शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
2
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
3
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
4
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
5
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
6
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
7
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
8
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
9
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
10
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
11
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
12
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
13
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
14
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
15
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
16
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
17
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
18
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
19
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
20
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन

 कर्जमाफी योजनेबाबत नाराज मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्याने मागितली आत्महत्येची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 17:38 IST

मालेगाव: धोरणामुळे हताश झालेल्या मालेगाव तालुक्यातील कोळगावच्या शेतकऱ्याने थेट आत्महत्येची परवानगीच मागितली आहे. यासाठी त्यांनी १५ जानेवारीला आमदार अमित झनक यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. 

ठळक मुद्देशासनाने प्रोत्साहन भत्त्याच्या नावावर केवळ २५ हजार रुपये देऊन त्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न केला आहे. कोळगाव बु. येथील शेतकरी विजय शेंडगे यांनी मालेगाव-रिसोडचे आमदार अमित झनक आणि तहसीलदार महल्ले यांना निवेदन दिले.दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी द्यावी किंवा आत्महत्येची परवानगी द्यावी, अशी मागणीही केली आहे. 

मालेगाव: शासनाने यंदा शेतकऱ्यांना  दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली आहे. तथापि, जे शेतकरी नियमित कर्ज भरतात. त्यांना मात्र उसणवारी करून नियमित कर्जाची परतफेड करणाºया शेतकऱ्यांना  मात्र प्रोत्साहनाच्या नावावर तुटपुंजी रक्कम देऊन तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न केल्या गेला. या धोरणामुळे हताश झालेल्या मालेगाव तालुक्यातील कोळगावच्या शेतकऱ्याने थेट आत्महत्येची परवानगीच मागितली आहे. यासाठी त्यांनी १५ जानेवारीला आमदार अमित झनक यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. 

मालेगाव तालुक्यातील कोळगाव बु. येथील शेतकरी विजय शेंडगे यांनी मालेगाव-रिसोडचे आमदार अमित झनक आणि तहसीलदार महल्ले यांना निवेदन देताना असे नमूद केले आहे, की ज्या शेतकºयांनी पीककर्ज घेऊन त्याची परतफेड केली नाही. त्यांना शासनाने दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली; परंतु कर्जाचे नियमित हप्ते भरणाया आणि त्यासाठी सावकारी कर्ज, उसणवारीचे व्यवहारही के ले. त्या शेतकºयांना मात्र प्रोत्साहन भत्त्याच्या नावावर केवळ २५ हजार रुपये देऊन त्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न केला आहे. बँकांच्या लेखी आमच्याकडे थकित कर्ज नसले तरी, आम्ही बँकांचे कर्ज फेडण्यासाठी सावकारी कर्ज काढले आणि उसणवारीही केली आहे. शासनाला मात्र त्याची पुसटशीही कल्पना नाही. त्यातच यंदा अपुºया पावसामुळे कृषी उत्पादन घटल्यानंतर बाजारात या शेतमालास २७०० ते २८०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहेत. तुरीलाही ४००० ते ४५०० रुपये दर मिळत आहेत. त्यामुळे शेतकºयांनी या पिकासाठी केलेला खर्चही वसुल होणे कठीण आहे. त्यामुळे जगावे की, मरावे, हा प्रश्न आमच्यापुढे उपस्थित झाला आहे. या बाबीचा विचार करून नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांनाही दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी द्यावी किंवा आत्महत्येची परवानगी द्यावी, अशी मागणीही या शेतकºयाने निवेदनातून केली आहे. 

मुख्यमंत्र्यांनाही पाठविली निवेदनाची प्रत

विजय शेंडगे यांनी शेतकºयांच्या समस्या उजागर करताना आत्महत्येच्या परवानगीसाठी जे निवेदन आमदारांसह तहसीलदारांकडे पाठविले. त्या निवेदनाचय प्रती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्याचे कृषी मंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडेही पाठविल्या आहेत. त्याशिवाय मालेगाव पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांकडेही निवेदनाची प्रत पाठविली आहे. 

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी