शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
4
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
5
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
6
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
7
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
8
१०० वर्षांनी शुभ योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: ६ मूलांकांचे ग्रहण सुटेल; पैसा-लाभ-वरदान!
9
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
10
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
11
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
12
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
13
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
14
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
15
Vivo Y50i: झटक्यात चार्ज होणार आणि दिर्घकाळ चालणार; विवोचा बजेट स्मार्टफोन बाजारात!
16
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
17
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
18
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
19
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
20
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क

पावसाच्या घटलेल्या सरासरीबाबत प्रशासन गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 13:43 IST

शासन गंभीर असून, पाणी आरक्षणाबाबत निर्धारीत वेळेपूर्वीच मंथन केले जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : यंदा जिल्ह्यात सद्यस्थितीत अपेक्षीत सरासरीच्या तुलनेत खुप कमी पाऊस पडला आहे. अद्यापही जिल्ह्यातील धरणांत पुरेसा साठाच झाला नाही. त्यामुळे प्रशासन गंभीर असून, पाणी आरक्षणाबाबत निर्धारीत वेळेपूर्वीच मंथन केले जाणार आहे. त्यातच रब्बी हंगामाचे नियोजनही करण्यात येणार आहे.वाशिम जिल्ह्यात वार्षिक सरासरी ७९८.७० मि. मी. पाऊस पडतो, तर १ जुन ते १ आॅगस्टदरम्यान ४२८.८० मि.मी. पाऊस अपेक्षीत असताना जिल्ह्यात याच कालावधित जिल्ह्यात केवळ ११९.२४ पाऊस पडला अर्थात सद्यस्थितीत १ जुन ते १ आॅगस्टदरम्यान अपेक्षीत सरासरीच्या केवळ २६ टक्केच पाऊस पडला, तर वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ ४५.२७ टक्केच पाऊस पडला आहे. त्यामुळेच पावसाळा अर्धा उलटूनही जिल्ह्यातील प्रकल्पांत पुरेसा जलसाठा झालेला नाही.जिल्ह्यातील १३१ प्रकल्पांची पातळी अद्याप १५ टक्क्यांपर्यंतही आलेली नाही. पावसाची सरासरी अशीच राहिल्यास जिल्ह्यात पाणीटंचाईचा प्रश्न खुप गंभीर होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियोजन सुरू केले आहे. त्यात प्रामुख्याने जिल्ह्यातील प्रकल्पांची पाणी पातळी लक्षात घेऊन निर्धारित वेळेपूर्वीच पाणी आरक्षण समितीची बैठक घेऊन उपलब्ध पाणीसाठा केवळ पिण्यासाठी आरक्षीत करण्यात येणार आहे. त्यासाठी गावांगावात दंवडी देऊन पिण्याचे पाणी आरक्षीत ठेवण्यात येणार असल्याने रब्बी पिके न घेण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.जलपुनर्भरणासाठी भव्य स्वरूपात शोषखड्डेजिल्ह्यात पावसाची सरासरी खुप कमी झाली असून, उरलेल्या दिवसांत पावसाची सरासरी अशीच राहिल्यास भीषण पाणीटंचाईचा सामना जनतेला करावा लागणार आहे. अशात पडणाऱ्या पावसाचे अधिकाधिक पाणी जमिनीत जिरविण्यासाठी गावागावांत ज्या ठिकाणी पाणी अधिकाधिक जमिनीत जिरविता येईल अशा ठिकाणी ६ मीटर व्यास आणि ३० मीटर खोल आकाराचे भव्य शोषखड्डे खोदण्यात येणार आहेत. प्रायोगिक तत्त्वावर जिल्ह्यातील कमी लोकसंख्येच्या २५ गावांची यासाठी निवड करण्याची तयारी प्रशासनाने केली असून, ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करून शोषखड्ड्याची कामे केली जाणार आहेत.

जिल्ह्यात पावसाची सरासरी खुप कमी असल्याने पाणीटंचाईची समस्या उद्भवण्याची दाट शक्यता आहे. या समस्येवर मात करण्यासाठी पावसाचे अधिकाधिक पाणी जमिनीत मुरविण्यासह प्रकल्पातील पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षीत करण्याचे नियोजन आहे. पावसाचे प्रमाण कमी राहिल्यास रब्बीची पेरणी कमी करण्यासाठीही आवाहन करण्यात येणार आहे.- शैलेश हिंगेनिवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमRainपाऊस