शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

अडोळ प्रकल्पाचे गेट नादुरुस्त; पाण्याचा अकारण विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 11:32 IST

या प्रकल्पातून दरदिवशी अकारणच लाखो लिटर पाण्याचा विसर्ग होत आहे.

लोकमत न्युज नेटवर्कशिरपूर: मालेगाव तालुक्यातील शिरपूर येथून जवळच असलेल्या खंडाळा येथील अडोळ प्रकल्पाचे गेट नादुरुस्त आहे. त्यामुळे या प्रकल्पातून दरदिवशी अकारणच लाखो लिटर पाण्याचा विसर्ग होत आहे. याचा फटका या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना बसत आहे.मालेगाव तालुक्यात शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने जवळपास १८ प्रकल्पांची उभारणी करण्यात आली आहे. या प्रकल्पांमुळे शेतकºयांना रब्बी पिकांसह भाजीपाला पिकांसह फळ पिके घेणे शक्य झाले. त्यात शिरपूर येथून काही अंतरावरच असलेल्या खंडाळा येथेही अडोळ प्रकल्पाची उभारणी काही वर्षांपूर्वी करण्यात आली आहे. या प्रकल्पातून मालेगाव शहराला पाणी पुरवठा होतो, तसेच शेकडो हेक्टर शेतीवर सिंचनही केले जाते. त्यामुळे या प्रकल्पातील जलसाठा वाचविणे अत्यावश्यक आहे; परंतु मागील काही वर्षांपासून या प्रकल्पाचे गेट नादुरुस्त झाले आहेत.त्यामुळे हा प्रकल्प काठोकाठ भरूनही शेतकºयांना त्याचा म्हणावा तेवढा फायदा होत नाही. नादुरुस्त गेटमधून सतत पाणी वाहून जात असल्याने उन्हाळ्याच्या पूर्वीच या प्रकल्पाची पातळी तळ गाठू लागते. गतवर्षीही आॅक्टोबर ते डिसेंबर दरम्यान आलेल्या पावसामुळे या प्रकल्पात बºयापैकी साठा वाढूनही नादुरुस्त गेटमुळे पाण्याचा अपव्यय झाल्याने त्याचा म्हणावा तेवढा फायदा शेतकºयांना होऊ शकला नाही. असे असतानाही प्रकल्पाच्या गेटची दुरुस्ती पाटबंधारे विभागाने केली नाही. त्यामुळे आता यंदाच्या पावसाळ्यात दमदार पावसामुळे या प्रकल्पाची पातळी वाढल्यानंतर नादुरुस्त गेटमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. मागील दोन वर्षांपासून अडोळ प्रकल्पाचे गेट नादुरुस्त असल्याने पावसाळ्यात या गेटधमधून सतत पाणी वाहून जाते. लघू सिंचन विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे आम्हाला सिंचनात अडचणी येत आहेत. लघू सिंचन विभागाने या प्रकल्पाचे गेट दुरुस्त केल्यास शेतकºयांना फायदा होईल.-विक्रम शिंदेखंडाळा, ता.मालेगाव

 

टॅग्स :washimवाशिमDamधरण