी ११ आॅक्टोंबर रोजी वक्तृत्व व परिसंवाद स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. मतदान, लोकशाही बळकटीकरण आदी विषयवार ३० सप्टेंबर ते १८ आॅक्टोंबर या कालावधीत आठवडी बाजाराची ठिकाणे, गदीर्ची ठिकाणे, चौक येथे पथनाट्य सादर करून मतदार जागृती केली जाणार आहे. १७ आॅक्टोंबर रोजी शाळांमध्ये अभिरूप मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.मतदार जागृतीसाठी प्रत्येक शाळा, महाविद्यालयाने नाविन्यपूर्ण कार्यक्रम राबवून मतदार जागृतीच्या कार्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीप समितीचे नोडल अधिकारी दीपक कुमार मीना, माध्यमिक शिक्षणाधिकारी तानाजी नरळे यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमStudentविद्यार्थी