शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

आसेगाव बांध सिंचन प्रकल्प अद्याप तहानलेलाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 14:17 IST

आसेगाव बांध सिंचन प्रकल्पातही आजमितीस केवळ ४० टक्के जलसाठा असून मोठा पाऊस होवून प्रकल्प न भरल्यास आगामी रब्बी हंगामात सिंचनासाठी पाण्याची टंचाई भेडसावणार.

ठळक मुद्देआसेगाव बांध सिंचन प्रकल्पावर आसेगाव परिसरातील शेकडो शेतकरी उपसा सिंचन पद्धतीने पिकांच्या सिंचनासाठी पाणी घेतात.गतवर्षी घटलेले पर्जन्यमान आणि यंदाही तशीच स्थिती उद्भवल्याने आजमितीस प्रकल्पात केवळ ४० टक्के जलसाठा झाला आहे.

रब्बी हंगामात जाणवणार अडचण : मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायमलोकमत न्यूज नेटवर्कआसेगाव (वाशिम) : सद्या पावसाळ्याचे दिवस सुरू असतानाही पावसाने दडी मारल्यामुळे खरिपातील पिके संकटात सापडली आहेत. यासोबतच सिंचन प्रकल्पांची पाणीपातळी वाढण्याऐवजी घटत चालल्याचे दिसत आहे. परिसरातील आसेगाव बांध सिंचन प्रकल्पातही आजमितीस केवळ ४० टक्के जलसाठा असून मोठा पाऊस होवून प्रकल्प न भरल्यास आगामी रब्बी हंगामात सिंचनासाठी पाण्याची टंचाई भेडसावणार असल्याचे संकेत मिळत आहेत.आसेगाव बांध सिंचन प्रकल्पावर आसेगाव परिसरातील शेकडो शेतकरी उपसा सिंचन पद्धतीने पिकांच्या सिंचनासाठी पाणी घेतात. त्यामुळे हा प्रकल्प पूर्णत: तुडूंब भरणे अत्यावश्यक आहे. मात्र, गतवर्षी घटलेले पर्जन्यमान आणि यंदाही तशीच स्थिती उद्भवल्याने आजमितीस प्रकल्पात केवळ ४० टक्के जलसाठा झाला आहे. त्यामुळे आगामी रब्बी हंगामात पिकांच्या सिंचनाचा मोठा प्रश्न भेडसावण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दुसरीकडे पावसाने दीर्घ दडी मारल्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, मुग, उडीद ही पिके सुकत चालली आहेत. येत्या चार ते पाच दिवसांत मोठा पाऊस झाला नाही खरीपाच्या सरासरी उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट येईल, अशी शक्यता आहे. दरम्यान, ज्या शेतकºयांकडे पाण्याची सुविधा आहे, त्यांनी सुक्ष्म सिंचन पद्धतीने पिके वाचविण्याची धडपड चालविल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :washimवाशिमDamधरणWaterपाणी