शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

 कर्जमाफी योजनेबाबत नाराज मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्याने मागितली आत्महत्येची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 17:38 IST

मालेगाव: धोरणामुळे हताश झालेल्या मालेगाव तालुक्यातील कोळगावच्या शेतकऱ्याने थेट आत्महत्येची परवानगीच मागितली आहे. यासाठी त्यांनी १५ जानेवारीला आमदार अमित झनक यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. 

ठळक मुद्देशासनाने प्रोत्साहन भत्त्याच्या नावावर केवळ २५ हजार रुपये देऊन त्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न केला आहे. कोळगाव बु. येथील शेतकरी विजय शेंडगे यांनी मालेगाव-रिसोडचे आमदार अमित झनक आणि तहसीलदार महल्ले यांना निवेदन दिले.दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी द्यावी किंवा आत्महत्येची परवानगी द्यावी, अशी मागणीही केली आहे. 

मालेगाव: शासनाने यंदा शेतकऱ्यांना  दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली आहे. तथापि, जे शेतकरी नियमित कर्ज भरतात. त्यांना मात्र उसणवारी करून नियमित कर्जाची परतफेड करणाºया शेतकऱ्यांना  मात्र प्रोत्साहनाच्या नावावर तुटपुंजी रक्कम देऊन तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न केल्या गेला. या धोरणामुळे हताश झालेल्या मालेगाव तालुक्यातील कोळगावच्या शेतकऱ्याने थेट आत्महत्येची परवानगीच मागितली आहे. यासाठी त्यांनी १५ जानेवारीला आमदार अमित झनक यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. 

मालेगाव तालुक्यातील कोळगाव बु. येथील शेतकरी विजय शेंडगे यांनी मालेगाव-रिसोडचे आमदार अमित झनक आणि तहसीलदार महल्ले यांना निवेदन देताना असे नमूद केले आहे, की ज्या शेतकºयांनी पीककर्ज घेऊन त्याची परतफेड केली नाही. त्यांना शासनाने दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली; परंतु कर्जाचे नियमित हप्ते भरणाया आणि त्यासाठी सावकारी कर्ज, उसणवारीचे व्यवहारही के ले. त्या शेतकºयांना मात्र प्रोत्साहन भत्त्याच्या नावावर केवळ २५ हजार रुपये देऊन त्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न केला आहे. बँकांच्या लेखी आमच्याकडे थकित कर्ज नसले तरी, आम्ही बँकांचे कर्ज फेडण्यासाठी सावकारी कर्ज काढले आणि उसणवारीही केली आहे. शासनाला मात्र त्याची पुसटशीही कल्पना नाही. त्यातच यंदा अपुºया पावसामुळे कृषी उत्पादन घटल्यानंतर बाजारात या शेतमालास २७०० ते २८०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहेत. तुरीलाही ४००० ते ४५०० रुपये दर मिळत आहेत. त्यामुळे शेतकºयांनी या पिकासाठी केलेला खर्चही वसुल होणे कठीण आहे. त्यामुळे जगावे की, मरावे, हा प्रश्न आमच्यापुढे उपस्थित झाला आहे. या बाबीचा विचार करून नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांनाही दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी द्यावी किंवा आत्महत्येची परवानगी द्यावी, अशी मागणीही या शेतकºयाने निवेदनातून केली आहे. 

मुख्यमंत्र्यांनाही पाठविली निवेदनाची प्रत

विजय शेंडगे यांनी शेतकºयांच्या समस्या उजागर करताना आत्महत्येच्या परवानगीसाठी जे निवेदन आमदारांसह तहसीलदारांकडे पाठविले. त्या निवेदनाचय प्रती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्याचे कृषी मंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडेही पाठविल्या आहेत. त्याशिवाय मालेगाव पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांकडेही निवेदनाची प्रत पाठविली आहे. 

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी