शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीत धान्याची आवक वाढली ; दर घटले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:07 IST

वाशिम : खरीप हंगाम जवळ येत असल्याने बाजार समित्यांमध्ये शेतमालाची आवक वाढत आहे. दुसरीकडे सोयाबीनचा अपवाद वगळता अन्य शेतमालाच्या ...

वाशिम : खरीप हंगाम जवळ येत असल्याने बाजार समित्यांमध्ये शेतमालाची आवक वाढत आहे. दुसरीकडे सोयाबीनचा अपवाद वगळता अन्य शेतमालाच्या भावात घसरण होत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटकाही बसत आहे.

शेतकऱ्यांना दरवर्षीच या ना त्या कारणाने विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे. गत एका वर्षापासून कोरोना विषाणू संसर्गाचे संकट असल्याने याचा फटका शेतकऱ्यांना ही बसत आहे. कोरोनाच्या सावटाखालीच गतवर्षातील खरीप हंगाम गेला. यंदा एका महिन्यावर खरीप हंगाम येऊन ठेपला असल्याने बी-बियाणे, खते, शेतीची मशागत यासह अन्य शेतीविषयक कामांसाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. ही गरज भागविण्यासाठी शेतकऱ्यांना शेतमाल विक्री आणि पीक कर्जाची उचल याशिवाय पर्याय नाही. अत्यल्प व अल्प भूधारक शेतकरी शक्यतोवर सोयाबीन काढणी झाल्यानंतरच शेतमाल विक्री करतात तर अन्य शेतकरी चांगले बाजारभाव आल्यानंतर शेतमालाची विक्री करतात. आता खरीप हंगाम जवळ येत असल्याने बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक वाढत असल्याचे दिसून येते. मात्र, सोयाबीन वगळता हरभरा, तुरीचे बाजारभाव घसरल्याचे दिसून येते. सोयाबीनला सध्या प्रति क्विंटल ६,५०० - ७,३०० या दरम्यान भाव आहेत. गत महिन्याच्या तुलनेत जवळपास ६०० ते ७०० रुपयांनी भावात वाढ झाली आहे. हरभरा प्रति क्विंटल ४,५०० ते ५,००० तर तूर प्रति क्विंटल ६,६०० ते ६,७०० या दरम्यान भाव आहे. या दोन्ही शेतमालाच्या बाजारभावात जवळपास ८०० रुपयांनी घट आल्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

००००००

बॉक्स

१) दररोज होणारी आवक (क्विंटलमध्ये)

धान्य भावआवक

सोयाबीन६,५०० - ७,३०० २,०५१

तूर४,५०० - ५,००० ३,४७०

हरभरा६,६०० - ६,७०० ४,५९०

००००

प्रतिक्रिया

आवक वाढली की शेतमालाच्या किमतीत घट येते, याचा अनुभव हा दरवर्षीचाच आहे. खरीप हंगाम जवळ येत असल्याने शेतमालाची विक्री करावी लागत आहे. मात्र, सोयाबीन वगळता अन्य शेतमालाच्या किमती कमी झाल्याने आर्थिक नुकसान होत आहे.

- सोनुबाबा सरनाईक, शेतकरी

.......

२०२० मध्ये नैसर्गिक आपत्तीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले. उत्पादनातही घट आली. खरीप हंगामाची तयारी म्हणून शेतमाल विक्री करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मात्र, तूर, हरभऱ्याचे बाजारभाव कमी झाल्याने नुकसान सहन करावे लागते.

- गौतम भगत, शेतकरी

.......

खरीप हंगाम जवळ येत असल्याने बाजार समित्यांमध्ये शेतमालाची आवक वाढत आहे. लॉकडाऊनमुळे वरच्या दरापेक्षा स्थानिक स्तरावर १०० ते २०० रुपये दर कमी मिळत आहेत. सोयाबीनला मात्र झळाळी आहे.

- आनंद चरखा, व्यापारी

.....

तूर व हरभऱ्याच्या तुलनेत सोयाबीनला बऱ्यापैकी भाव मिळत आहेत. खरीप हंगामाची तयारी करण्यासाठी बाजार समित्यांमध्ये शेतमालाची आवक वाढत असल्याचे दिसून येते. त्या तुलनेत तूर व हरभऱ्याच्या बाजारभावात घट आहे.

- सुभाष शिंदे, व्यापारी

००००००००