शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

आसोला खु. येथे स्वच्छ अभियानाचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 4:35 AM

आसोला खुर्द : मानोरा तालुक्यातील ग्रामीण भागात मागील एक-दोन वर्षांपूर्वी कठोर पद्धतीने स्वच्छ भारत अभियान राबविण्यात आले. आता मात्र ...

आसोला खुर्द : मानोरा तालुक्यातील ग्रामीण भागात मागील एक-दोन वर्षांपूर्वी कठोर पद्धतीने स्वच्छ भारत अभियान राबविण्यात आले. आता मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याने गावागावांत उघड्यावर शौचवारी सुरू झाली आहे. आसोला खु. येथे यामुळे रस्त्यांवर घाण पसरल्याने ाआजारांना आमंत्रण मिळत असल्याने स्वच्छता अभियानाचा फज्जा उडाल्याचे दिसत आहे.

पंचायत समिती प्रशासनाकडून ग्रामीण भागातील जवळपास सर्वच गावांमध्ये ग्रामस्थांमध्ये जनजागृती करून तालुका हगणदरीमुक्तीसाठी प्रयत्न केले. त्यामुळे शौचालयांचे उद्दिष्टही पूर्ण झाले; परंतु त्यानंतर कर्मचारी वर्गाने हगणदरीमुक्तीचे सातत्य राखण्याबाबत दक्षता बाळगली नाही. त्यामुळे ग्रामस्थ शौचालयाचा वापर न करता सर्रास उघड्यावर शौचास जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आसोला खु. येथेही असेच चित्र आहे. त्यामुळे सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे. काही ठिकाणी, तर शौचालयाचा न्हाणी घर म्हणून किंवा धुणीभांडी करण्यासाठी वापर होत असल्याचे दिसते. उघड्यावरील शौचवारीमुळे आसोला येथे दुर्गंधी पसरली असून, गावात प्रवेश करताच नाकाला रुमाल लावावा लागत आहे.