शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

बाजार समितीत धान्याची आवक वाढली ; दर घटले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:07 IST

वाशिम : खरीप हंगाम जवळ येत असल्याने बाजार समित्यांमध्ये शेतमालाची आवक वाढत आहे. दुसरीकडे सोयाबीनचा अपवाद वगळता अन्य शेतमालाच्या ...

वाशिम : खरीप हंगाम जवळ येत असल्याने बाजार समित्यांमध्ये शेतमालाची आवक वाढत आहे. दुसरीकडे सोयाबीनचा अपवाद वगळता अन्य शेतमालाच्या भावात घसरण होत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटकाही बसत आहे.

शेतकऱ्यांना दरवर्षीच या ना त्या कारणाने विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे. गत एका वर्षापासून कोरोना विषाणू संसर्गाचे संकट असल्याने याचा फटका शेतकऱ्यांना ही बसत आहे. कोरोनाच्या सावटाखालीच गतवर्षातील खरीप हंगाम गेला. यंदा एका महिन्यावर खरीप हंगाम येऊन ठेपला असल्याने बी-बियाणे, खते, शेतीची मशागत यासह अन्य शेतीविषयक कामांसाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. ही गरज भागविण्यासाठी शेतकऱ्यांना शेतमाल विक्री आणि पीक कर्जाची उचल याशिवाय पर्याय नाही. अत्यल्प व अल्प भूधारक शेतकरी शक्यतोवर सोयाबीन काढणी झाल्यानंतरच शेतमाल विक्री करतात तर अन्य शेतकरी चांगले बाजारभाव आल्यानंतर शेतमालाची विक्री करतात. आता खरीप हंगाम जवळ येत असल्याने बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक वाढत असल्याचे दिसून येते. मात्र, सोयाबीन वगळता हरभरा, तुरीचे बाजारभाव घसरल्याचे दिसून येते. सोयाबीनला सध्या प्रति क्विंटल ६,५०० - ७,३०० या दरम्यान भाव आहेत. गत महिन्याच्या तुलनेत जवळपास ६०० ते ७०० रुपयांनी भावात वाढ झाली आहे. हरभरा प्रति क्विंटल ४,५०० ते ५,००० तर तूर प्रति क्विंटल ६,६०० ते ६,७०० या दरम्यान भाव आहे. या दोन्ही शेतमालाच्या बाजारभावात जवळपास ८०० रुपयांनी घट आल्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

००००००

बॉक्स

१) दररोज होणारी आवक (क्विंटलमध्ये)

धान्य भावआवक

सोयाबीन६,५०० - ७,३०० २,०५१

तूर४,५०० - ५,००० ३,४७०

हरभरा६,६०० - ६,७०० ४,५९०

००००

प्रतिक्रिया

आवक वाढली की शेतमालाच्या किमतीत घट येते, याचा अनुभव हा दरवर्षीचाच आहे. खरीप हंगाम जवळ येत असल्याने शेतमालाची विक्री करावी लागत आहे. मात्र, सोयाबीन वगळता अन्य शेतमालाच्या किमती कमी झाल्याने आर्थिक नुकसान होत आहे.

- सोनुबाबा सरनाईक, शेतकरी

.......

२०२० मध्ये नैसर्गिक आपत्तीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले. उत्पादनातही घट आली. खरीप हंगामाची तयारी म्हणून शेतमाल विक्री करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मात्र, तूर, हरभऱ्याचे बाजारभाव कमी झाल्याने नुकसान सहन करावे लागते.

- गौतम भगत, शेतकरी

.......

खरीप हंगाम जवळ येत असल्याने बाजार समित्यांमध्ये शेतमालाची आवक वाढत आहे. लॉकडाऊनमुळे वरच्या दरापेक्षा स्थानिक स्तरावर १०० ते २०० रुपये दर कमी मिळत आहेत. सोयाबीनला मात्र झळाळी आहे.

- आनंद चरखा, व्यापारी

.....

तूर व हरभऱ्याच्या तुलनेत सोयाबीनला बऱ्यापैकी भाव मिळत आहेत. खरीप हंगामाची तयारी करण्यासाठी बाजार समित्यांमध्ये शेतमालाची आवक वाढत असल्याचे दिसून येते. त्या तुलनेत तूर व हरभऱ्याच्या बाजारभावात घट आहे.

- सुभाष शिंदे, व्यापारी

००००००००