गतवर्षी सोयाबीन काढणीचा हंगाम असल्याने विहित मुदतीत तालुका आणि जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी नुकसानीचे दावे शासन-प्रशासनाकडे नोंदवू शकले नाहीत. यामुळे लाखो शेतकरी मागीलवर्षीच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक विमा परताव्यापासून वंचित राहिले. कृषीमंत्री आणि कृषी सचिवांची भेट घेऊन जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना महसूल व कृषी विभागाच्या पंचनाम्यानुसार व जिल्ह्यातील पीक काढणी आणेवारी ४७ पैशांच्या आधारे सरसकट पीकविमा मिळवून देण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली. यावेळी जोगलदरी येथील प्रगतशील शेतकरी श्याम अवताडे, सुनील जामदार उपस्थित होते.
.............
कोट :
मंगरूळपीर तालुका आणि जिल्ह्यातील शेतकरी मागील दहा वर्षांपासून एकूण लागवड क्षेत्राच्या ५० टक्केपेक्षा अधिक पेरा सोयाबीनचाच करीत असल्याने अतिवृष्टीने बाधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये लक्ष घालावे, अशी मागणी त्यांच्याकडे केली आहे.
श्याम अवताडे, शेतकरी, जोगलदरी