शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

 कर्जमाफी योजनेबाबत नाराज मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्याने मागितली आत्महत्येची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 17:38 IST

मालेगाव: धोरणामुळे हताश झालेल्या मालेगाव तालुक्यातील कोळगावच्या शेतकऱ्याने थेट आत्महत्येची परवानगीच मागितली आहे. यासाठी त्यांनी १५ जानेवारीला आमदार अमित झनक यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. 

ठळक मुद्देशासनाने प्रोत्साहन भत्त्याच्या नावावर केवळ २५ हजार रुपये देऊन त्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न केला आहे. कोळगाव बु. येथील शेतकरी विजय शेंडगे यांनी मालेगाव-रिसोडचे आमदार अमित झनक आणि तहसीलदार महल्ले यांना निवेदन दिले.दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी द्यावी किंवा आत्महत्येची परवानगी द्यावी, अशी मागणीही केली आहे. 

मालेगाव: शासनाने यंदा शेतकऱ्यांना  दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली आहे. तथापि, जे शेतकरी नियमित कर्ज भरतात. त्यांना मात्र उसणवारी करून नियमित कर्जाची परतफेड करणाºया शेतकऱ्यांना  मात्र प्रोत्साहनाच्या नावावर तुटपुंजी रक्कम देऊन तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न केल्या गेला. या धोरणामुळे हताश झालेल्या मालेगाव तालुक्यातील कोळगावच्या शेतकऱ्याने थेट आत्महत्येची परवानगीच मागितली आहे. यासाठी त्यांनी १५ जानेवारीला आमदार अमित झनक यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. 

मालेगाव तालुक्यातील कोळगाव बु. येथील शेतकरी विजय शेंडगे यांनी मालेगाव-रिसोडचे आमदार अमित झनक आणि तहसीलदार महल्ले यांना निवेदन देताना असे नमूद केले आहे, की ज्या शेतकºयांनी पीककर्ज घेऊन त्याची परतफेड केली नाही. त्यांना शासनाने दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली; परंतु कर्जाचे नियमित हप्ते भरणाया आणि त्यासाठी सावकारी कर्ज, उसणवारीचे व्यवहारही के ले. त्या शेतकºयांना मात्र प्रोत्साहन भत्त्याच्या नावावर केवळ २५ हजार रुपये देऊन त्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न केला आहे. बँकांच्या लेखी आमच्याकडे थकित कर्ज नसले तरी, आम्ही बँकांचे कर्ज फेडण्यासाठी सावकारी कर्ज काढले आणि उसणवारीही केली आहे. शासनाला मात्र त्याची पुसटशीही कल्पना नाही. त्यातच यंदा अपुºया पावसामुळे कृषी उत्पादन घटल्यानंतर बाजारात या शेतमालास २७०० ते २८०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहेत. तुरीलाही ४००० ते ४५०० रुपये दर मिळत आहेत. त्यामुळे शेतकºयांनी या पिकासाठी केलेला खर्चही वसुल होणे कठीण आहे. त्यामुळे जगावे की, मरावे, हा प्रश्न आमच्यापुढे उपस्थित झाला आहे. या बाबीचा विचार करून नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांनाही दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी द्यावी किंवा आत्महत्येची परवानगी द्यावी, अशी मागणीही या शेतकºयाने निवेदनातून केली आहे. 

मुख्यमंत्र्यांनाही पाठविली निवेदनाची प्रत

विजय शेंडगे यांनी शेतकºयांच्या समस्या उजागर करताना आत्महत्येच्या परवानगीसाठी जे निवेदन आमदारांसह तहसीलदारांकडे पाठविले. त्या निवेदनाचय प्रती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्याचे कृषी मंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडेही पाठविल्या आहेत. त्याशिवाय मालेगाव पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांकडेही निवेदनाची प्रत पाठविली आहे. 

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी